Headlines

Admin

जानेवारी 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित:अर्ज करण्यासाठी डिसेंबर 2026 पर्यंत मुदत – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांच्या निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासकीय जमिनींवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तींनी डिसेंबर २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा.जी सी. यांनी केले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ आणि महाराष्ट्र जमीन महसूल…

Read More

अंगावर शहारे आणणारे 'छत्रपती' गीत प्रेक्षकांच्या भेटीला:अजय-अतुलच्या संगीताने सजलेले 'राजा शिवाजी' चित्रपटाचे भव्य 'अँथम' प्रदर्शित

‘जिओ स्टुडिओज्’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने साकार होणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाचे पहिले गाणे, राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’, आज अधिकृतरीत्या प्रदर्शित झाले आहे. भारतीय इतिहासाचा तेजस्वी वारसा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अतुलनीय पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याचा स्वाभिमान यांना समर्पित असलेले हे गीत म्हणजे केवळ संगीत नसून शौर्य आणि अभिमानाचा एक भव्य…

Read More

माणसे बदलल्याने पक्ष मजबूत होणार नाही:विचारांतील बदलामुळेच शिवसेनेवर मरणअवकळा, रावसाहेब दानवेंची आदित्य ठाकरेंवर टीका

शिवसेना ठाकरे गटात पक्षांतर्गत फेरबदलांच्या हालचाली सुरू असून, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर लवकरच ‘कार्याध्यक्ष’ पदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या संभाव्य नेतृत्व बदलावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. “केवळ माणसं बदलून पक्ष वाढत नसतो, तुम्ही विचारांना मुठमाती दिली…

Read More

ओप्पो F33 सिरीज भारतात लॉन्च, किंमत ₹31,999 पासून सुरू:50MP सेल्फी कॅमेरा व 7000mAh बॅटरी; 85°C गरम पाण्यातही खराब होणार नाही फोन

टेक कंपनी ओप्पो ने आज (15 एप्रिल) भारतात आपली नवीन 5G स्मार्टफोन सिरीज ‘ओप्पो F33’ लॉन्च केली आहे. यात दोन मॉडेल- ओप्पो F33 आणि ओप्पो F33 प्रो सादर करण्यात आले आहेत. यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे मजबूतपणा आणि शक्तिशाली बॅटरी आहे. यांना IP69K रेटिंग देण्यात आली आहे, याचा अर्थ असा की हा फोन केवळ पाणी…

Read More

महापालिकेत आत्मे दिसतात, तिथे मुडदे गाढले जायचे:पालिकेचे ग्रहण सुटण्यासाठी इमारत बदला, मंत्री संजय शिरसाट यांचे अजब विधान

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महापालिकेच्या इमारतीबाबत केलेल्या एका अजब आणि खळबळजनक विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. “ज्या जागेवर महापालिकेची इमारत उभी आहे, तिथे पूर्वी मुडदे गाढले जायचे. हा कब्रस्तानचा भाग असल्याने तिथे आत्मे फिरतात आणि त्यामुळेच तुम्ही बेचैन होता,” असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी यांनी केले आहे. या विधानामुळे…

Read More

मोहालीत युवतीने पाचव्या मजल्यावरून उडी मारली:स्कूटीवरून आली; बॅगमधून आधार कार्ड आणि लंच बॉक्स मिळाला, अंबाला येथील रहिवासी

मोहालीच्या सिटी सेंटरमध्ये एका तरुणीने पाचव्या मजल्यावरून उडी मारली. पोलिसांना तरुणीची बॅग मिळाली आहे. त्यात मोबाईल आणि इतर सामान सापडले आहे. तरुणी अंबालाची रहिवासी आहे. तरुणीला झिरकपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे तिची प्रकृती गंभीर आहे. तरुणीचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. सिटी सेंटर चंदीगड एअरपोर्ट रोडवर स्थित आहे….

Read More

बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकली ठार:विर्शी येथील घटना, साकोली तालुक्यात मानव – वन्यजीव संघर्ष शिगेला

साकोली तालुक्यात मानव- वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे. याआधी एका नरभक्षक वाघिणीने दोघांचा जीव घेतला. तर अन्य एका हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. या घटनांची शाई वाळत नाही तोच बुधवार १५ एप्रिल रोजी पहाटे ५ च्या सुमारास विर्शी परिसरात मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका पाच वर्षीय चिमुकलीच्या नरडीचा घोट घेतल्याची घटना घडली. आशिका…

Read More

धर्मेंद्र यांच्या आठवणीत बॉबी देओल भावुक:वडिलांसोबत अधिक वेळ न घालवल्याचा पश्चात्ताप; म्हटले- दुःखाने ईशा आणि अहाना यांना जवळ आणले

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला सुमारे 140 दिवस उलटून गेले आहेत. त्यांचे धाकटे पुत्र बॉबी देओल यांनी वडिलांच्या निधनानंतर आपली पहिली मुलाखत दिली आहे. बॉबी यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांच्या मृत्यूने त्यांना आतून हादरवून टाकले आहे. यावेळी त्यांनी आपल्या पश्चात्तापाबद्दल आणि सावत्र बहिणी ईशा व अहाना देओल यांच्यासोबतच्या बदलत्या संबंधांबद्दलही मनमोकळेपणाने सांगितले. वडिलांसोबत अधिक वेळ…

Read More

ST चालनीय उत्पन्न 11,475 कोटींवर:591 कोटींचा तोटा, 31 पैकी 8 विभाग नफ्यात; परिवहन मंत्र्यांचे तोटा कमी करण्याचे स्पष्ट निर्देश

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिलेत. उपलब्ध बस व मनुष्यबळाचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करून दीड ते दोन कोटी रुपयांचा दैनंदिन तोटा भरून काढणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. विशेषतः तोट्यातील विभागांची योग्य कारणमिमांसा करून त्यावर ठोस उपाययोजना राबवावी, असे ते म्हणालेत. आज महाराष्ट्र राज्य मार्ग…

Read More

IMF Predicts India GDP 2026 $4.15 Trillion, UK Regains 5th Spot

नवी दिल्ली19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारत जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. गेल्या तीन वर्षांपासून भारत पाचव्या स्थानावर होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या ताज्या आकडेवारीनुसार, आता ब्रिटन (UK) पुन्हा एकदा भारताच्या पुढे गेला आहे. भारताच्या जीडीपीमधील ही घसरण डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे झाली आहे. IMF चा अंदाज: 2026 मध्ये भारताची जीडीपी $4.15…

Read More