Headlines

Admin

श्री महालक्ष्मी मंदिरात अधिक मास कार्यक्रमांची सांगता:यज्ञाने समारोप, पाऊस व शांततेसाठी प्रार्थना; महिनाभर विविध उपक्रम

सारसबागेतील श्री महालक्ष्मी मंदिरात अधिक मासानिमित्त आयोजित महिनाभराच्या विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची नुकतीच यज्ञाने सांगता झाली. या समारोपावेळी सर्वदूर चांगला पाऊस पडावा आणि जगात शांतता नांदावी, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली आहे. या उपक्रमांचे संयोजन ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल आणि डॉ. तृप्ती अग्रवाल यांनी केले. यावेळी विश्वस्त…

Read More

दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचे साधन द्यावे: राहुल देशमुख:समाजसेवक राहुल देशमुख यांची सरकारकडे मागणी, पितृदिनानिमित्त विशेष कार्यक्रम

जागतिक पितृदिनानिमित्त जय गणेश व्यासपीठाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात समाजसेवक राहुल देशमुख यांनी दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचे साधन उपलब्ध करून देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. शारीरिक उणीवांवर मात करून विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणाऱ्या दिव्यांगांना केवळ पुरस्कार देणे पुरेसे नाही, तर त्यांना सन्मानाने उदरनिर्वाह करता येईल अशी साधने उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे मत देशमुख…

Read More

पुण्यात रिक्षाचालकाने प्रवाशाला लुटले, 1.15 लाखांचा मुद्देमाल लंपास:वाकडेवाडीत मध्यरात्री घडली घटना; रिक्षाचालकासह साथीदारावर गुन्हा

पुण्यात रिक्षा प्रवाशांना लुटण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. वाकडेवाडी परिसरात एका रिक्षाचालकाने प्रवाशाला धमकावून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला, तर पुणे स्टेशन परिसरात एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपयांची सोनसाखळी चोरीला गेली. पहिल्या घटनेत, २० जून रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. ओदिशा येथील मूळ रहिवासी असलेला…

Read More

योगींना राम मंदिरातील देणगी चोरीचा अहवाल देण्यासाठी पोहोचली SIT:7 पेन ड्राइवमध्ये पुरावे; चंपत-अनिल मिश्रा यांच्यासह 150 लोकांना इशारा – अयोध्या सोडून जाऊ नका

राम मंदिरातून देणगी चोरीच्या प्रकरणाची चौकशी करणारी विशेष तपास पथक (SIT) रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री योगी यांना प्राथमिक अहवाल सादर करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. एसआयटीने घटनास्थळावरून गोळा केलेले सर्व पुरावे आणि लोकांकडून केलेल्या चौकशीचा तपशील 7 पेन ड्राइव्हमध्ये सुरक्षित केला आहे. 6 दिवसांच्या चौकशीत 150 संशयितांची नावे समोर आली आहेत. यापैकी 25 लोकांवर कारवाई होण्याची…

Read More

सीओईपी स्थापना दिनी लिला पूनावाला::संशोधन-विकासावर भर द्या, प्राध्यापकांना पुरेसा वेळ द्या

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पाचव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पद्मश्री लिला पूनावाला यांनी संशोधन आणि विकासावर अधिक भर देण्याचे आवाहन केले. पारंपारिक शैक्षणिक चौकटीतून बाहेर पडून या क्षेत्रात लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात हा स्थापना दिन सोहळा पार पडला. यावेळी लिला पूनावाला फाऊंडेशनच्या संस्थापक आणि सीओईपीच्या माजी…

Read More

विरोधकांचे 6 पानी पत्र 'AI' निर्मित!:चहापानावरील बहिष्कारावरून CM देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला

राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (दिनांक 20 जून) सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी याहीवेळी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत…

Read More

Kalyan Minor Girl Gang Raped; Two Accused Arrested Under POCSO

कल्याण पूर्वेमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी घटना घडली असून, एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच घरात दोन नराधमांनी अत्याचार केला आहे. पीडित मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून या आरोपींनी घरात घुसून हे घृणास्पद कृत्य केले. मात्र, परिसरातील जागरूक श . या गंभीर प्रकरणाची दखल घेत, कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात ‘पोक्सो’ (POCSO) आणि अत्याचाराचा…

Read More

रणवीर सिंह बनला भारतातील सर्वात महागडा अभिनेता:धुरंधरमधून 325 कोटींच्या कमाईचा दावा; शाहरुख-रजनीकांतसारख्या अभिनेत्यांना मागे टाकले

अभिनेता रणवीर सिंह त्याच्या ‘धुरंधर’ चित्रपट मालिकेच्या यशानंतर भारतातील सर्वात महागडे स्टार बनला आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या अहवालानुसार, रणवीरने या चित्रपटाच्या दोन्ही भागांतून एकूण ३२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याने चित्रपटासाठी कोणतीही निश्चित फी घेतली नव्हती, तर प्रॉफिट शेअरिंग (नफ्यात वाटा) चा पर्याय निवडला होता. ‘धुरंधर’ने जगभरात ३१०० कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन केले आहे. या…

Read More

राज्यात मान्सूनची दमदार एन्ट्री!:पुणे, सातारा ते कोकणापर्यंत पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

उन्हाळा आणि शाळेच्या सुट्ट्या संपून जून महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला, तरीही पावसाने ओढ दिल्याने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि पशू-पक्षीही चिंतेत होते. हवामान खात्याचे अंदाज सतत पुढे ढकलले जात असले तरी, आता 25 जूननंतर राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन होईल असा नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, भिवंडी, सातारा आणि कोकणातील काही भागांत…

Read More

टॉप-10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांचे मूल्य ₹2.15 लाख कोटींनी वाढले:एअरटेल टॉप गेनर ठरली, मूल्य ₹52,432 कोटींनी वाढले; LIC-बजाज फायनान्सचे मार्केट कॅपही वाढले

जागतिक बाजारातील सुधारलेल्या भावनांमुळे गेल्या आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 9 कंपन्यांचे मार्केट कॅप एकूण 2.15 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीमध्ये भारती एअरटेल अव्वल ठरली. कंपनीचे मूल्यांकन 52,432 कोटी रुपयांनी वाढून 11.63 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. एलआयसी दुसऱ्या क्रमांकावर राहिली. त्याच्या मार्केट कॅपमध्ये 51,675 कोटी रुपयांची वाढ झाली, ज्यामुळे त्याचे एकूण मूल्यांकन…

Read More