Headlines

गुरुग्राम जमीन घोटाळा प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांना समन्स:राउज एव्हेन्यू कोर्टात सुनावणी, सर्व 9 आरोपींना 16 मे रोजी हजर राहण्याचे आदेश

हरियाणातील गुरुग्राम येथील शिकोहपूर जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राऊज एव्हेन्यू कोर्टाने मोठे पाऊल उचलले आहे. कोर्टाने रॉबर्ट वाड्रा यांच्यासह 9 आरोपींविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत सर्वांना समन्स बजावले आहे. कोर्टाने आदेश दिला आहे की, वाड्रा यांच्यासह सर्व आरोपींनी 16 मे रोजी न्यायालयात हजर राहावे. फेब्रुवारी 2008 मध्ये रॉबर्ट वाड्रा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी…

Read More

सुषमा अंधारेंचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित:त्यांना उत्तर देण्याचे माझ्यावर कुठलेही बंधन नाही, दीपक केसरकर यांचा पलटवार

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकारण चांगलेच तापले असून, आता शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट जुंपली आहे. “अशोक खरातचा ‘सीडीआर’ खरा असेल, तर एसआयटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलावणार?” असा रोखठोक सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. यावर प्रत्युत्तर देताना, “केवळ फोटो असणे हा गुन्हा…

Read More

Ahan Pandey & Anit Pathaks New Romantic Film Announced; Set for 2027 Release

33 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक यशराज फिल्म्स (YRF) चा हिट चित्रपट ‘सैयारा’ ची टीम पुन्हा एकदा एकत्र आली आहे. दिग्दर्शक मोहित सूरी, अहान पांडे आणि अनित पड्डा यांची जोडी एका नवीन इंटेंस रोमँटिक चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहे. ‘सैयारा’ च्या विक्रमी कमाईनंतर या नवीन चित्रपटाकडूनही प्रेक्षकांना तशीच केमिस्ट्री आणि हिट म्युझिकची अपेक्षा आहे. हा चित्रपटही यशराज…

Read More

महाराष्ट्र उष्णतेने होरपळला:देगलूरच्या सुंदगीत देशातील उच्चांकी 47 अंश तापमानाची नोंद; अकोल्याचा पारा 44.2 अंशांवर

राज्यात उन्हाचा कडाका आता दिवसेंदिवस वाढताना दिसत असून, अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने चाळीशी पार केली आहे. विशेषतः नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील सुंदगी गावात आज चक्क ४७ अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली. या तापमानासह सुंदगी हे आज देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. दुसरीकडे, विदर्भातील अकोला आणि अमरावतीतही सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून जनजीवनावर…

Read More

भारत-अमेरिका व्यापार करारावर चर्चा पुन्हा सुरू होईल:भारतीय शिष्टमंडळ पुढील आठवड्यात वॉशिंग्टनला रवाना होईल; नवीन टॅरिफ संरचनेवर चर्चा होईल

भारत आणि अमेरिकेदरम्यान दीर्घकाळापासून रखडलेल्या अंतरिम व्यापार कराराबाबत पुढील आठवड्यात पुन्हा चर्चा सुरू होणार आहे. केंद्र सरकारचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ पुढील आठवड्यात वॉशिंग्टनला रवाना होईल. अमेरिकेतील शुल्क नियमांमुळे आणि न्यायालयीन निर्णयामुळे व्यापारी समीकरणे बदलली असताना हा दौरा होत आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, बुधवारी सरकारी सूत्रांनी शिष्टमंडळाच्या या दौऱ्याची पुष्टी केली. या करारावर मार्चमध्ये स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा…

Read More

औंढा नागनाथजवळ भीषण अपघात:खांडेश्‍वरी मंदिराजवळ भरधाव पिकअपची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, एक जखमी

औंढा नागनाथ शिवारात खांडेश्‍वर देवीच्या मंदिरा जवळ भरधाव पिकअपची दुचाकीस धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ता. १५ दुपारी घडली आहे. गंभीर जखमींवर औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील नवनाथ कऱ्हाळे…

Read More

शबरीमाला व्यवस्थापनाने म्हटले- अयप्पा मंदिर रेस्टॉरंट नाही:देव ब्रह्मचारी, महिला का येऊ इच्छिता?; एससीने म्हटले- कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेला चुकीचे ठरवणे कठीण

केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशासंदर्भातील खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी घेतली. मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या त्रावणकोर देवस्वम बोर्डाने (टीडीबी) म्हटले आहे की, हे खेळण्यांच्या दुकानाचे किंवा रेस्टॉरंटचे प्रकरण नाही. हे एका अशा देवतेला समर्पित मंदिर आहे, ज्यांना जन्मभर ब्रह्मचारी मानले जाते. टीडीबीचे प्रतिनिधित्व करणारे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, “१० ते ५० वयोगटातील महिला या देवतेच्या…

Read More

जानेवारी 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित:अर्ज करण्यासाठी डिसेंबर 2026 पर्यंत मुदत – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांच्या निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासकीय जमिनींवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तींनी डिसेंबर २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा.जी सी. यांनी केले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ आणि महाराष्ट्र जमीन महसूल…

Read More

अंगावर शहारे आणणारे 'छत्रपती' गीत प्रेक्षकांच्या भेटीला:अजय-अतुलच्या संगीताने सजलेले 'राजा शिवाजी' चित्रपटाचे भव्य 'अँथम' प्रदर्शित

‘जिओ स्टुडिओज्’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने साकार होणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाचे पहिले गाणे, राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’, आज अधिकृतरीत्या प्रदर्शित झाले आहे. भारतीय इतिहासाचा तेजस्वी वारसा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अतुलनीय पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याचा स्वाभिमान यांना समर्पित असलेले हे गीत म्हणजे केवळ संगीत नसून शौर्य आणि अभिमानाचा एक भव्य…

Read More

माणसे बदलल्याने पक्ष मजबूत होणार नाही:विचारांतील बदलामुळेच शिवसेनेवर मरणअवकळा, रावसाहेब दानवेंची आदित्य ठाकरेंवर टीका

शिवसेना ठाकरे गटात पक्षांतर्गत फेरबदलांच्या हालचाली सुरू असून, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर लवकरच ‘कार्याध्यक्ष’ पदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या संभाव्य नेतृत्व बदलावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. “केवळ माणसं बदलून पक्ष वाढत नसतो, तुम्ही विचारांना मुठमाती दिली…

Read More