Headlines

स्वदेशी युद्धनौका INS महेंद्रगिरी आज नौदलात सामील होणार:अँटी सबमरीन सिस्टिम-प्रगत क्षेपणास्त्रांनी सुसज्ज; उच्च वेग, रडारवर शोधणे कठीण

भारतीय नौदलाला शनिवारी आणखी एक युद्धनौका मिळणार आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार केलेली स्टेल्थ फ्रिगेट ‘महेंद्रगिरी’ विशाखापट्टणम येथे नौदलात सामील केली जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या प्रसंगी प्रमुख पाहुणे असतील. महेंद्रगिरी प्रोजेक्ट-17A च्या नीलगिरी श्रेणीतील सहावी स्टेल्थ फ्रिगेट आहे. याची रचना भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने केली आहे आणि मुंबईस्थित मझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL)…

Read More

दुगावला उलगडले मीराबाईंच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग:संत मीराबाई संगीतमय कथेच्या पाचव्या दिवशी राधा महाराजांचे निरुपण‎

दुगाव येथील दुग्धेश्वर मैदान येथे सुरू असलेल्या संत मीराबाई संगीतमय चरित्रकथेचा पाचवा दिवस अत्यंत भावपूर्ण आणि ज्ञानवर्धक ठरला. कथाकार वैष्णवभूषण श्री राधा महाराज (देवरगावकर) यांनी शुक्रवारी (दि. १०) संत मीराबाईंच्या जीवनातील अत्यंत कठीण मात्र तितक्याच प्रेरणादायी प्रसंगांचे वर्णन केले. कथेच्या पाचव्या दिवशी मीराबाईंचा चित्तोडगडचे राजकुमार कुंवर भोजराज यांच्याशी झालेला विवाह सोहळा सादर करण्यात आला. श्री…

Read More

मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर:वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि सतर्कतेचा इशारा; अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरसाठी ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार होऊ लागले असून राज्यातील हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. हवामान विभागाने आज विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी जोरदार वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय सिंधुदुर्गसह पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागांत मेघगर्जना,…

Read More

‘धनराज ज्वेलर्स' फोडले; सोने-चांदीचे दागिने लंपास:आमदार निवासाजवळ घरफोडी; चोरटे सीसीटीव्हीत‎

शहरातील राऊतवाडी परिसरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हैदोस घालत सराफा दुकान फोडले तसेच तीन फ्लॅटमध्ये घरफोडीचा प्रयत्न केला. या धाडसी चोरीमध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आल्या आहेत. ही घटना स्थानिक आमदारांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर घडल्याने पोलिस सुरक्षा व रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राऊतवाडी परिसरात…

Read More

सरकार म्हणाले- अनेक मंदिरांमध्ये प्रसादात दारू दिली जाते:न्यायालय हे म्हणू शकत नाही की तिथे दारू देऊ नका; शबरीमाला प्रकरणात सुनावणी

केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात शबरीमाला प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मंदिरांच्या रीतीरिवाजांचा उल्लेख केला. एएसजी नटराज म्हणाले, दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून मद्य दिले जाते. उद्या तुम्ही यावर आक्षेप घेऊ शकत नाही की मद्य देऊ नये. एक उदाहरण देताना ते म्हणाले, अनेक मंदिरांमध्ये शाकाहारी भोजन दिले जाते. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या आवडीनुसार किंवा अंतरात्म्याच्या आवाजावरून मांसाहारी भोजन…

Read More

पास झाल्यावर विद्यार्थ्यांना पुस्तके देणार का?:मुंबई महापालिकेच्या शालेय साहित्य वाटपातील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा संताप

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शालेय साहित्यात होत असलेल्या विलंबावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “शाळा 15 जूनला सुरू झाल्या, आणि आता ऑगस्ट महिना आला आहे. विद्यार्थी जुने गणवेश किंवा घरच्या कपड्यांवर शाळेत येत आहेत. भाजपच्या निर्णयामुळेच विद्यार्थ्यांना दोन महिने साहित्य…

Read More

सामाजिक दायित्व:जि.प.तील 260 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे केले वितरण, कस्तुरीची "वारी शिक्षणाची'' वंचितांच्या दारी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व आदिवासी बहुल भागातील जि. प. प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या वंचित व उपेक्षित विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सामाजिक संस्था “कस्तुरी’ने राबवलेल्या “वारी शिक्षणाची’ हा सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करीत सामाजिक दायित्व निभावले. अकोट तालुक्यातील जनुना व वस्तापूर या असणाऱ्या गावात भेटी देऊन तेथील जि. प. प्राथमिक शाळेत वर्ग १ते…

Read More

महाराष्ट्रातील 4 शहरांमध्ये तापमान 45°C पार:यूपीमध्ये बांदा सर्वात उष्ण; वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे मृतांचा आकडा 111 वर पोहोचला

देशाचा अर्ध्याहून अधिक भाग उष्णतेच्या लाटेच्या (हीटवेव) विळख्यात आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये गुरुवारी तापमान 40°C च्या वर नोंदवले गेले. महाराष्ट्रातील अकोला 45.9°C सह देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. जळगाव, वर्धा आणि अमरावतीमध्येही पारा 45°C च्या वर नोंदवला गेला. राजस्थानमधील फलोदीमध्ये तापमान 45.2°C, जैसलमेर आणि बाडमेरमध्ये 45.1°C नोंदवले गेले. गंगानगरमध्ये…

Read More

महाविकास आघाडीच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी:पावसाळी अधिवेशनादरम्यान एकजुटीवर प्रश्नचिन्ह; नेत्यांनी दिली स्पष्टीकरणे

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली असून सरकारच्या विरोधात रणनीती आखण्यासाठी महाविकास आघाडीने (MVA) बोलावलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला तब्बल 23 आमदारांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या अनुपस्थित आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश असल्याने महाविकास आघाडीचे टेन्शन…

Read More

हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला थेट जीवे मारण्याची धमकी:रवींद्र भोयेंची पोलिसांत धाव; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांचे पुत्र वामन खोसकर यांच्यावर, शिवसेनेा शिंदे गटाचे त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख रवींद्र भोये यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकाराबाबत रवींद्र भोये यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांकडे रीतसर लेखी तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे सत्ताधारी ‘महायुती’तील राष्ट्रवादी काँग्रेस आणि…

Read More