Headlines

Admin

लग्नाच्या 10 वर्षानंतर आई झाली दिव्यांका त्रिपाठी:41व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिला, घोषणा करून लिहिले- माझे करण-अर्जुन आले

टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लग्नाच्या 9 वर्षांनंतर आई झाली आहे. त्यांनी मंगळवारी मुंबईत जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. अभिनेत्री आणि त्यांचे पती विवेक दहिया यांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. दिव्यांका-विवेकने अधिकृत सोशल मीडियावर कोलेब पोस्ट जारी करत लिहिले, ‘अखेर प्रतीक्षा संपली आहे. आमचे मुलगे आले आहेत आणि आयुष्य आता पूर्वीपेक्षाही…

Read More

क्या रे जॉनी, म्हणत टपली मारली अन् तरुणाचा जीव गेला:नागपुरात क्षुल्लक कारणातून खून; किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट

नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने भीषण वळण घेत एका तरुणाचा जीव गेला आहे. कावरापेठ परिसरात भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण घटनेचा थरार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर उमरेड शहरात एकच खळबळ उडाली असून…

Read More

Prakash Ambedkar Demands UPSC Conduct NEET Exam; Questions Ministers Resignation

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? त्यांचा उद्दामपणा व अहंकार . नीट 2026 परीक्षा गत 3 मे रोजी झाली. पण अवघ्या 3 दिवसांतच हा पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले. अखेर नॅशनल…

Read More

गुन्हेगारी थांबवता येईना अन् गरिबांचे धंदे बंद करताय:पुण्यात रात्री 10 नंतर दुकानबंदीच्या निर्णयावर सुप्रिया सुळे संतापल्या

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिस प्रशासनाने लागू केलेल्या रात्रीच्या निर्बंधांवरून सरकार आणि प्रशासनावर कडाडून हल्ला चढवला आहे. पुण्यात चौदा दिवसांचे प्रतिबंधात्मक आदेश लागू करत रात्री 10 नंतर खाऊ गल्ल्या, फेरीवाले आणि छोट्या व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत, 24 तास धावणाऱ्या या शहरात…

Read More

इंधन दरवाढीचा फटका स्कूल बस मालकांना:शाळा आठवड्यातून 3 दिवस भरवून उर्वरित 2 दिवस ऑनलाईन वर्ग घेण्याची मागणी

राज्यातील शाळा आठवड्यातून 3 दिवसच भरवा आणि उर्वरित 2 दिवस ऑनलाईन वर्ग सुरू ठेवा, अशी मागणी राज्यातील स्कूल बस संघटनेने केली आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना कोरोना काळासारखेच ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळण्याची शक्यता आहे. उन्हाळी सुट्ट्यानंतर जून महिन्यात पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजेल. सर्वत्र विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकू येईल. पण राज्यातील इंधन संकट…

Read More

पुण्यात गरीब रुग्णांसाठीच्या हजारो खाटा रिकाम्याच:पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह; सक्षम यंत्रणेची मागणी

पुणे शहरात गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या हजारो मोफत खाटा रिकाम्याच राहत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अतिरिक्त एफएसआयच्या बदल्यात खासगी रुग्णालयांना गरीब रुग्णांना मोफत उपचार देणे बंधनकारक असतानाही, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या उदासीन कारभारामुळे गरजू रुग्ण या सुविधेपासून वंचित राहत असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. शहरातील अनेक मोठ्या…

Read More

सावरकर बदनामी प्रकरण:"त्या" बड्या सर्च इंजिन अन् नामांकित वृत्तपत्राविरोधात अटक वॉरंट काढा, सात्यकी सावरकरांचा कोर्टात अर्ज

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बदनामी प्रकरणात आवश्यक कागदपत्रे व माहिती सादर न केल्याने एका समाज माध्यम व सर्च इंजिन तसेच एका नामांकित वृत्तपत्राविरोधात अटक वॉरंट काढण्यात यावे, असा अर्ज सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मार्च 2023 मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी…

Read More

चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा एल्गार!:शेतकरी मरतोय अन् सत्ताधारी जागावाटपात व्यस्त!- रोहित पवार, सरकारने कांदा खरेदीची पावती दाखवावी- अंबादास दानवे

चांदवड इथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी क्रांती मोर्चा काढला आहे. यामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. तीन हजार रुपये दराने शासकीय कांद्याची खरेदी करावी आणि विक्री झालेल्या कांद्याला पंधराशे रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान या आंदोलनावेळी बोलताना उबाठाचे अंबादास दानवे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळाला…

Read More

विकास लवांडेंना जामीन देण्यास पोलिसांचा विरोध:तक्रारदार, साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता; वारीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न

वारकरी संप्रदायाविषयी कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन देण्यास पुणे पोलिसांनी न्यायालयात विरोध केला आहे. लवांडे तक्रारदार आणि साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, तसेच आषाढी एकादशीनिमित्त आगामी वारी सोहळ्याच्या काळात अशा वक्तव्याची पुनरावृत्ती झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी कारणे पोलिसांनी दिली…

Read More

सिद्धिविनायक मंदिराचा होणार कायापालट:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडला नव्या आराखड्याचा मास्टरप्लॅन

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराचा लवकरच कायापालट होणार असून मंदिर परिसराला अत्याधुनिक आणि भव्य रूप देण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले. या विकास आराखड्यामुळे मंदिर परिसर अधिक आकर्षक, सुरक्षित आणि भाविकांसाठी सुलभ होणार असल्याची माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल…

Read More