मुंबईतील कुटुंब मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा:फॉरेन्सिक अहवालानंतर तज्ज्ञ डॉक्टरांची नवी चौकशी; पायधुनी मृत्यूकांडात वळण
मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या डोकाडिया कुटुंबाच्या सामूहिक मृत्यू प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. सुरुवातीला अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, फॉरेन्सिक तपासात या चौघांच्या शरीरात ‘झिंक फॉस्फाईड’ हे विषारी रसायन आढळून आल्यानंतर संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या दोन मुली आयशा व झैनब यांचा संशयास्पद…