आषाढी वारीत विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या:महावितरण संचालक धनंजय औंढेकर यांचे निर्देश; हयगय झाल्यास कारवाई
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी पालखी मार्गावर चोख विद्युत सुरक्षा ठेवण्यासाठी विविध कामांचा आढावा घेतला. सुरक्षेत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान काही दिवसांवर आले आहे. या पार्श्वभूमीवर…