![]()
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी शनिवार, २० जून रोजी पूर्ण झाली आहे. या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २५ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत देण्यात आली आहे. या फेरीचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर २७ जूननंतर चौथ्या फेरीची प्रक्रिया सुरू केली जाईल. तिसरी फेरी गुरुवार, १८ जून रोजी सुरू झाली होती आणि २० जूनच्या मध्यरात्रीपर्यंत नोंदी स्वीकारण्यात आल्या. गेल्या तीन दिवसांपासून प्रवेशाचे पोर्टल सतत व्यग्र येत असल्याचा अनुभव अनेक विद्यार्थ्यांनी सांगितला. यावर्षी अकरावीचे सर्व प्रवेश केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन होत आहेत, त्यामुळे थेट महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येत नाही. शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, या तीन दिवसांत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची संधी देण्यात आली होती. तसेच, यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना भाग-१ (वैयक्तिक व शैक्षणिक माहिती) आणि भाग-२ (महाविद्यालयांचा पसंतीक्रम) मध्ये आवश्यक ते बदल करण्याची मुभा मिळाली होती. अनेक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपली माहिती अद्ययावत केली. तिसऱ्या फेरीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी सोमवार, २२ जून रोजी सकाळी १० वाजता पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. या यादीत कट-ऑफ गुण आणि महाविद्यालयांचे वाटप (अलॉटमेंट) यांचा समावेश असेल. यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील तीन दिवसांत, म्हणजेच २५ जूनच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागेल. २७ जून रोजी कोणत्या महाविद्यालयात कोणत्या माध्यमाच्या किती जागा भरल्या गेल्या आणि किती जागा शिल्लक आहेत, याची आकडेवारी पोर्टलवर जाहीर केली जाईल. त्यानंतर अकरावी प्रवेशाच्या चौथ्या फेरीचा प्रारंभ होईल.
Source link
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी पूर्ण:25 जूनपर्यंत प्रवेश, 27 जूननंतर चौथी फेरी सुरू होणार