Headlines

Admin

यंदा 1 लाख 99 हजार 450 हेक्टरवर ऊस:कमी पावसाच्या अंदाजाने चिंतातूर, ऊस उत्पादक शेतकरी नव्या आशेने मेहनतीला लागला‎

जिल्ह्याला यंदाच्या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतीय हवामान विभागाने सुधारित अंदाजात म्हटले की, यंदा मान्सूनदरम्यान सरासरी पावसाच्या तुलनेत पाऊस कमी होऊ शकतो. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर टांगती तलवार ठे . महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा हा ऊस उत्पादकासह कारखानदाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र यंदाच्या वर्षी पाऊस कमी असल्याचा अंदाज…

Read More

बनवाबनवी कांदा खरेदीची:‘नाफेड’च्या ठेक्यासाठी दाखवली ऑडिटमध्ये 1 कोटींची उलाढाल, बँक स्टेटमेंट देण्यास नकार, उपनिबंधक कार्यालयाचा शेरा

‘नाफेड’चा कांदा खरेदीचा ठेका घेण्यासाठी काही सोसायट्यांनी कागदोपत्री वार्षिक एक कोटींची उलाढाल दाखवली असून, प्रत्यक्षात त्याबाबतचे खरेदी-विक्रीच्या आर्थिक उलाढालीचे बँक स्टेटमेंट सादर केले नसल्याची धक्कादायक बाब जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या अहवालातून समोर आली आहे. काम मिळालेल्या अनेक सोसायट्यांनी कागदावरच आर्थिक उलाढालीचे आभासी चित्र निर्माण केले असल्याचा शेरा निबंधक कार्यालयाने मारला आहे. कांदा खरेदी-विक्रीचे अनुभव प्रमाणपत्र न…

Read More

फोंडशिरस येथे पेरूची बाग अन् गवारीचे पीक भुईसपाट:सलग दोन दिवस वादळी पावसाचा तडाखा‎

माळशिरस तालुक्यात रविवार आणि सोमवार अशा सलग दोन दिवस या अवकाळी आणि वादळी पावसामुळे तालुक्यातील फोंडशिरस येथील शेतकरी अजय निटवे यांच्या शेतातील पेरूची बाग आणि गवारीचे पीक पूर्णपणे भुईसपाट झाले असून, त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या अस्मानी संकटामुळे निटवे यांच्या डोळ्यात अश्रू आले असून ते पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. चालू वर्षी उन्हाळ्याची…

Read More

‘फुले समृद्ध ग्राम' योजनेसाठी कृषी विज्ञान केंद्रांची भूमिका महत्त्वाची- डॉ.जी.के.ससाणे:अभियानासाठी निवडलेल्या गावात कृषी तंत्राचा प्रसार करून उत्पन्न वाढवण्याच्या सूचना‎

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. के. ससाणे यांनी नुकतीच मोहोळ कृषी विज्ञान केंद्रास भेट देऊन केंद्राच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी फुले समृद्ध ग्राम योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी विज्ञान केंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गावपातळीवर अल निनो…

Read More

अकलूजमध्ये सामुदायिक सोहळ्यात गुंफल्या 14 जोडप्यांच्या रेशीमगाठी:बागवान सहारा फाउंडेशनतर्फे प्रत्येक जोडप्याला 25 हजारांचे संसारोपयोगी साहित्य‎

अकलूज येथे बागवान सहारा फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात १४ जणांचे विवाह लावण्यात आले. विवाहित जोडप्यांना प्रत्येकी २५ हजारांचे संसारपयोगी साहित्य देण्यात आले. या फाउंडेशनचे अशा सामाजिक उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. सोलापूर येथील हाजी उमरभाई बागवान यांनी स्थापन केलेल्या शाहीन फाउंडेशनचा आदर्श…

Read More

पहिल्या टप्प्यात मध्य राजापेठ, पूर्व झोन दस्तूरनगर अव्वल:मुदतीपूर्वीच 100 टक्के घर यादी व गट यादीचे काम पूर्ण, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा केला गौरव‎

महानगरपालिकेच्या वतीने जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला वेग आला असून पहिल्या टप्प्यातील घर यादी (एचएलबी) आणि गट यादी तयार करण्याच्या कामात मध्य झोन कार्यालय क्र. २, राजापेठ आणि पूर्व झोन कार्यालय, दस्तूरनगर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दोन्ही कार्यालयांनी शासनाने निर्धारित केलेल्या मुदतीपूर्वीच आपल्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के काम पूर्ण करून शहरातील इतर चार्ज कार्यालयांसमोर आदर्श निर्माण…

Read More

शासनाने केलेली कर्जमाफी पूर्ण फसवी; प्रोत्साहनपर अनुदानासाठी निर्णय घ्यावा:योजनेतील विविध जाचक अटी रद्द करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन‎

राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. या मागणीसाठी चांदूरबाजार तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. . शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरकारने सर्व शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी…

Read More

12 वर्षांनंतर टीव्हीवर परतले यशपाल:म्हणाले- ‘बरेली के बच्चन’साठी चित्रपट-ओटीटी सोडले, अंशने सांगितले- तरुण प्रेक्षक पुन्हा टीव्हीशी जोडले जातील

दीर्घकाळानंतर टीव्हीवर पुनरागमन करणारे अभिनेते यशपाल शर्मा आपल्या ‘बरेली के बच्चन’ या नवीन शोबद्दल उत्साहित आहेत. दैनिक भास्करशी बोलताना त्यांनी सांगितले की, या शोसाठी त्यांनी आपले चित्रपट आणि ओटीटी प्रोजेक्ट्स सध्या बाजूला ठेवले आहेत. यशपाल म्हणाले की, ‘नीली छतरी वाले’ नंतर सुमारे 12 वर्षांनी ते टीव्ही शो करत आहेत आणि यावेळीही ते पूर्णपणे एकाच प्रोजेक्टवर…

Read More

एप्रिलचे धान्य गोदामात पडून; पॉस मशीनमधून डेटा गायब!:वरुडच्या रास्तभाव दुकानदारांचे शासनाला ‘अल्टिमेटम’‎

शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि तांत्रिक गोंधळामुळे रास्तभाव दुकानदारांसह शिधापत्रिकाधारक लाभार्थी कमालीचे त्रस्त झाले आहेत. एप्रिल महिन्याचे धान्य गोदामात पडून असतानाही पीओएस मशीनमधून डेटा गायब झाल्याने वाटप रखडले आहे. इतर प्रलंबित मागण्यांसाठी वरुड तालुका रास्तभाव दुकानदार संघटनेने बुधवार १० रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी, अमरावती यांना तहसीलदार वरुड यांच्यामार्फत निवेदन दिले. शासनाने तातडीने या मागण्या मान्य न…

Read More

Rohit Pawar Aggressive on Pandharpur Farmer Protest

पंढरपुरात होणाऱ्या शेतकरी आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले आहे. आमदार रोहित पवार यांनी प्रशासनावर थेट निशाणा साधत आंदोलन रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. पंढरपुरातील अन्नदात्याग आंदोलन अवघ्या ३६ तासांवर आले असताना प्रशासनाने वाहतुकीचा प् . रोहित पवार म्हणाले की, आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने होणार असून वारकरी आणि भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून नामदेव पायरीऐवजी…

Read More