Headlines

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध:70 हजार ई-मेल विरोधात, 30 जूनला मुंबईत विधानसभेला घेराव

राज्यातील अनुसूचित जाती (एससी) उपवर्गीकरणाच्या ‘अ, ब, क, ड’ मुद्द्यावर तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) कडे या संदर्भात सुमारे ८० हजार ई-मेल प्राप्त झाले आहेत, त्यापैकी ८५ टक्के म्हणजेच ६५ ते ७० हजार ई-मेल या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत. या पार्श्वभूमीवर, अनुसूचित जाती उपवर्गीकरण पुनर्विलोकन समितीने ३० जून…

Read More

पुण्यात मेफेड्रोन विक्री प्रकरणी एकाला अटक:1.76 लाखांचा मुद्देमाल जप्त, साथीदारांचा शोध सुरू

पुण्यात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मेफेड्रोन विक्री प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. शंकरशेठ रस्ता परिसरातून ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीकडून १ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कानिफनाथ उर्फ कानू विष्णू नायडू (वय ५१, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून मोटार, मोबाइल आणि…

Read More

यवतमाळमध्ये उन्हाचा कहर!:हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी; 48 तासांत 8 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज

राज्यात सध्या तापमानाचा पारा 40 ते 45 अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना तीव्र उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आले असून, जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रचंड उष्णलहरींमुळे गेल्या 48 तासांत तब्बल आठ जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू उष्माघाताचेच बळी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात…

Read More

जशी मराठी येते तशीच हिंदीही बोलता आली पाहिजे:भाजप आमदार कालिदास कोळंबकरांचे विधान, म्हणाले- जे आहे ते आहे, यात नाटक नको

सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून वादाचे वातावरण सुरू आहे. त्यात काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा चलकांना मराठी भाषा येणे अनिवार्य केल्याचा निर्णय घेतला होता. हे असे चित्र असतानाच आता भाजपच्याच आमदारांनी विधान केले आहे. जसे मराठी बोलता येते तसेच हिंदी पण बोलता आले पाहिजे, असे आमदार कालिदास कोळंबकर यांनी म्हटले आहे….

Read More

'कॉक्रोच जनता पार्टी'ला अण्णा हजारेंचा पाठिंबा:म्हणाले – नाव अजब असले, तरी तरुणाई पाठीशी; सरकारला दिला मोठा सल्ला

सोशल मीडियावर अल्पावधीत तुफान लोकप्रिय झालेली आणि प्रस्थापित राजकीय पक्षांना आव्हान देऊ पाहणारी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) सध्या वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात आहे. या पक्षावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि संकेतस्थळांमार्फत बंदी घालण्याचे प्रयत्न झाले असतानाच, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या चळवळीला पाठबळ दिले आहे. “नाव जरी अजब असले, तरी या पक्षाच्या मागे देशातील तरुण…

Read More

मोदींनी भारतीय शेतकऱ्यांचा बळी दिला:भारत पुन्हा परकीय सत्तेचा गुलाम होण्याच्या उंबरठ्यावर, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तालावर नाचत असल्याची टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे कृषी क्षेत्र गंभीर संकटात सापडले असताना भारतीय शेतकऱ्यांचा बळी दिला आहे. त्यांच्या भूमिकेमुळे भारतीय शेती व लक्षावधी शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर दूरगामी व विनाशकारी परिणाम होणार आहेत, असे ते…

Read More

Purple Line Commuters Flee Rain Inside Coach

पुण्यातील अत्याधुनिक आणि वेगवान सार्वजनिक वाहतुकीचा कणा समजल्या जाणाऱ्या पुणे मेट्रोमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाहेर पाऊस पडत असताना चक्क मेट्रोच्या कोचमध्येही पाण्याच्या धारा पडू लागल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. या घटनेचा . मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२१ मे) सायंकाळी पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यावेळी पिंपरी-स्वारगेट पर्पल लाईनवरून धावणाऱ्या एका मेट्रो…

Read More

NCP नेत्याने भर रस्त्यात टेबल ठेवून केक कापला:पुण्यातील येरवडा परिसरातील घटना; फटाक्यांची आतषबाजीही केली, 7 जणांवर गुन्हा

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने भर रस्त्यात टेबल टाकून वाढदिवसाचा केक कापल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सदर पदाधिकारी व त्याच्या मुलासह 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, किशोर राजाराम विटकर असे गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. किशोर विटकर हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत. येरवड्यातील गाडीतळ परिसरात त्यांचे संपर्क कार्यालय…

Read More

नागपूरमध्ये ओव्हरहेड केबल्सना नियमावली नाही:शहरात सर्वत्र तारांचे जाळे, मनपाकडे कारवाईचे अधिकार नाहीत

नागपूर शहरातील रस्ते आणि गल्लीबोळांमध्ये पसरलेले ओव्हरहेड केबल्सचे (टीव्ही आणि इंटरनेटच्या तारा) जाळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहे. या लटकणाऱ्या तारांमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येत असून अपघातांची शक्यताही वाढली आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत (RTI) समोर आलेल्या एका धक्कादायक माहितीनुसार, नागपूर महानगरपालिकेकडे या ओव्हरहेड केबल्स लावण्यासंदर्भात कोणतीही ठोस नियमावली अस्तित्वात नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी…

Read More

हिंदू धर्म नाही, लिंगायत बांधवांनी जनगणनेत केवळ 'लिंगायत' नोंदवा:बसवनंद स्वामीजींचे विधान, काळाराम मंदिराच्या पुजाऱ्यांचा आक्षेप

आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर लिंगायत धर्माच्या स्वतंत्र ओळखीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. “हिंदू हा धर्म नसून भारतात त्याला अधिकृत मान्यता नाही, त्यामुळे जनगणनेमध्ये धर्माच्या रकान्यात लिंगायत बांधवांनी केवळ ‘लिंगायत’ असेच नमूद करावे,” असे खळबळजनक आवाहन बंगळूर धर्मपीठाचे मठाधिपती जनबसवनंद स्वामीजी यांनी केले आहे. मात्र, त्यांच्या या भूमीकेला नाशिकच्या श्रीकाळाराम मंदिराचे पुजारी सुधीरदास महंत यांनी…

Read More