Headlines

Admin

कोणालाही खबर नाही, एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठली:अमित शहांसोबत बंद दाराआड बैठक; गुप्त दिल्ली दौऱ्याने राजकारणात खळबळ

राज्यात विधान परिषद निवडणुकांच्या जागावाटपावरून महायुतीत हालचाली वेगाने सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुप्त दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. कोणालाही सुगावा लागू न देता एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी राज्यातील बदलत्या…

Read More

पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन:कुटासा-पातोंड्यातील प्रश्नावर काँग्रेस आक्रमक‎

तालुक्यातील कुटासा व पातोंडा परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता कपिल ढोके यांच्या नेतृत्वात एमजेपीचे उपअभियंता निखिल राऊत यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून कुटासा व पातोंडा येथील…

Read More

पतीच्या पार्थिवाजवळ पत्नी दोन दिवस बेशुद्धावस्थेत पडून:जनगणना कर्मचाऱ्यांमुळे मिळाली तत्काळ वैद्यकीय मदत‎

जनगणनेच्या कामासाठी गेलेल्या‎कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका वृद्ध‎महिलेला वेळीच वैद्यकिय मदत मिळू शकली.‎ही घटना शहरातील वार्ड क्रमांक १९ मधील ‎‎सर्कल क्रमांक ३ येथे उघडकीस आली. ‎‎प्राथमिक वैद्यकिय अंदाजानुसार दोन‎दिवसांपूर्वी वृद्ध पतीचा मृत्यू झाला व त्या ‎‎धक्क्यामुळे पत्नी त्यांच्याच पार्थिवाजवळ‎बेशुद्ध अवस्थेत पडून होती. योग्य वेळी मदत ‎‎मिळाल्याने तिचा जीव वाचला.‎ जनगणनेचे काम सुरू असताना ब्लॉक‎क्रमांक १५ च्या प्रगणक…

Read More

पलंगावरून भांडल्या माय-लेकी, वडिलांचा हार्टअटॅकने मृत्यू:आईला झोपलेले पाहून मुलगी भडकली; समजावण्यासाठी गेलेले वडील पडले ते उठलेच नाहीत

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात आई आणि मुलीमध्ये पलंगावरून भांडण झाले. हे पाहून वडिलांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण वादादरम्यान वडिलांच्या छातीत दुखू लागले. जमिनीवर पडताच त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता आहे. कोतवाली पोलिसांनुसार, ही घटना चिटणीस की गोठ येथील वैकुंठ अपार्टमेंटमध्ये घडली. मृताची ओळख अनिल कपूर अशी झाली आहे. ते त्यांची दुसरी पत्नी रितू…

Read More

कयाधू नदी घेणार मोकळा श्वास!:5 लाख घनमीटर गाळ काढण्यास सुरुवात; 50 कोटी लीटर पाणी साठणार

हिंगोली जिल्ह्याची जीवनदायीनी म्हणून ओळख असलेल्या कयाधू नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणाचे काम मृद व जल संधारण विभागाच्यामार्फत हाती घेण्यात आले असून ता. 21 जून पर्यंत तब्बल 5 लाख घनमीटर गाळ काढण्याचे प्रयत्न आहेत. यातून तब्बल 50 कोटी लिटर पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेती सिंचनासोबत भुगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या…

Read More

व्यक्ती निर्माण ते राष्ट्र निर्माण हाच महासत्तेचा मार्ग- खासदार डॉ.बोंडे:‘मल्टीपर्पज फाउंडेशन’तर्फे 10 वी आणि 12 वीच्या गुणवंतांचा गौरव‎

“देशाचा विकास करायचा असेल तर सर्वात आधी तरुणांचे चारित्र्य आणि व्यक्ती निर्माण होणे गरजेचे आहे. ‘व्यक्ती निर्माण ते राष्ट्र निर्माण’ हाच भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचा एकमेव मार्ग आहे. जेव्हा या देशातील युवा पिढी सक्षम, सुशिक्षित आणि राष्ट्रप्रेमाने प्रेरित होईल, तेव्हाच समर्थ युवा, समर्थ भारत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते…

Read More

जि.प. बदल्यांचा तिढा मंत्रालयात; मंत्री जयकुमार गोरे यांना साकडे:स्थगित केलेल्या बदल्या सुरू कराव्यात, कर्मचारी संघटना‎

जनगणनेमुळे स्थगित केलेल्या बदल्या तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने केली आहे. त्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना प्रदेश पदाधिकाऱ्यांमार्फत साकडे घालण्यात आले असून या मुद्याचा इतरही मंत्र्यांच्या दालनात पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान याच मागणीचे निवेदन राज्याचे कार्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने, प्रसिद्धी प्रमुख तथा जिल्हा उपाध्यक्ष हेमंतकुमार…

Read More

यूपीच्या उपमुख्यमंत्र्यांच्या चार्टर्ड विमानाचे एक इंजिन बंद:सुरु करताच धूर निघाला; मुरादाबादमध्ये उड्डाण करणार होते

यूपीचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्या सरकारी चार्टर्ड प्लेनचे मुरादाबादमध्ये सोमवारी संध्याकाळी 4:10 वाजता एक इंजिन निकामी झाले. उड्डाण घेण्यासाठी वैमानिकाने इंजिन सुरू करताच, त्यातून धूर येऊ लागला. त्यावेळी ब्रजेश पाठक आणि त्यांची टीम विमानामध्येच होती. घटनेनंतर लगेचच विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या. खबरदारी म्हणून विमान थांबवण्यात आले आणि ब्रजेश पाठक यांना सुरक्षित बाहेर…

Read More

राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान:जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; मोझरीचे जनार्धन बोथेंना ‘पद्मश्री’, ‘ग्रामगीते’चा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवर सन्मान‎

अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात आज, सोमवार, २५ मे रोजी मानाचा तुरा रोवला गेला आहे. मोझरी येथील थोर समाजसेवक आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे माजी खाजगी सचिव जनार्धन बापूराव बोथे (बोथे गुरुजी) यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या बहुमानामुळे केवळ जिल्ह्याचाच नव्हे, तर राष्ट्रसंतांच्या विचारांचा आणि ‘ग्रामगीते’चा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवर सन्मान झाल्याची भावना व्यक्त…

Read More

25 वर्षांनंतरही सोयाबीन पिकाला सक्षम पर्याय मिळेना:मका, तुरीचे क्षेत्र वाढणार, खरीप पेरणीपूर्वीच अमरावतीच्या बळीराजासमोर आव्हानांचा डोंगर‎

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून खरिपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनमधून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कपाशीचीही स्थिती काहीशी अशीच आहे. परिणामी, यंदा जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत . जिल्ह्यात गेल्या २५ ते २६ वर्षांपासून खरीप हंगामात मुख्यतः सोयाबीन आणि कपाशी हीच दोन पिके घेतली जात आहेत. या…

Read More