Headlines

Admin

पोलिस चौकीसमोर ५० फुटांवर फोडले दुकान:पहाटे ४.३० वाजेची घटना : गस्तीवरील पाेलिसांचे पथक पुढे जाताच चाेरट्यांनी मारला डल्ला‎

प्रतिनिधी | जळगाव शनिपेठ आणि आसोदारोड परिसरात लाल रंगाच्या कारमधून आलेल्या चोरट्यांच्या टोळीने एकाच रात्रीत दोन दुकाने फोडली. शनिपेठ परिसरातील भिलपुरा पोलिस चौकीपासून अवघ्या ५० फुटांवर असलेले एक मेडिकल चोरट्यांनी फोडले. पहाटे चार वाजेपर्यंत पोलिस गस्तीवर होते. ते परतताच साडेचार वाजता चोरट्यांनी डल्ला मारला. यानंतर या टोळीने आसोदा रोडवरील एक हार्डवेअरचे दुकानही फोडले. दिलीप अनंत…

Read More

मोदी काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचले, 108 बटूंनी केला शंखनाद:14 किमीच्या रोड शोमध्ये फुलांचा वर्षाव, पंतप्रधानांनी हात हलवून अभिवादन केले

काशीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 14 किलोमीटर लांबीचा रोड शो केला. ते बीएलडब्ल्यू गेस्ट हाऊसवरून काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचले. गेटवरच 108 बटूंनी शंखनाद करत त्यांचे स्वागत केले. आता ते बाबा विश्वनाथांचे दर्शन-पूजन करत आहेत. रोड शो दरम्यान भाजप कार्यकर्ते ढोल-ताशांवर नाचताना दिसले. पंतप्रधानांचे जागोजागी स्वागत करण्यात आले. ताफ्यावर फुले उधळण्यात आली. पंतप्रधानांनी हात हलवून…

Read More

UP मधील बांदा सलग दुसऱ्या दिवशी सर्वात उष्ण, तापमान 45.6°C:राजस्थानमध्ये धुळीचे वादळ, उष्णतेपासून दिलासा नाही; उत्तराखंड-हिमाचलमध्ये गारपीट

देशातील अनेक शहरे उष्णतेच्या लाटेच्या (हीटवेव) विळख्यात आहेत. बहुतेक भागांमध्ये तापमान 40-46°C च्या दरम्यान आहे. मंगळवारीही उत्तर प्रदेशातील बांदा हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. येथे पारा 45.6°C नोंदवला गेला. याशिवाय, ओडिशातील झारसुगुडा येथे 45.3°C, महाराष्ट्रातील अकोला, वर्धा आणि अमरावती येथे 45°C पेक्षा जास्त तापमान होते. भीषण उष्णता आणि उष्माघातापासून वाचवण्यासाठी प्रयागराजमध्ये जागोजागी वॉटर एटीएम…

Read More

धार्मिक:बाभूळगावच्या सप्ताहात दीड हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ; गावातून टाळ-मृदंगाच्या गजरात कलशाची मिरवणूक

. सिल्लोड तालुक्यातील बाभूळगाव बु.येथे विठ्ठल रुखुमाई मंदिर वर्धापन दिनानिमित्त मंगळवार (दि.२१) रोजीपासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला होता. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताह,भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा समारोप मंगळवारी (दि.२८) रोजी काल्याच्या कीर्तनाने झाला. या समारोपप्रसंगी सकाळी संपूर्ण गावातून टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वरी पारायण व…

Read More

तुरुंगातून सुटूनही सोनम रघुवंशी इंदूरला येऊ शकणार नाही:कोर्टाच्या परवानगीशिवाय शिलॉंग सोडू शकणार नाही; जाणून घ्या जामीन कसा मिळाला?

इंदूरच्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी हत्याकांडात मोठे वळण आले आहे. मेघालयची राजधानी शिलॉन्गमध्ये हनिमूनदरम्यान पती राजाच्या हत्येची मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला अटकेनंतर सुमारे 320 दिवसांनी जामीन मिळाला आहे. मात्र, न्यायालयाने अट ठेवली आहे की, खटल्यादरम्यान सोनमला शिलॉन्गमध्येच राहावे लागेल. शिलॉन्ग न्यायालयाने सोमवारी तिचा जामीन मंजूर केला. मंगळवारी सोनमचे वडील देवी सिंह स्वतः शिलॉन्गला पोहोचले आणि…

Read More

माजी मंत्री दानवे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार:भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात

प्रतिनिधी | टाकळी जिवरग सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरग येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आणि कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात झाला. याप्रसंगी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. याप्रसंगी भाजपा नेते सुरेश बनकर, भाजपा अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष…

Read More

फुलंब्रीत अतिक्रमणांवर अखेर जेसीबी चालला:महात्मा फुले चौकाने घेतला मोकळा श्वास‎

प्रतिनिधी | फुलंब्री फुलंब्री शहराची डोकेदुखी ठरलेल्या वाहतूक कोंडीवर अखेर प्रशासनाने हातोडा चालवला आहे. छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फुलंब्री येथील महात्मा फुले चौकातील अतिक्रमणांवर नगरपंचायत, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन, पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत २६ पेक्षा अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त केली. ‘दिव्य मराठी””ने या समस्येबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत ही धडक कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गाचे…

Read More

पाटबंधारे विभागाकडून जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी काम सुरू:बंद असलेल्या जलविद्युत केंद्रासाठी ६ कोटी रुपये खर्च करून गार्ड वॉल

पैठण तालुक्यातील जायकवाडी धरण पायथ्याशी असलेले जलविद्युत केंद्र मागील तीन वर्षांपासून बंदच आहे, त्याच्या दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च होत असतानाही केंद्र सुरू होण्याबाबत अनिश्चितता कायम आहे. असे असतानाही पिचिंगसाठी ६ कोटी रुपयांची गार्ड वॉल उभारण्यात येत आहे. मात्र जलविद्युत केंद्राची दुरुस्ती होत नसल्याने व कधी होईल याची शाश्वती नसतानादेखील त्याच्या पायथ्याशी पाटबंधारे विभागाच्या वतीने ६ कोटी…

Read More

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे छत्रपती संभाजीनगरात स्वागत:‘जन्मभूमी ते कर्मभूमी’ असा प्रवास

प्रतिनिधी |छत्रपती संभाजीनगर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित ‘गोदा ते नर्मदा-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे सोमवारी (२७ एप्रिल) शहरात स्वागत करण्यात आले. बजाजनगर येथील ओएसिस चौकात सोहळ्यासाठी नागरिकांसह, महिलांनी गर्दी होती. बजाजनगर येथे बांधकाम सभापती सचिन गरड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोमवारी शहरात यात्रेचे आगमन होताच, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती…

Read More

वारंवार वीज खंडितमुळे ग्रामस्थ संतप्त:रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध

प्रतिनिधी | खुलताबाद ऐन उन्हाळ्यातील उकाड्यामुळे नागरिक त्रस्त असताना दिवसभरात अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होत आहे. या गंभीर समस्येकडे महावितरण प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी दि.२७ महावितरण कार्यालयात धडक दिली. ग्रामस्थांना संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे आधीच संतप्त असलेल्या नागरिकांचा रोष अधिकच उफाळून आला….

Read More