![]()
महाराष्ट्रासह देशभरात कॉक्रोचजनता पार्टीने शाळांच्यादुरवस्थेबाबत स्कूल ठीक करोआंदोलन सुरू केलेले असतानाचआता ‘सीजेपी”पाठोपाठ‘एसएफआय” (स्टुडंट्सफेडरेशन ऑफ इंडिया) याविद्यार्थी संघटनेनेही आक्रमकपवित्रा घेतला आहे. संघटनेकडूनराज्यभरात १ सप्टेंबरपासून “शाळावाचवा, शाळा सुधारा’ हेआंदोलन छेडले जाणार आहे.विविध टप्प्यांत हे आंदोलन केलेजाणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतरसीजेपीने केलेले आंदोलन गाजल्यानंतर आता सीजेपीनेस्कूल ठीक करो आंदोलन सुरूकेले आहे. अभिजित दीपकेसहकारी देशभरात शाळांना भेटीदेत आहेत. विविध कारणांनी या भेटीही गाजत आहेत. असे असतानाच महाराष्ट्रातील सरकारी शाळांचे संरक्षण, सक्षमीकरण व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या मागणीसाठी स्टुडंट्सफेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थीसंघटनेने समविचारी संघटनाडीवायएफआयच्या मदतीनेराज्यात शाळा वाचवा, शाळासुधारा आंदोलनाची हाक दिलीआहे. “विद्यार्थी संख्या कमी आहेम्हणून शाळा बंद करणे हा उपायनाही. चांगले शिक्षक, उत्तमसुविधा दिल्यास सरकारी शाळांवरपालकांचा विश्वास पुन्हा निर्माणहोऊ शकतो,’ अशी भूमिकासंघटनांनी मांडली. १ सप्टेंबरपासूनया आंदोलनाला सुरुवात होणारआहे. अनोखे आंदोलन : जाधव शाळा बंद किंवा विलीन करण्याचीप्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी,शिक्षकांची सर्व रिक्त पदे तातडीनेभरण्यात यावीत, प्रत्येक शाळेचेपायाभूत सुविधा ऑडिट करूनआवश्यक निधी उपलब्ध करूनद्यावा, शाळांत ग्रंथालय, प्रयोगशाळा,डिजिटल सुविधा व शैक्षणिकसाहित्य पुरवण्यात यावे आदी. या आहेत प्रमुख मागण्या १ सप्टेंबर रोजी जि.प., पं.सं. येथेठिय्या आंदोलन केले जाईल. याआंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून ५सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिना”चेऔचित्य साधून राज्यभरातीलशासकीय कार्यालयांसमोर अनोखेआंदोलन केले जाणार आहे,अशीमाहिती राज्याध्यक्ष रोहिदास जाधवयांनी दिली.
Source link
'सीजेपी'नंतर आता 'एसएफआय’चे राज्यात 'शाळा वाचवा, शाळा सुधारा’ आंदोलन:1 सप्टेंबरपासून प्रारंभ, शिक्षकदिनी शासकीय कार्यालयांत भरवणार शाळा