राऊतांनी राहुल गांधींच्या सांगण्यावरून हिंदूंची बदनामी करण्याची सुपारी घेतलीय:मुंबई मनपावर सत्ता असताना कोणत्या गुजराती कंत्राटदारांना कामे दिली मनसेकडून यादी मागवा- बन
कोण चंपतराय आहेत आणि कोण संपतराव आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची आज जी अधोगती झाली आहे आणि ‘उबाठा’ गटाची जी बिकट अवस्था झाली आहे, त्याला सर्वाधिक जबाबदार केवळ आणि केवळ संजय राऊतच आहेत, असा घणाघाती आरोप भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून टोला लगावताना…