Headlines

सावळदबारा परिसरात सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती:आता शेतकऱ्यांच्या नजरा मोठ्या पावसाकडे, यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा‎

अजिंठा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या सावळदबारा आणि परिसरात यंदा मान्सूनने वेळेत हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. सुरुवातीलाच समाधानकारक आणि पेरणीलायक पाऊस झाल्याने यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक मका व कपाशीच्या पिकाला फाटा देत सोयाबीन पिकाला पसंती दिली आहे. परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी पेरणी झालेल्या सोयाबीनची उगवण उत्कृष्ट झाली असून, सध्या शेतातील कोवळी हिरवीगार रोपे डोलताना…

Read More

बोरगाव चकल्यात संत ज्ञानेश्वर महाराज माउली पालखीचा पहिला रिंगण सोहळा:भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी; दीड दिवसाचा मुक्काम‎

तालुक्यातील आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज माउली यांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा शुक्रवारी बीड जिल्ह्यातील शिरूर येथील बोरगाव चकल्यात पार पडला. पालखीप्रमुख ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज माउली, माता रुक्मिणी व पिता विठ्ठलपंत यांच्या पालखी रथ सोहळ्याचे शुक्रवारी संत वामनभाऊ महाराजांची जन्मभूमी असलेल्या बोरगाव चकला येथे अभूतपूर्व…

Read More

कांद्याचे माहेरघर बनतेय वैजापूर:एका महिन्यामध्ये 25.46 कोटी उलाढाल, जूनमध्ये 15,774 शेतकऱ्यांकडून 2.22 लाख क्विंटल कांदा विक्री‎

एकेकाळी कांद्याची विक्री करण्यासाठी वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अंदरसूल, येवला, राहाता, घोडेगाव, नाशिक बाजार समित्यांचा आधार घ्यावा लागत होता. मात्र आता वाढती आवक, व्यापाऱ्यांमधील स्पर्धा, पारदर्शक लिलाव आणि विक्रीनंतर तात्काळ मिळणारे पेमेंट या कारणांमुळे वैजापूर बाजार समिती कांदा उत्पादकांचे विश्वासाचे माहेरघर बनत आहे. जून महिन्यात १५,७७४ शेतकऱ्यांनी २,२२,३३९ क्विंटल कांद्याची विक्री केली. या व्यवहारातून २५ कोटी…

Read More

पुणे तरुणांचे, तर सिंधुदुर्ग वृद्धांचे शहर ठरू लागले:स्थलांतराने प्रादेशिक समतोल बिघडला; शिक्षण-रोजगारासाठी तरुणांची धाव

महाराष्ट्राची लोकसंख्या १२.९३ कोटींवर पोहोचली असताना गेल्या १५ वर्षांत १८ ते ३५ वयोगटातील तरुणाईचा टक्का थेट ३४ वर गेला आहे. मात्र, रोजगार आणि शिक्षणामुळे झालेल्या महानगरीय स्थलांतराने प्रादेशिक समतोल बिघडला आहे. ६१% तरुण लोकसंख्येसह पुणे राज्याचे ‘य . सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रासाठी हा सध्या “गोल्डन पिरीयड’ असला तरी पुढील १५ वर्षांत (२०४० पर्यंत) हाच ३४%…

Read More

तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन:वारकरी, शेकऱ्यांना सुखी ठेव; देवेंद्र फडणवीसांचे विठुराया चरणी साकडे

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या परंपरेतून असीमित ऊर्जा मिळते, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुका आणि श्री निवडुंगा विठोबाचे दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केली. वारीत सहभागी झालेले वारकरी आणि शेतकऱ्यांना सुखी…

Read More

मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांसाठी एसटीचा दिलासा:उद्यापासून 200 अतिरिक्त बसफेऱ्या सुरू, 30 रेल्वेगाड्या रद्द झाल्याने तातडीची उपाययोजना

मुंबई–पुणे मार्गावरील दररोज धावणाऱ्या सुमारे ३० रेल्वे गाड्या रद्द असल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तातडीने अतिरिक्त बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून या मार्गावर दररोज २०० अतिरिक्त बसफेऱ्या चालविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या विशेष नियोजनाअंतर्गत ई-शिवनेरीच्या ३१२ नियोजित फेऱ्या सह साध्या बसेसच्या…

Read More

मोलकरणीकडून 7.30 लाखांच्या दागिन्यांची चोरी:आरोपीला अटक, सर्व दागिने जप्त; हडपसर पोलिसांची कारवाई

हडपसर परिसरातून ७.३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या मोलकरणीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. अंबिका सदाशिव खडगेकर (वय ३८, रा. साडेसतरा नळी, हडपसर) असे अटक केलेल्या मोलकरणीचे नाव आहे. पोलिसांनी तिच्याकडून चोरीला गेलेले सर्व दागिने जप्त केले आहेत. ही घटना हडपसर परिसरात उघडकीस आली होती. घरकामासाठी घरात ये-जा करणाऱ्या मोलकरणीनेच मालकिणीचा विश्वासघात करत मास्टर बेडरूममधील…

Read More

मोशी दुर्घटनाग्रस्त इमारतीचा धोकादायक भाग हटवणे सुरू:जवानांच्या सुरक्षित प्रवेशासाठी संरचना स्थिर करण्यावर भर

मोशी कचरा डेपो येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीत अडकलेल्या सुमारे आठ नागरिकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) मार्गदर्शनाखाली इमारतीचा धोकादायक भाग नियंत्रित पद्धतीने हटवला जात आहे. जवानांच्या सुरक्षित प्रवेशासाठी इमारत स्थिर करणे हे सध्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या दुर्घटनेमुळे इमारतीचा एक मोठा भाग कोसळला असून, उर्वरित संरचना अत्यंत अस्थिर अवस्थेत आहे….

Read More

शिक्षकाने शिस्तीसाठी रागावणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे!:नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय, शिक्षकावरील गुन्हा रद्द

शिक्षकाने विद्यार्थ्याला अभ्यासासाठी किंवा शिस्त लावण्यासाठी रागावणे अथवा शिक्षा करणे, याला विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे मानले जाऊ शकत नाही, असा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी बुलढाणा जिल्ह्यातील एका प्रकरणावर सुनावणी करताना हा निकाल दिला असून, संबंधित शिक्षकावर दाखल असलेला फौजदारी गुन्हा बेकायदेशीर ठरवत…

Read More

मुंबई मनपात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का:नवाब मलिकांच्या पुतणीचे नगरसेवक पद रद्द, जात प्रमाणपत्राचा मुद्दा नडला

राजधानी मुंबईच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या पात्रतेबाबत प्रशासनाने कडक पावले उचलली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक १७० मधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. बुशरा मलिक या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक…

Read More