माणसे बदलल्याने पक्ष मजबूत होणार नाही:विचारांतील बदलामुळेच शिवसेनेवर मरणअवकळा, रावसाहेब दानवेंची आदित्य ठाकरेंवर टीका
शिवसेना ठाकरे गटात पक्षांतर्गत फेरबदलांच्या हालचाली सुरू असून, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर लवकरच ‘कार्याध्यक्ष’ पदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या संभाव्य नेतृत्व बदलावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. “केवळ माणसं बदलून पक्ष वाढत नसतो, तुम्ही विचारांना मुठमाती दिली…