दिल्लीतील जंतरमंतर येथील ‘नीट’ (NEET) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तरुण वर्गाला (जेन-झेड) साद घालण्यासाठी पुण्यात आयोजित केलेल्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती सरकारमधील जलस
.
“पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रकार गंभीर; राहुल गांधींना कोणी गांभीर्याने घेत नाही”
पुण्यातील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पैसे देऊन आणल्याच्या चर्चांवर बोलताना विखे पाटील म्हणाले की, “अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या नावाने पैसे देऊन गर्दी जमवणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. लोकसभेत लागोपाठ तीनदा झालेल्या पराभवामुळे राहुल गांधींचे राजकीय वजन घटले आहे. आपली ढासळलेली प्रतिमा सुधारण्यासाठीच ते या आंदोलनांचा आसरा घेत आहेत. काँग्रेस सत्तेत असताना या नेत्यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न का दिसले नाहीत? ते तेव्हा झोपले होते का?” असा सवाल करत विखे पाटलांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

तसेच, विजय वडेट्टीवार यांच्या ‘भाजप राहुल गांधींना घाबरते’ या दाव्याचा समाचार घेताना विखे पाटील म्हणाले, “कोणी विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण आणि नौटंकी करत असेल, तर त्यामागचे सत्य जनतेसमोर आणणे हे आमचे कर्तव्यच आहे. विद्यार्थ्यांना राहुल गांधींचे वास्तव चांगलेच ठाऊक आहे, त्यामुळे त्यांचे ऐकण्याच्या मानसिकतेत आजचा तरुण नाही.”
रोहित पवारांवर खोचक टीप अन् ‘नीट’ परीक्षेबाबत मोठा निर्णय
राहुल गांधींच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी लावलेल्या बॅनरवर भाष्य करताना, “रोहित पवारांकडे आता बॅनरबाजी करण्याव्यतिरिक्त दुसरे काही कामच शिल्लक राहिलेले नाही,” असा घणाघाती टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, ‘नीट’ परीक्षेच्या घोळावर भाष्य करताना विखे पाटलांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे:
- राज्य सरकारकडे अधिकार हवेत: नीट परीक्षा केंद्रीय पातळीऐवजी राज्य सरकारनेच आयोजित कराव्यात, असा औपचारिक प्रस्ताव ते केंद्र सरकारकडे पाठवणार आहेत.
- कोचिंग क्लासेसची लूट थांबणार: परीक्षा राज्याकडे आल्यास सरकारी व अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांची जबाबदारी वाढेल आणि खासगी कोचिंग क्लासेसकडून विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.