कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध रद्द करावा- तहसीलदारांना निवेदन:जामनेर येथे कृषी विभाग कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज
कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करून शेतकरी केंद्रित आकृतीबंध तयार करावा, अशी मागणी जामनेर कृषी विभाग महासंघाच्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. सोमवारी सुधारित आकृतीबंधा विरोधात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. नव्याने तयार करण्यात आलेल्या आकृतिबंधात प्रत्यक्ष क्षेत्रावरील कर्मचारी कमी करून कार्यालयीन कामकाजासाठी कर्मचारी वाढवण्यात आले आहेत. यामुळे क्षेत्रावर ५४ टक्केच कर्मचारी राहणार आहेत. त्यातही…