Headlines

Admin

मोहित कंबोज दलालच:श्रीकांत शिंदे उद्धव ठाकरेंकडे येऊन कितीवेळा रडलेत हे आम्हाला माहीत, कौतुक केलं म्हणजे भाजपमध्ये गेलो असं नाही- अंबादास दानवे

मोहित कंबोज हा दलाल आहे त्यांच्या विषयी मी परवा बोललो तर भाजपच्या लोकांचेच मला फोन आले की तुम्ही बोललात ते एकदम योग्य बोललात, असे म्हणत उबाठाचे नेते अंबादास दानवे त्यांच्यावर टीका केली आहे. तर श्रीकांत शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्याकडे येत कितीवेळा रडले हे आम्हाला माहिती आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर बोलूच नये आणि बोलले तरी…

Read More

सुरक्षेवरून विधानसभेत राडा:बिश्नोई गँगच्या धमकीवरून वडेट्टीवार संतापले; म्हणाले- रोहित शेट्टीला 25 गार्ड, मग आमदाराला का नाही?

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज दोन अत्यंत संवेदनशील आणि गंभीर मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना कुख्यात ‘बिश्नोई गँग’कडून पुन्हा एकदा धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात मांडला. यासोबतच, लातूरमधील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव नाकारण्यात आल्याने संतप्त झालेल्या विरोधकांनी थेट सभात्याग केला. ‘रोहित शेट्टीला 25…

Read More

मेहली मिस्त्री यांचा टाटाच्या फॅमिली ऑफिसमधून राजीनामा:टाटा ट्रस्ट्समधून काढल्यानंतर काही महिन्यांनी उचलले पाऊल, टाटा ग्रुपपासून अंतर वाढले

मेहली मिस्त्री यांनी त्यांच्या कौटुंबिक गुंतवणूक कार्यालय ‘आरएनटी असोसिएट्स’च्या बोर्डातून राजीनामा दिला आहे. टाटा ट्रस्ट्समधून बाहेर काढल्यानंतर काही महिन्यांनी मिस्त्रींचा हा राजीनामा समोर आला आहे. या पावलामुळे टाटा ग्रुप आणि त्याच्याशी संबंधित संस्थांसोबत मेहली मिस्त्रींचे अंतर आणखी वाढले आहे. 3 वर्षांपूर्वी मिस्त्री बोर्डात सामील झाले होते, व्यस्ततेचे कारण दिले मेहली मिस्त्री मार्च 2023 मध्ये आरएनटी…

Read More

Yogesh Kadam Hits Back at Raj Thackeray Over Public Connect

केवळ व्यासपीठावरून भाषणे ठोकून मते मिळत नाहीत, तर त्यासाठी जनतेमध्ये उतरून काम करावे लागते. महायुती सरकार म्हणून आम्ही ते काम करत आहोत आणि म्हणूनच लोकसभा, विधानसभाच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जनता आमच्या पाठीशी उभी राहिली आहे, . राज ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींची तुलना ‘देहविक्री’ करणाऱ्यांशी केल्याबद्दल योगेश कदम यांनी तीव्र आक्षेप घेतला. अशा शब्दांत…

Read More

'राजकारणाचा स्तर खूप घसरला':पक्षांतरबंदी कायदा कमकुवत झाल्यानेच फोडाफोडीचं राजकारण, सतेज पाटलांची टीका

राज्यात सुरू असलेल्या पक्षांतर आणि फोडाफोडीच्या राजकारणावर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. “राजकारणाचा स्तर खूप घसरला असून यामागचं मूळ कारण म्हणजे पक्षांतरबंदी कायदा कमकुवत ठरला आहे,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरही त्यांनी सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘राजकारणाचा स्तर घसरला’ मनसे अध्यक्ष राज ठाकरे…

Read More

चांदी ₹3,863 ने वाढून ₹2.25 लाख प्रति किलो:सोने ₹1,748 ने वाढून ₹1.43 लाख प्रति 10 ग्रॅम, या वर्षी ₹10 हजारने महाग झाले

सोन्या-चांदीच्या दरात आज, म्हणजेच 2 जुलै रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 1,748 रुपयांनी वाढून 1.43 लाख रुपयांवर पोहोचला आहे. तर, 1 किलो चांदी 3,863 रुपयांनी वाढून 2.25 लाख रुपयांवर पोहोचली आहे. टीप:- सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम आणि चांदीची किंमत किलोमध्ये |…

Read More

चंद्रपुरातील धक्कादायक घटना:नवजात बाळ विक्रीप्रकरणी भाजपच्या 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; दोघीही आमदार जोरगेवारांच्या समर्थक असल्याची चर्चा

पैशांच्या हव्यासापोटी एका जन्मदात्या मातेनेच आपल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचा सौदा केल्याची धक्कादायक घटना नुकतीच चंद्रपुरात उघडकीस आली होती. आता या मानवी तस्करी आणि बाळ विक्री प्रकरणाला मोठे राजकीय वळण लागले आहे. या बेकायदेशीर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मदत केल्याच्या आरोपावरून रामनगर पोलिसांनी चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या कट्टर समर्थक असलेल्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना…

Read More

रत्नागिरीत दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक:11 शाळकरी विद्यार्थी आणि चालक जखमी, ब्रेक निकामी झाल्याचा प्राथमिक अंदाज

रत्नागिरी तालुक्यातील शीळ गावाजवळ गुरुवारी सकाळी दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 11 शाळकरी विद्यार्थी आणि एका एसटी बसचा चालक जखमी झाला असून सर्व जखमींवर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ब्रेक निकामी झाल्याने…

Read More

कर्नाटकातील दगडी खाणीत टेकडीचा एक भाग कोसळला:8 जणांचा मृत्यू , सर्व बिहारचे रहिवासी; अपघाताच्या वेळी 18 मजूर काम करत होते

कर्नाटकातील बेंगळूरु दक्षिण तालुक परिसरात गुरुवारी सकाळी दगडी खाणीत 40 फूट उंचीवरून दरड कोसळून बिहारमधील 8 मजुरांचा मृत्यू झाला. अपघातावेळी खाणीत सुमारे 18 मजूर काम करत होते. या अपघातात इतर अनेक मजूर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, जखमींच्या नेमक्या संख्येची अद्याप पुष्टी झालेली नाही. दरड कोसळण्याच्या कारणाचा पोलीस…

Read More

पुण्यात लोकमान्यनगरमध्ये घरफोडी, 12 लाखांचा ऐवज चोरीला:विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू

पुण्यातील नवी पेठेतील लोकमान्यनगर येथे एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी 11 लाख 89 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 30 जून रोजी मध्यरात्री घडली असून, 1 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि त्यांचे कुटुंबीय लोकमान्यनगरमधील इमारत क्रमांक नऊमध्ये राहतात….

Read More