Headlines

Admin

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक निष्ठेचे अनोखे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. नातेवाईकांच्या अनुपस्थितीत परतानी यांनी ही जबाबदारी स्वीकारली. संबंधित ८७ वर्षीय महिला भक्त अनेक वर्षांपासून श्री महारुद्र मारुती संस्थानच्या नित्य भक्त होत्या. त्या नियमितपणे अमरावतीहून जहागीरपूर येथे…

Read More

कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन:मान्यवरांची व्याख्याने, वृक्षारोपण; गुणवंत कामगारांचा सत्कारही झाला

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ७३ वा वर्धापन दिन स्थानिक कार्यालयातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे, मान्यवरांच्या व्याख्यानांचे आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रम कामगार कल्याण मंडळाच्या रामनगर येथील ललित कला भवन येथे आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्याला युवा स्वाभिमान पक्षाचे सुनीलभाऊ राणा, अमरावती महानगरपालिकेच्या…

Read More

Online Fraud & Digital Arrests Can Rise; WhatsApp Username Deadline Extended

Marathi News Business Govt Warns: Online Fraud & Digital Arrests Can Rise; WhatsApp Username Deadline Extended नवी दिल्ली16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सॲपच्या वादग्रस्त युझरनेम फीचरवर उत्तर देण्यासाठी मेटाची मुदत तीन दिवसांनी वाढवली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, आता कंपनीला 9 जुलैपर्यंत आपले उत्तर सादर करावे लागेल. यापूर्वी सरकारने…

Read More

एकाच वेळी 24 आध्यात्मिक पुस्तकांचे प्रकाशन, नवा विक्रम:ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

पुणे येथे प्रसाद प्रकाशन आणि अनाहत प्रकाशनच्या वतीने एकाच वेळी २४ आध्यात्मिक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यात ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरणही झाले. या कार्यक्रमाचे आयोजन नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात करण्यात आले होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना कै. मनोहर य. जोशी स्मृती गौरव…

Read More

माजी पंतप्रधान चंद्रशेखर जन्मशताब्दीनिमित्त परिसंवादास चांगला प्रतिसाद:अरुण श्रीवास्तव: समाजवादी विचार पुढे नेण्याची आज गरज

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात ‘चंद्रशेखर: विचार आणि सद्यस्थिती’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाला चांगला प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ समाजवादी नेते अरुणकुमार श्रीवास्तव यांनी समाजवादी विचार पुढे नेण्याची आज कधी नव्हे इतकी गरज असल्याचे मत व्यक्त केले. एस. एम. जोशी फाऊंडेशन, नवी पेठ, पुणे येथे रविवारी हा परिसंवाद पार पडला. कार्यक्रमाच्या…

Read More

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप केला

दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती सुतार गंभीर जखमी झाल्या होत्या. एम्समध्ये नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनुसार, आकृती दक्षिण दिल्लीतील पुष्प विहार येथील रहिवासी होत्या आणि छतरपूरमधील एका खासगी कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होत्या….

Read More

अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात 48 तासांत 5.13% वाढ:मध्य प्रदेश सीमेवरील पावसामुळे 28.70 दलघमीने वाढला जलसाठा

अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात गेल्या ४८ तासांत ५.१३ टक्क्यांची वाढ झाली आहे. मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे हा जलसाठा २७.७० दशलक्ष घनमीटरने (दलघमी) वाढला आहे, ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी धरणाचा जलसाठा २५७.७१ दलघमी (४५.६० टक्के) होता. आता तो २८६.१५ दलघमीवर पोहोचला आहे. जलसंपदा…

Read More

मुधोळकर पेठ मनपा उद्यानाची दूरवस्था:व्यायामाचे साहित्य तुटले, गवत वाढले; नागरिकांमध्ये संताप

अमरावती शहरातील मुधोळकर पेठ येथील महानगरपालिकेचे उद्यान सध्या दूरवस्थेत असून देखभालीअभावी ते अस्वच्छ झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उद्यानातील व्यायामाचे साहित्य तुटले असून, वाढलेल्या गवतामुळे पायी फिरणेही कठीण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी नागरिकांच्या आरोग्यासाठी बसवण्यात आलेले ओपन जीमचे साहित्य मोठ्या प्रमाणात तुटले आहे. उद्यानात ठिकठिकाणी गवत आणि झुडपे वाढली असून,…

Read More

गारपीटग्रस्त कांदा, केळी उत्पादक मदतीच्या प्रतीक्षेत:2 महिन्यांनंतरही नुकसानभरपाई मिळाली नाही

अंजनगाव बारी परिसरातील कांदा आणि केळी उत्पादक शेतकरी मे महिन्यात झालेल्या वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. पंचनामे पूर्ण होऊन दोन महिने उलटले असले तरी, अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही, त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी उत्पादक शेतकरी निखिल श्रीकृष्ण भोपळे यांच्या दोन एकरांतील सुमारे…

Read More

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून 15 लाखांची फसवणूक:तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिसांत गुन्हा दाखल

शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची १५ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२१ पासून सुरू होता.साक्षर रोहिदास म्हस्के (वय ५८, रा. अष्टविनायक सोसायटी, फुरसुंगी), बाळासाहेब पाटील (वय ६२, रा. मोशी, भोसरी) आणि अनिल अप्पासाहेब नवले (वय ६०, रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या…

Read More