![]()
राज्य सरकारने दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 22 जुलै रोजी साजरी होणारी त्यांची जयंती राज्यभर शासकीय स्तरावर साजरी केली जाणार असून, यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत शासनादेश जारी केला आहे. या दिवशी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचे अधिकृत आदेश राज्य शासनाने जारी केले. शासनाच्या या निर्णयामुळे अजितदादांच्या लोकसेवेचा वारसा आता अधिकृतपणे जपला जाणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागणीची दखल राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचा समावेश सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले असून, अजितदादांच्या महाराष्ट्राच्या विकासातील योगदानाचा गौरव करण्यात आला आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्येही होणार अभिवादन शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार, येत्या बुधवारी, २२ जुलै २०२६ रोजी राज्यभरात अजितदादा पवार यांची जयंती साजरी केली जाईल. या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, तसेच सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जाणार आहे. या कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ‘दादां’च्या योगदानाला शासनाची आदरांजली स्वर्गीय अजितदादांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत प्रशासनावर ठेवलेली मजबूत पकड आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी घेतलेले परिश्रम यामुळे त्यांनी जनमानसात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे त्यांना राजकारणात हक्काचे ‘दादा’ हे स्थान मिळाले होते. राज्य शासनाचा हा नवीन निर्णय म्हणजे त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाला आणि त्यांच्या अविरत लोकसेवेला दिलेली एक मोठी आणि कृतज्ञतापूर्वक आदरांजली मानली जात आहे. हेही वाचा.. तुकाराम मुंढेंची ग्राहकांसाठी मोठी घोषणा:’अन्न असो किंवा औषध, फक्त बोला… तक्रार आपोआप तयार होईल’, FDA चे अत्याधुनिक पोर्टल लाँच भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांविरोधात आता नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार नाही. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित नवीन तक्रार नोंदणी प्रणाली सुरू केली असून, मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलताच तक्रार आपोआप तयार होणार आहे. या सुविधेची माहिती FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली आहे. सविस्तर वाचा
Source link
मोठा निर्णय!:अजित पवार यांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी होणार; राज्य सरकारचा आदेश जारी