Headlines

Admin

RTO विभागात मोठ्या रॅकेटचा आरोप:विजय वडेट्टीवारांच्या मागणीनंतर SIT चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात (RTO) भ्रष्टाचाराचे आणि बेकायदेशीर वसुलीचे एक मोठे रॅकेट कार्यरत असून, जे इमानदार अधिकारी या वसुलीला साथ देत नाहीत, त्यांना जाणीवपूर्वक एसीबीच्या (ACB) जाळ्यात अडकवले जाते, असा अत्यंत खळबळजनक आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. या आरोपांसोबतच त्यांनी काही अधिकाऱ्यांची नावे आणि ऑडिओ क्लिप्स सभागृहात सादर केल्याने एकच खळबळ…

Read More

चांदी ₹4,408 ने घसरून ₹2.29 लाखांवर:सोने ₹1,442 ने स्वस्त होऊन ₹1.44 लाखांवर; जूनमध्ये सोने ₹15 हजार, चांदी ₹38 हजार स्वस्त झाली

आज म्हणजेच 7 जुलै रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,442 रुपयांनी घसरून 1.44 लाख रुपये झाला आहे. तर, 1 किलो चांदीचा भाव 4,408 रुपयांनी घसरून 2.29 लाख रुपयांवर आला आहे. यापूर्वी, गेल्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये सोने-चांदीच्या दरात घसरण झाली होती. गेल्या…

Read More

देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान:मुसळधार पावसातही भक्तिमय वातावरण, नव्या चांदीच्या रथातून पादुकांचा सोहळा

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला आज देहूतून उत्साहात प्रारंभ होत आहे. मुसळधार पावसामुळे आणि इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे प्रशासनाने काही निर्बंध लागू केले असले, तरी वारकऱ्यांचा उत्साह कायम असून संपूर्ण देहूनगरी “ज्ञानोबा-तुकोबा”च्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. पुढील 18 दिवसांचा पंढरपूरच्या दिशेने निघणारा हा भक्तिमय प्रवास आज सुरू होत आहे. संत तुकाराम महाराज मंदिर फुलांच्या…

Read More

खडकवासला धरण 76 टक्के भरले, मुठा कालव्यातून विसर्ग सुरू:पाणीपातळी वाढल्याने नदीपात्रात न उतरण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ झाली असून, मंगळवारी धरण 76 टक्के क्षमतेने भरले आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे नवीन मुठा कालव्यातून 500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात होत असलेला मुसळधार पाऊस आणि धरणात येणारा पाण्याचा वाढता ओघ पाहता, येत्या काही तासांतच…

Read More

धर्मेंद्र यांची शेवटची इच्छा-हेमा मालिनीने मुलांसोबत एकत्र राहावे:सनी-बॉबीबद्दल म्हटले- आम्ही प्रसिद्धी करत नाही, आम्ही कुटुंब आहोत; मृत्यूच्या फेक न्यूजवर प्रतिक्रिया

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर काही महिन्यांनी आता हेमा मालिनी यांनी त्यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, निधनापूर्वी काही काळ आधी धर्मेंद्र यांनी त्यांना जवळ बोलावून सांगितले होते की, मुलांसोबत मिळून मिसळून राहा. यावेळी हेमा मालिनी यांनी सावत्र मुले सनी-बॉबी यांची प्रशंसा केली आणि धर्मेंद्र यांच्या निधनाची खोटी बातमी आल्यावर नाराजी व्यक्त केली…

Read More

अवघ्या दोन महिन्यांत रस्त्याचे काय हाल झाले?:मिसिंग लिंक'वरील दुर्घटनेवरून रोहित पवार, दानवे, राऊतांसह देशपांडेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने विरोधकांनी महायुती सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन अवघे 2 महिने होत असताना बोगद्यात पाण्याची गळती, रस्त्यांवर तडे आणि दरड कोसळल्याच्या घटनांमुळे कामाच्या…

Read More

E10 गाड्यांमध्ये E20 इंधनामुळे मायलेज कमी होऊ शकते:रबरचे भागही खराब होऊ शकतात; ARAI च्या इंजिन चाचणी अहवालात खुलासा

ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच ARAI च्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, जुन्या E10 कंप्लायंट गाड्यांमध्ये E20 इंधनाचा वापर केल्यास इंधन प्रणालीचे रबर पार्ट्स खराब होऊ शकतात. मात्र, हा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. 10 प्रश्नांच्या उत्तरात संपूर्ण प्रकरण समजून घ्या… प्रश्न 1: ARAI च्या या अहवालात सर्वात महत्त्वाची गोष्ट काय…

Read More

इंद्रायणी पुरामुळे आळंदी पालखी सोहळ्यावर निर्बंध:केवळ मर्यादित भाविकांनाच मंदिरात प्रवेश, 8 जुलैला सोहळा

इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे यंदाचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात हा सोहळा साधेपणाने आणि कडक नियमांच्या अधीन राहून आयोजित केला जाईल. संततधार पाऊस आणि पूरपरिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव हा…

Read More

अंशुला कपूरचे रोहन ठक्करसोबत लग्न झाले:सावत्र बहिणी जान्हवी-खुशीने विधी पार पाडले, मंडपाजवळ दिवंगत आईचा फोटो, अर्जुन कपूर भावूक

बोनी कपूर यांची मुलगी आणि अर्जुन कपूर यांची बहीण अंशुला कपूरने 6 जुलै रोजी रोहन ठक्करसोबत लग्न केले आहे. या लग्नात कपूर कुटुंबातील अनेक सदस्यांव्यतिरिक्त चित्रपटसृष्टीतील अनेक मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली. लग्न पारंपरिक हिंदू रितीरिवाजांनुसार झाले, ज्यात सावत्र बहिणी जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांनीही विधी पार पाडले. तर मोठा भाऊ अर्जुन कपूर अंशुलाला मंडपापर्यंत…

Read More

मुंबईत भरवस्तीत शिरली 7 फुटांची महाकाय मगर – VIDEO:पवई तलावाजवळ उडाली खळबळ, पाहा थरारक रेस्क्यू

मुंबईतील पवई तलाव परिसरात मगरींचा वावर नवीन नाही, मात्र जेव्हा ही मगर थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचते, तेव्हा काय परिस्थिती ओढवते, याचा थरारक अनुभव रविवारी स्थानिकांनी घेतला. पवई तलावाजवळील मोरारजी नगर परिसरात चक्क ७ फूट लांबीची महाकाय मगर भरवस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. येथील एका दर्ग्याबाहेर ही मगर आढळून आल्याने लोकांची चांगलीच तारांबळ उडाली होती….

Read More