ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमाला:देशाला पोखरणाऱ्या डाव्या विचाराच्या वाळवीचा धोका ओळखा, लेखक अभिजित जोग यांचे आवाहन
जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षांमुळे कुठल्याही क्षणी तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडू शकतो अशी परिस्थिती आहे. अशा काळात जगात काही विध्वंसक शक्ती संस्कृती नष्ट करण्याचे काम करत आहेत. भारतासह विविध देशांमध्ये मार्क्सवादी डाव्या विचाराच्या वाळवीने शिक्षण संस्था, प्रसारमाध्यमे, चित्रपट, साहित्य, राजकीय पक्ष आणि न्यायव्यवस्थेला पोखरून मोठे संकट निर्माण केले आहे. आपली कुटुंबव्यवस्था, धर्म आणि देशप्रेम संपवण्याचा…