Headlines

Admin

एआयसाठी नियामक पद्धत निर्माण करा – विवेक सावंत:मानवजातीची सेवा करावी, तिची जागा घेऊ नये अशी मागणी

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मेंटॉर विवेक सावंत यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (एआय) नियामक पद्धत निर्माण करण्याची गरज व्यक्त केली आहे. पुणे येथे आयोजित ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यातील सत्यशोधन’ या संवाद सत्रात ते बोलत होते. एआयने मानवजातीची सेवा करावी, तिची जागा घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. अमेरिकेसह जगभरात एआय आणि डेटा सेंटरला विरोध होत असून, भारतातही नागरी समाजाने…

Read More

विधान परिषदेवरून महायुतीत धुसफूस वाढली:शंभूराज देसाईंचा थेट इशारा- "आता आलेल्या परिस्थितीला भाजपलाच सामोरे जावे लागेल"

सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले आहेत. भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतरही शिवसेनेचा पाठिंबा अद्याप स्पष्ट झालेला नसताना राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. “नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवेळी आम्ही समन्वयाचा प्रयत्न केला, पण भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिला भाजपलाच…

Read More

गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने साडेआठ लाखांची सायबर फसवणूक:महिलेसह दोघांना गंडा, मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

पुणे शहरात गॅस देयक अद्ययावत (अपडेट) करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका महिलेसह दोघांची साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी अलंकार आणि मुंढवा पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एरंडवणे येथील हिमाली सोसायटीत राहणाऱ्या एका ४९ वर्षीय महिलेला सायबर चोरट्यांनी लक्ष्य केले. गॅस पुरवठा करणाऱ्या खासगी कंपनीच्या नावाने त्यांना एक संदेश पाठवण्यात…

Read More

संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा रास्तारोको:खासदार कल्याण काळे पोलिसांच्या ताब्यात, ‘पुन्हा आंदोलन करू’चा इशारा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी संभाजीनगर-जालना महामार्गावरील केंब्रिज चौकात जोरदार ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. काँग्रेसच्या या अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून तब्बल ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी आंदोलक खासदार कल्याण काळे यांच्यासह अनेक…

Read More

दुसऱ्यांची मुले चोरण्यापेक्षा स्वतःची वाढवा…:शर्मिला ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांच्या 'ऑपरेशन टायगर' आणि 'पक्षफोडी'वर बोचरी टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर, आज राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिलांना घरगुती पिठाच्या चक्की (गिरणी) वाटप केल्या. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप), त्यांची ‘पक्षफोडीची’ राजनीती आणि सरकारच्या धोरणांवर…

Read More

India Inflation Rise | Wholesale WPI Inflation May 2026 Update; Fuel Food Price Hike

Marathi News Business India Inflation Rise | Wholesale WPI Inflation May 2026 Update; Fuel Food Price Hike नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मे महिन्यात घाऊक महागाई (WPI) वाढून 9.68% वर पोहोचली आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये ती 8.26% होती. मे महिन्यात महागाई 43 महिन्यांत सर्वाधिक आहे. सप्टेंबर 2022 मध्ये ती 10.70% वर पोहोचली होती. वाणिज्य मंत्रालयाने आज…

Read More

राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा एल्गार:16 जूनपासून सेवा ठप्प होण्याची शक्यता; वाचा काय आहेत मागण्या

अनेक प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार दाद मागूनही प्रशासन केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत, राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. उद्यापासून (16 जून) राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा एल्गार पुकारला आहे. या संपामुळे राज्यातील वाहन परवाने, गाड्यांचे पासिंग, आरसी बुक यांसह आरटीओ कार्यालयातील बहुतांश सर्वच कामे ठप्प होण्याची शक्यता असून सर्वसामान्यांना फटका बसणार…

Read More

अभिषेक बॅनर्जी यांची ईडीकडून चौकशी सुरू:कॅश फॉर जॉब घोटाळ्यात लाच घेतल्याचा आरोप; बनावट स्वाक्षरी प्रकरणात CID ने चौकशी केली

टीएमसी सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी कोलकाता येथील ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. ईडी अभिषेक यांची कॅश-फॉर-स्कूल-जॉब घोटाळ्याप्रकरणी चौकशी करत आहे. त्यांना 3 जून रोजी नोटीस बजावून 15 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत एजन्सीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रकरणात सीबीआय आणि ईडी या दोन्हीच्या आरोपपत्रात अभिषेकचे नाव आहे. यापूर्वी रविवारी आमदारांच्या बनावट स्वाक्षरी प्रकरणात सीआयडीने…

Read More

धरणांतील पाणी शेतीसाठी बंद!:उपलब्ध पाणी प्रामुख्याने पिण्याच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटलांचे आदेश, वडेट्टीवारांचा हल्लाबोल

राज्यातील अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत धरणांमधील उपलब्ध पाणी प्रामुख्याने पिण्याच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून अनेक भागांमध्ये शेतीसाठीचे आवर्तन बंद करण्यात आले आहे. या निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली असून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

Read More

खंडोबारायांच्या सासुरवाडीत ‘अधिकमास’ सोहळा:16 जावयांच्या हस्ते धोंडे पूजन; जागरण-गोंधळ अन् पारंपारिक गीतांनी वातावरण भक्तिमय

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबादेवाच्या सासुरवाडी नेवासा बुद्रुक येथे अधिक मासानिमित्त एक आगळावेगळा धार्मिक उपक्रम पार पडला. पुरातन म्हाळसा-खंडोबा-बाणाई मंदिरात आयोजित धोंड्याच्या कार्यक्रमात खंडेरायांना धोंड्यासह पंचपक्वान्न मिष्टान्नाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. तसेच नेवासा बुद्रुक तीर्थक्षेत्रातील उपस्थित १६ जावयांचा विशेष सत्कार करून त्यांच्या हस्ते धोंड्याची पूजा करण्यात आली. पुरातन म्हाळसा-खंडोबा-बाणाई मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष संभाजी…

Read More