Headlines

Admin

ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमाला:देशाला पोखरणाऱ्या डाव्या विचाराच्या वाळवीचा धोका ओळखा, लेखक अभिजित जोग यांचे आवाहन

जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षांमुळे कुठल्याही क्षणी तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडू शकतो अशी परिस्थिती आहे. अशा काळात जगात काही विध्वंसक शक्ती संस्कृती नष्ट करण्याचे काम करत आहेत. भारतासह विविध देशांमध्ये मार्क्सवादी डाव्या विचाराच्या वाळवीने शिक्षण संस्था, प्रसारमाध्यमे, चित्रपट, साहित्य, राजकीय पक्ष आणि न्यायव्यवस्थेला पोखरून मोठे संकट निर्माण केले आहे. आपली कुटुंबव्यवस्था, धर्म आणि देशप्रेम संपवण्याचा…

Read More

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला गती, पथदिव्यांचेही जिओ टॅगिंग करणार:पथदिवे देखभाल, दुरुस्ती पालिकाच करणार‎

मनपा स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षा व नागरी सुविधांशी संबंधित तीन निर्णय घेण्यात आले आहेत. पूर्व आणि उत्तर झोनमधील मोठ्या नाल्यांची सफाई करणे, शहरातील सर्व पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारे स . मनपा क्षेत्रातील एलईडी पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती व नवीन एलईडी लाइट्स लावणे, सीसीएमएसचा पुरवठा, स्थापना व देखभाल दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत…

Read More

एकनाथ शिंदेंना मनवण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी:विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी युतीत हालचाली

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यातील 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागांच्या वाटपावरून जोरदार चर्चा रंगली आहे. 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. 1 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार असून 2 जून…

Read More

गावाच्या सर्वंकष विकासासाठी मोरणा नदी स्वच्छता अभियानाचा श्रीगणेशा:ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन; पर्यावरण संवर्धनाचा केला निर्धार‎

“स्वच्छ नदी, हरित भविष्य व समृद्ध गाव’ या संकल्पनेवर आधारित चांदूर येथे प्रथमच गावकऱ्यांच्या श्रमदानावर आधारित मोरणा नदी स्वच्छता अभियानाचा रविवारी श्रीगणेशा झाला. या अभियानात संपूर्ण गाव, स्वयंसेवी संस्था, संघटना सहभागी होऊन नदी परिसर स्वच्छ करणार अ . जिल्ह्यात मोर्णा नदी ही एक प्रमुख नदी मानली जाते. चांदूर परिसरातून ती पुढे जाते. मात्र अलीकडे या…

Read More

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मसुदा समिती’ स्थापन:80 लाख एकल महिलांना होणार लाभ, स्वतंत्र धोरण आणणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य

राज्यातील विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आणि अविवाहित अशा एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, कायदेशीर, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रश्नांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या महिलांच्या सर्वंकष सक्षमीकरणासाठी सरकारने “एकल महिला धोरण मसुदा समिती” स्थापन केली आहे. असे स्वतंत्र धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. “साऊ एकल महिला समिती”चे राज्य…

Read More

भारतात आज क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक:अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाचे नेते दिल्लीत पोहोचले, जयशंकर अध्यक्षस्थान भूषवतील

भारत आज नवी दिल्लीत क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करेल. बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोटेगी सहभागी होतील. भारत सध्या क्वाड समूहाचे अध्यक्षपद भूषवत आहे. बैठकीत इंडो-पॅसिफिकची सुरक्षा, आर्थिक सहकार्य आणि सागरी सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होईल. ही…

Read More

दिव्य मराठी इम्पॅक्ट:अखेर पातोंडा गावातील शुद्ध पाणीपुरवठा झाला सुरळीत

अकोट तालुक्यातील पातोंडा गावातील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ‘दैनिक दिव्य मराठी’च्या ग्राउंड रिपोर्टनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सलग ४० ते ४५ दिवस नळ कोरडे, दूषित पाणी, महिलांची फरपट आणि ग्रामस्थांचे हाल या गंभीर वास्तवावर प्रकाशित झालेल्या बातमीचा परिणाम दिसून आला आहे. अखेर गावात शुद्ध नळ पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला आहे….

Read More

जनगणनेच्या कार्यातील शिक्षकाचा मृत्यू:विमाकवच लागू करण्यात यावे, शिक्षक संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; कुटुंबाला अर्थसाहाय्य आवश्यक‎

जनगणनेचे राष्ट्रीय कार्य करताना शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. हे कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांना विमा कवच लागू करण्यात यावे. अशी मागणी जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी तथा जनगणना अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. अ . जनगणना राष्ट्रीय कार्य आहे. नागरिकांनी दिलेल्या अचूक माहितीवर पुढील १० वर्षांसाठी जिल्ह्याच्या शाळा, दवाखाने, रस्ते, पाणीपुरवठा योजना, रेशन…

Read More

सेनगाव तालुक्यात वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू:पेरणीपूर्व मशागत करत असताना काळाचा घाला, भानखेडा गावावर शोककळा

सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथे शेतात नांगरणीचे काम करीत असतांना अचानक विज अंगावर पडल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ता. 25 रात्री घडली आहे. जगन सिताराम कोटकर (35) असे मयत शेतकऱ्याचे नांव असून या घटनेमुळे भानखेडा गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत महसूल विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भानखेडा येथील जगन कोटकर यांना भानखेडा शिवारात सुमारे…

Read More

कर्नाटक CM आणि उपमुख्यमंत्र्यांची आज राहुल-खरगे यांच्यासोबत बैठक:CM बदलण्याच्या अटकळी; सिद्धरामय्या म्हणाले- हाकमांडने बोलावले म्हणून आलो

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आज सकाळी 11 वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. राज्यात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळात बदलाच्या चर्चांदरम्यान, दोघे सोमवारी रात्री दिल्लीत पोहोचले. सिद्धरामय्या यांच्यासोबत कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर देखील होते. दिल्लीत पोहोचल्यानंतर सिद्धरामय्या म्हणाले – हायकमांडने बोलावले आहे, म्हणून आलो आहे. बैठकीचा अजेंडा…

Read More