मुंबई एटीसी कोंडीमुळे नागपूर विमानतळाला फटका:मुंबई-नागपूर विमान रद्द, इतर विमानांना मोठा विलंब
मुंबई विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) कोंडीमुळे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईहून नागपूरला येणारी आणि जाणारी अनेक विमाने विलंबाने धावत आहेत, तर काही रद्द करण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कोंडीमुळे इंडिगोचे मुंबई-नागपूर-मुंबई दरम्यान धावणारे ‘६इ-६८०२/५१७५’ हे विमान तांत्रिक आणि ऑपरेशनल कारणांमुळे रद्द…