Headlines

Admin

पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR नको:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पत्र

महाराष्ट्रातील मतदार यादी विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते २९ जुलै दरम्यान सुरु होणार आहे. या कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातील लाखो वारकरी वारीत सहभागी होत असल्याने ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावे वगळली जाण्याची भीती आहे, याचा विचार करुन पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर कार्यक्रम आयोजित करू नये, तो…

Read More

वन्यजीव हल्ल्यात ६ वर्षांत ५०७ मृत्यू:महाराष्ट्रात ७०० कोटींहून अधिक नुकसान भरपाईचे वाटप

महाराष्ट्रात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे चित्र माहिती अधिकारातून समोर आलेल्या एका धक्कादायक आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. नागपूरचे प्रसिद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी वन विभागाकडे मागितलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या ६ वर्षांत (२०२०-२१ ते २०२५-२६) वन्यजीवांच्या हल्ल्यात तब्बल ५०७ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वन विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने दिलेल्या…

Read More

चांदी दोन दिवसांत ₹9000 रुपयांनी स्वस्त, ₹2.62 लाखांवर आली:10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 571 रुपयांनी घसरून 1.57 लाख

आज म्हणजेच 27 मे रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 1 किलो चांदीची किंमत 4,503 रुपयांनी कमी होऊन 2.62 लाख रुपयांवर आली आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 571 रुपयांनी घसरून 1.57 लाख रुपये झाला आहे. चांदीची किंमत 2 दिवसांत 9 हजार आणि 1,800 रुपयांनी स्वस्त…

Read More

नागपुरात महिला केंद्रांमुळे वार्षिक ६९० टन कार्बन घट:कचरा व्यवस्थापन केंद्रांमुळे पर्यावरणाला मोठा फायदा, नवीन अहवालाचा निष्कर्ष

नागपूर शहरात महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या स्थानिक पातळीवरील कचरा व्यवस्थापन केंद्रांमुळे पर्यावरणाला मोठा दिलासा मिळत आहे. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि असर सोशल इम्पॅक्ट ॲडव्हायजर्स यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका नवीन अहवालानुसार, शहरातील केवळ चार सुका कचरा संकलन केंद्रांमुळे दरवर्षी कार्बनडायऑक्साइडच्या उत्सर्जनात तब्बल ६९० टनांची घट होत असल्याचे समोर आले आहे….

Read More

महायुतीचे जागावाटप ९९% पूर्ण:एक-दोन दिवसांत अधिकृत घोषणा होईल – बावनकुळे

विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप जवळपास ९९ टक्के पूर्ण झाले असून, पुढील एक-दोन दिवसांत त्याची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच जागावाटपाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाण्याची गरज नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राज्यातच अंतिम…

Read More

प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार:१२१व्या वर्धापन दिनी डॉ. श्रीकृष्ण काकडे यांचाही सत्कार

पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा १२१वा वर्धापन दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. या सोहळ्यात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार डॉ. श्रीकृष्ण काकडे यांना प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रतिभा रानडे म्हणाल्या की, जीवनाच्या वाटचालीत मी वेगवेगळ्या विचारधारांच्या…

Read More

आरक्षण उपवर्गीकरण- डॉ. चलवादींचे सुवर्णमध्य काढण्याचे आवाहन:दलित समाजात फूट नको, बौद्ध समाजावर अन्याय टाळावा

महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत सध्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. हुलगेश चलवादी यांनी या मुद्द्यावर सर्वसमावेशक आणि समतोल विचार करण्याचे आवाहन केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे सर्वेसर्वा तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पक्षाची भूमिका…

Read More

विद्यार्थिनीने कुलर मागितले तर मिळाली नोटीस:नागपूरच्या सावित्रीबाई फुले वसतिगृहातील प्रकार; हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा – काँग्रेस

उन्हाळ्यामुळे प्रचंड उकडत असल्यामुळे एका विद्यार्थिनीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुलरची मागणी केली. त्यानंतर वसतिगृह प्रशासनाने सदर विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस बजावल्याची संतापजनक घटना नागपुरात घडली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारा असल्याची टीका करत सरकारवर आगपाखड केली आहे. आकांक्षा उके असे पीडित विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नागपुरातील सावित्रीबाई…

Read More

सिद्धिविनायक कॉरिडॉरवरून नवा वाद; मैदान वाचवण्यासाठी नागरिकांचा एल्गार:मैदान हिरावून घेऊ देणार नाही; नागरिक रस्त्यावर

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पावरून आता नवीन वाद समोर आला आहे. प्रभादेवी परिसरातील नर्दुल्ला टँक मैदानावर पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या निर्णयामुळे परिसरातील मोकळी जागा कमी होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून मैदान वाचवण्यासाठी मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही…

Read More

सार्वजनिक ठिकाणी पशुबळींवर कारवाई करा:राज्यमंत्री मिसाळ यांची मागणी, पुणे पोलिसांना पत्र

पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी आणि निवासी सोसायट्यांमध्ये अनधिकृत पशुबळी व कत्तलीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलिस प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवले आहे. मीराभाईंदर परिसरासह पुण्यातील काही भागांमध्ये सार्वजनिक स्वरूपात पशुबळी आणि कत्तलीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी समोर…

Read More