Headlines

Admin

पूर्ण बहुमत मिळविण्यासाठी शिवसैनिकांनी तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचावे:खासदार शिंदे यांच्या नांदगाव, येवला येथील पदाधिकाऱ्यांना सूचना‎

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांत शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळवून देण्यासाठी प्रत्येक बूथनिहाय कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभे करावे, पक्षाचा विस्तार करण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावात मतदार संपर्क अभियान राबवा. अशा सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसंवाद दौऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांना केल्या. शिवसंवाद दौऱ्यात खासदार शिंदे यांनी नांदगाव व येवला विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले…

Read More

मंजुरी एकाची, काम दुसऱ्याच रस्त्याचे!:छत्रपती संभाजीनगरात सफारी पार्कचा रस्ता कागदावर, वर्क ऑर्डर नसलेल्या रस्त्याचे कंत्राटदाराकडून सुरू आहे काम

महापालिकेतील जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सरकारी निधीची विल्हेवाट लावण्याचा एक मोठा प्रकार ‘डीबी स्टार’च्या पाहणीत उघड झाला आहे. पडेगाव सबस्टेशन ते सफारी पार्क या ३० मीटर रुंद डीपी रोडसाठी मंजूर झालेला ११ कोटी २५ लाख निधी अधिकारी आणि . मनपा कार्यकारी अभियंत्यांच्या स्वाक्षरीने कंत्राटदार पी. एस. बागडे यांना ११ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यादेश…

Read More

Banda Hottest, UP 3-Day Red Alert; Patna-Gaya Schools Shut

नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात सुरू असलेल्या उष्णतेपासून सध्या तरी दिलासा मिळण्याची शक्यता नाही, यावेळी सर्वात मोठा धोका हा आहे की दिवसाच्या उष्णतेच्या लाटेनंतर रात्रीही गरम राहिल्या आहेत. देशातील 35 शहरांमध्ये गुरुवारी रात्रीचे तापमान 30°C च्या वर होते. सर्वाधिक 33.7°C तापमान राजस्थानमधील हनुमानगड येथे नोंदवले गेले. देशाचा अर्ध्याहून अधिक भाग उष्णतेने भाजून निघत आहे….

Read More

साकोरा येथील ग्रामसभेत पाणीटंचाई निवारणासाठी नवीन विहिरीचा ठराव:जलजीवन योजनेतील अपयशावर चर्चा आणि वृक्षलागवड करण्याचा संकल्प‎

गेल्या काही वर्षांपासून जलजीवन योजनेतून पाणीपुरवठा न झाल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर साकोरा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून नवीन सार्वजनिक विहीर घेण्याचा ठराव, ग्रामपालिकेच्या मालमत्तांची फेरआकारणी करून उत्पन्न वाढवण्याचा निर्णय तसेच संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याचे ठराव मंजूर करण्यात आले. नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे प्रशासक अतुल बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामविकास…

Read More

अजिंठा-बुलढाणा राज्य मार्गावरील शिवना येथील वाहतूक कोंडी सुटेना:बाजारपेठेत वारंवार खोळंबा; शेगाव, नागपूरकडे जाणारे पर्यटक हैराण‎

अजिंठा लेणी आणि लोणार सरोवराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग म्हणून अजिंठा-बुलढाणा राज्य मार्गाकडे पाहिले जाते. मात्र, सद्यस्थितीत हा मार्ग शिवना गाव परिसरात वाहतूक कोंडीचा मुख्य केंद्र बनले आहे. बसस्थानक आणि मुख्य बाजारपेठ परिसरात वाहनधारक अस्ताव्यस्त पार्किंग करीत असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी, दररोज या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, बुधवारी बाजाराच्या दिवशी…

Read More

पैठणमध्ये 50 हजार हेक्टरवरील मशागत संकटात‎:खरीप हंगामाच्या पूर्वतयारासाठी पंपांवर इंधन मिळेना, ट्रॅक्टर शेताच्या बांधावरच उभे

पैठण37 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पैठण राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या डिझेल टंचाईचा थेट फटका आता शेती क्षेत्राला बसू लागला आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची मशागतीची कामे ऐन वेगाने सुरू असतानाच डिझेलचा पुरवठा खंडित झाल्याने पैठण तालुक्यात शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली Source link

Read More

केरळ सरकारने देशातील पहिला AI विभाग स्थापन केला:मेघालयमध्ये 13 देशांचा सैन्य सराव PRAGATI सुरू झाला; 22 मेच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान MoU वर स्वाक्षरी राष्ट्रीय (NATIONAL) 2. मेघालयमध्ये 13 देशांचा ‘प्रगती’ (PRAGATI) लष्करी सराव सुरू 3. भारत आणि UAE चा द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलरवर पोहोचला ४. लडाखने पर्यटन क्षेत्राला उद्योग म्हणून दर्जा दिला निधन (मृत्यू)…

Read More

तरुणाची संभाजीनगर ते रायगड 450 कि. मी. पदयात्रा:शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर पोहोचण्याचा संकल्प‎

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील आडगांव भोसले येथील ३० ंवर्षीय तरुण शिव एकनाथ शिंदे हा डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची पाच कीलो वजनाची मूर्ती घेऊन छत्रपती संभाजीनगर ते किल्ले रायगडपर्यंत ४५० की.मी. पदयात्रा करत आहे. या तरुणाने (२० मे) रोजी छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आपल्या पायी पदयात्रेचा शुभारंभ केला….

Read More

सिल्लोड शहरामध्ये 2 दुकानांना आग; 7 लाख रुपयांचे नुकसान:कारण अस्पष्ट, दोन्ही दुकानदारांचे 6 लाखांचे नुकसान‎

सिल्लोड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील दोन वेगवेगळ्या दुकानांना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या दोन्ही घटनांमध्ये ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पहिली घटना अण्णा भाऊ साठे चौकात रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. येथील सत्यम चौबे यांच्या मालकीच्या श्री मेडिकल दुकानाला अचानक आग लागली. या आगीत…

Read More

इंधन टंचाईचा पर्यटनाला फटका; वेरूळला पर्यटक संख्या 500 वर:गतवर्षी एप्रिलमध्ये 1 लाख, यंदा 70 हजार पर्यटकांची हजेरी‎

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेलच्या टंचाईचा फटका जागतिक वारसा स्थळ असलेल्या ऐतिहासिक वेरूळ लेणीच्या पर्यटनाला बसला आहे. ऐन उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात इंधनाअभावी वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. देश-विदेशातील पर्यटकांनी वेरूळकडे पाठ फिरवली आहे. दररोज सहा हजारांवर भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या आता पाचशेवर पोहोचली आहे. नेहमी गजबजलेला लेणी परिसर सध्या पूर्णपणे ओस पडला असून, व्यावसायिक…

Read More