राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ:सातारा, जळगाव, बारामतीसह परभणीला वादळाचा तडाखा; शेती पिकांचे नुकसान
राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका शेती क्षेत्राला, विशेषतः फळबागांना बसला असून अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित झाला आहे. सातारा, पुणे, जळगाव आणि परभणी जिल्ह्यात या पावसाने मोठे नुकसान केले…