Headlines

Admin

स्टार्टअप फ्रंटियर 1.0:स्टार्टअपद्वारे ज्ञानाचे उद्योगात रूपांतर करून विकसित भारत घडविण्याची गरज– राज्यपाल जिष्णू देव वर्मा

ज्ञानाचे नाविन्यपूर्ण उपाययोजनांमध्ये, आव्हानांचे संधींमध्ये आणि कल्पनांचे उद्योगांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता हीच आजच्या आर्थिक प्रगतीची खरी ताकद आहे. त्यामुळे विद्यापीठांनी केवळ पदवी प्रदान करणाऱ्या संस्था न राहता नवोपक्रम, बौद्धिक संपदा, स्टार्टअप्स आणि समाजपरिवर्तन घडविणाऱ्या केंद्रांमध्ये विकसित व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत…

Read More

हिंगोलीत हायवेवर थरार:कारवाडी उड्डाणपुलाजवळ दुचाकीस्वाराला लाथ मारून पाडले; मारहाण करत 25 हजारांचा मुद्देमाल लुटला, तिघांवर गुन्हा दाखल

हिंगोली तालुक्यातील कारवाडी शिवातील उड्डाणपुला जवळ दुचाकीवर आलेल्या तिघांनी एका दुचाकीस्वारास मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 10 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आता त्या तीन चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील पिंपरखेड येथील अविनाश वाढवे हे हिंगोली येथे दुचाकी दुरुस्तीचे काम…

Read More

18 गावांतील मालमत्ताधारकांना 7/12 ऐवजी पीआर कार्ड मिळणार:शासनाच्या अध्यादेशाची छत्रपती संभाजीनगर मनपा करणार अंमलबजावणी

शहरातील वाढीव हद्दीतील आणि नगर भूमापन (सिटी सर्व्हे) नसलेल्या मालमत्ताधारकांचे लवकरच सर्वेक्षण होणार आहे. त्यांना मालमत्तेचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी 7/12 उताऱ्यांवर अवलंबून राहावे लागत होते, त्या उताऱ्यांची जागा आता अधिकृत ‘प्रॉपर्टी कार्ड’ घेणार आहे. महाराष्ट्र शासनाने 26 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशानुसार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार भूमी अभिलेख विभागामार्फत ही प्रक्रिया केली…

Read More

संघर्षाचा पहिला मोठा विजय:कर्जमाफीच्या दोन जाचक अटी हटल्या, शेतकऱ्यांचा लढा अद्याप सुरूच राहणार – रविकांत तुपकर

कर्जमाफीच्या निकषांमधील दोन महत्त्वाच्या जाचक अटी हटवण्याचा निर्णय हा शेतकरी आंदोलनाचा पहिला मोठा विजय असल्याचा दावा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असून, बैठक संपताच विधानसभेत त्याची अधिकृत घोषणा करण्यात आल्याचे तुपकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा…

Read More

तेलंगणा- बलात्काराच्या आरोपीने पीडित आणि कुटुंबाची केली हत्या:आपल्या पत्नीला आणि मुलांनाही मारले; जामिनावर बाहेर येताच 6 खून केले

तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात शुक्रवार रात्री जामिनावर बाहेर आलेल्या एका आरोपीने 6 खून केले. आरोपी राजकुमारने आधी घरी त्याच्या 30 वर्षीय पत्नीची, 4 वर्षांच्या मुलाची आणि 18 महिन्यांच्या मुलाची हत्या केली. यानंतर तो सुमारे 6 किलोमीटर दूर एका गावात पोहोचला. जिथे त्याने 17 वर्षांच्या मुलीची, तिच्या आईची आणि आजीचीही हत्या केली. याच मुलीने 16 मे रोजी…

Read More

गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात दीपिका पदुकोण:तिसऱ्या तिमाहीत चालताना त्रास, स्थिती कशी आहे सांगितले, काही आठवड्यांत प्रसूती होईल

दीपिका पदुकोण सध्या तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने एप्रिलमध्ये तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची घोषणा केली होती, त्यानंतर आता ती तिसऱ्या तिमाहीत (थर्ड ट्रायमेस्टर) पोहोचली आहे. आता दीपिकाने एक मीम शेअर करून तिसऱ्या तिमाहीतील तिची स्थिती सांगितली आहे. दीपिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरी सेक्शनमधून एक मीम शेअर केले आहे, ज्यामध्ये एक महिला बाथरूमला जाण्यासाठी धडपडताना दिसत…

Read More

एकल महिला धोरण पुनर्वसन‎ नव्हे, तर हक्क व सन्मानाचे असावे:महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचा शासनाला सर्वसमावेशक मसुदा सादर

Marathi News Local Maharashtra Ahmednagar Single Women’s Policy Should Not Be About Rehabilitation, But About Rights And Dignity, Maharashtra Women’s Liberation Council Submits Comprehensive Draft To The Government संगमनेर1 तासापूर्वी कॉपी लिंक संगमनेर राज्य शासनाच्या प्रस्तावित ‘एकल महिला धोरणा’च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेने महिला व बालविकास आयुक्तालय (पुणे) यांच्याकडे एक सर्वसमावेशक आणि ऐतिहासिक मसुदा…

Read More

चीफ पोस्टमास्तर जनरल होत येळीच्या सुपुत्राने रचला इतिहास:या पदावर विराजमान होणारे जिल्ह्यातील पहिले अधिकारी, जि. प. शाळा ते आयआयटी असा प्रवास‎

ग्रामीण भागात गुणवत्ता ठासून भरलेली असते, फक्त गरज असते ती जिद्दीची आणि कष्टाची. हेच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील येळी गावचे सुपुत्र रामचंद्र किसन जायभाये यांनी. भारतीय डाक सेवेतील (IPoS) १९९९ बॅचचे वरि . रामचंद्र जायभाये हे यापूर्वी नवी दिल्ली येथील पोस्टल संचालनालयात जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांनी देशभरात…

Read More

मोशी डेपो दुर्घटनाग्रस्त इमारतीला केवळ तळमजल्याचा पूर्णत्वाचा दाखला:वरच्या दोन मजल्यांना परवानगीच नाही; गंभीर प्रश्न उपस्थित

मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या तीन मजली इमारतीत दुर्घटना घडली, त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला आणि आठ कामगार 65 तास अडकले होते. या इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच महापालिकेकडून पूर्णत्वाचा दाखला देण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने 27 जुलै 2023 रोजी या ‘ॲडमिन बिल्डिंग’ला…

Read More

7 दुष्काळी गावांचा सिंचन योजनेत होणार समावेश:जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश‎

माढा तालुक्यातील सीना – माढा उपसा सिंचन योजनेमध्ये वंचित राहिलेल्या दुष्काळी ७ गावांचा समावेश करणे, खैराव मानेगाव उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती देणे आदीसह तालुक्याच्या सिंचन प्रश्नावर कार्यवाहीचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी दिले आहेत. जलसंधारण व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. यावेळी सीना– माढा उपसा सिंचन योजना तसेच खैराव- मानेगाव…

Read More