मोर्शी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न:जिद्द, चिकाटीने यश मिळते – ठाणेदार आठवले
मोर्शी येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ठाणेदार राहुल आठवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिद्द, चिकाटी, शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास कायम ठेवल्यास यशाचे शिखर सहज गाठता येते, असे प्रतिपादन त्यांनी केले. नवनीत डायनामिक आणि आकाश इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बारावी आणि एमएच-सीईटी परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात…