Headlines

Admin

जगन्नाथ धामची अनोखी परंपरा:365 दिवसांनंतर जमिनीतून खास फुलुरी तेल बाहेर आले, रथयात्रेपूर्वी उपचार आणि शृंगार सुरू झाला

आषाढ कृष्ण पक्षाच्या पंचमीला (रविवार) ओडिशातील पुरी येथील बडा ओडिया मठात एका गुप्त ठिकाणाहून जमिनीखाली पुरलेला मातीचा घडा बाहेर काढण्यात आला. यात 365 दिवसांपासून ठेवलेले विशेष औषधी तेल ‘फुलुरी तेल’ होते. परंपरेनुसार, दैतापती सेवक (विशेष) हे तेल भक्ति यात्रेसह श्रीमंदिरात घेऊन पोहोचले आणि भगवान जगन्नाथांच्या श्रीअंगावर श्रद्धेने त्याची मालिश करण्यात आली. यामुळे महाप्रभूंच्या शरीरातील वेदना…

Read More

फ्लाइटचे तिकीट रद्द केल्याने पत्नीने केली आत्महत्या:पती लखनौमधील बँकेत डिप्टी मॅनेजर, हनिमूनसाठी काश्मीरला जाणार होते

लखनौमध्ये एका खासगी बँकेच्या उपव्यवस्थापकाच्या पत्नीने शनिवारी आत्महत्या केली. त्यांचे 4 महिन्यांपूर्वी 26 फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. पती कमलाकांतचा दावा आहे की, पत्नी सोनाली (24) सोबत ते हनीमूनसाठी विमानाने काश्मीरला जाणार होते. अचानक विमानाचे तिकीट रद्द करून रेल्वेचे तिकीट काढावे लागले. यामुळे पत्नी नाराज झाली. दुसऱ्या दिवशी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनुसार, कमलाकांत…

Read More

सतलुज:दिग्दर्शक हनी त्रेहान म्हणाले- पंजाबच्या राजकारणात वर्षानुवर्षे दडलेल्या वेदनेची कथा आहे हा चित्रपट

दिलजीत दोसांझ अभिनीत ‘सतलुज’ साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर झी5 वर येत आहे. याचे दिग्दर्शक हनी त्रेहान यांनी एका खास मुलाखतीत चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंतचा संघर्ष आणि जसवंत सिंग खालरा यांची कथा पडद्यावर आणण्याच्या प्रवासावर चर्चा केली… हनी त्रेहान म्हणतात की, ‘सतलुज’चे सर्वात मोठे आव्हान चित्रपट बनवणे नव्हते, तर तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे होते. शूटिंगपासून ते पोस्ट-प्रोडक्शनपर्यंत कोणत्याही प्रकारचा…

Read More

काय ऑपरेशन टायगर लावले आहे? लाजा नाही वाटत?:अमित ठाकरे संतापले, मिसिंग लिंक प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवरही टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या एकंदरीत परिस्थितीवर भाष्य करताना संताप व्यक्त केला आहे. काय ऑपरेशन टायगर लावले आहे? लाजा नाही वाटत? उघडपणे तुमच्या तोंडावर लोक मरतायत आणि आपण पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडतोय. निर्लज्जपणे सगळं सुरू आहे, अशा शब्दांत अमित ठाकरे यांनी टीका केली आहे. अमित ठाकरे म्हणाले, भीषण परिस्थिती…

Read More

मुंबई एटीसी कोंडीमुळे नागपूर विमानतळाला फटका:मुंबई-नागपूर विमान रद्द, इतर विमानांना मोठा विलंब

मुंबई विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) कोंडीमुळे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईहून नागपूरला येणारी आणि जाणारी अनेक विमाने विलंबाने धावत आहेत, तर काही रद्द करण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कोंडीमुळे इंडिगोचे मुंबई-नागपूर-मुंबई दरम्यान धावणारे ‘६इ-६८०२/५१७५’ हे विमान तांत्रिक आणि ऑपरेशनल कारणांमुळे रद्द…

Read More

मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली:सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी

मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस प्रशासन तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळी पाहणीनंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात अचानक बदल झाला….

Read More

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण:पुण्यात संशयित आरोपी सियाच्या घराबाहेर गुलाबो गँगचे 'जोडे मारो' आंदोलन, निष्पक्ष तपासाची मागणी

पुण्यात केतन अग्रवाल यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी आणि निष्पक्ष तपासाच्या मागणीसाठी सोमवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. ‘पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’, ‘गुलाबो गँग’ आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी संशयित आरोपी सिया गोयल हिच्या मार्केट यार्ड येथील लीलाकुंज निवासस्थानाबाहेर ‘जोडे मारो’ आंदोलन केले. आंदोलनादरम्यान सहभागी कार्यकर्त्यांनी आरोपी सिया गोयल आणि तिच्या कुटुंबीयांच्या कथित वर्तनावर तीव्र संताप…

Read More

बद्रीनाथ देणगी वाद- बीकेटीसीच्या चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह:भैरव सेना म्हणाली- सध्या थेट पुरावे नाहीत, म्हणून SIT चौकशी व्हावी; CM धामी यांना पाठवले पत्र

अयोध्या येथील राम मंदिरात देणगीवरून निर्माण झालेल्या वादामुळे आता बद्रीनाथ धाममधील देणगीत कथित गैरव्यवहाराच्या आरोपाचे प्रकरणही वाढत चालले आहे. हे प्रकरण समोर आणणारे भैरव सेना उत्तराखंडचे अध्यक्ष संदीप खत्री यांनी डेहराडूनमध्ये पत्रकार परिषद घेऊन श्री बद्री-केदार मंदिर समितीने (BKTC) स्थापन केलेल्या चार सदस्यीय चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांचे म्हणणे आहे की, सध्या संघटनेकडे आरोपांची…

Read More

औंढा पंचायत समिती अपहार प्रकरण:सीईओंच्या पत्राला बीडीओकडून केराची टोपली, अंतिमपत्र देऊनही कारवाई होईना

औंढा नागनाथ पंचायत समितीमधील ५७ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाला गटविकास अधिकाऱ्याने केराची टोपली दाखवली आहे. विशेष म्हणजे अंंतिम संधी देण्याचे पत्र देऊनही कारवाई होत नसल्याने आता जिल्हा परिषदेकडून काय भुमीका घेतली जाणार याकडे औंढा तालुक्याचे लक्ष लागले आहे. औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये कपातीच्या रकमेमध्ये तब्बल ५७ लाख…

Read More

दूध भेसळ रॅकेट उघड, टोळीवर गंभीर गुन्हा दाखल:पुणे ग्रामीणमध्ये सखोल तपास सुरू, आरोग्याशी खेळ उघड

पुणे ग्रामीणमधील मंचर पोलिस ठाण्यात दूध भेसळीच्या एका संघटित रॅकेटवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत फसवणूक, बनावटपणा आणि कट रचण्यासह अनेक गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. तपास यंत्रणांनी हा प्रकार केवळ निकृष्ट दर्जाचे दूध विकण्यापुरता मर्यादित नसून ग्राहकांच्या आरोग्याशी जाणीवपूर्वक खेळ केल्याचा…

Read More