Headlines

CM Fadnavis Issues Directives for Ganesh Utsav 2026 & Road Maintenance

राज्याचा उत्सव म्हणून साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सव मंडळांना प्रसादाची शुद्धता आणि भाविकांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. मंडळांनी भाविकांना शुद्ध व भेसळमुक्त प्रसाद मिळे . गणेशोत्सव-२०२६ मधील कायदा व सुव्यवस्थेच्या तयारीसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. उत्सवाचे नियोजन करताना प्रशासन, गणेशोत्सव मंडळे आणि समन्वय समित्यांनी परस्पर समन्वयाने…

Read More

नेपाळमध्ये महापूर:ठाणे जिल्ह्यातील कैलास मानसरोवर यात्रेकरू संपर्काबाहेर, 31 जण अडकले असण्याची भीती, नातेवाईक चिंतेत

नेपाळ-चीन सीमेवरील रसुवा आणि भोटेकोशी परिसरात ढगफुटीनंतर आलेल्या भीषण महापुरामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या ठाणे जिल्ह्यातील अनेक भाविकांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. ठाणे शहर, नौपाडा, समता नगर, बाळकुम, कल्याण पश्चिम, डोंबिवली तसेच नवी मुंबईतील वाशी परिसरातील काही नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते. महापुरानंतर मोबाईल नेटवर्क विस्कळीत झाल्याने त्यांचा नातेवाईकांशी संपर्क तुटला आहे. २६ ऑगस्ट…

Read More

महागाई, बेरोजगारीविरोधात भाकपचा दिल्लीत मोर्चा:‘बदलाव जरुरी है’ घोषणेसाठी जिल्हाभर जनजागरण

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) महागाई, बेरोजगारी, शेतकरी-शेतमजुरांचे प्रश्न आणि महिलांवरील अत्याचाराविरोधात आक्रमक झाला आहे. या मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी भाकप १ सप्टेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर भव्य मोर्चा काढणार आहे. या मोर्चातून ‘बदलाव जरुरी है’ असा नारा दिला जाईल. देशात वाढती महागाई, शेतकरी-शेतमजुरांच्या समस्या, पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांची होणारी फसवणूक, युवकांमधील बेरोजगारी, तसेच महिला व अल्पसंख्याकांवर वाढते अत्याचार…

Read More

'बदलाव जरुरी है' अभियान: नांदगाव तालुक्यात 12 गावांत सभा:1 सप्टेंबरला दिल्लीत आंदोलनासाठी कार्यकर्त्यांची हाक

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) ‘बदलाव जरुरी है’ या देशव्यापी जनजागरण अभियानांतर्गत नांदगाव तालुक्यात १२ गावांमध्ये सभा घेतल्या. पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉम्रेड तुकाराम भस्मे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते १ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या आंदोलनासाठी शेतकरी, कामगार, युवक आणि असंघटित क्षेत्रातील लोकांना एकत्र करत आहेत. या अभियानाची सुरुवात ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी मंगरूळ चव्हाळा येथे रॅली आणि…

Read More

पुरावे असणाऱ्यांनी 8 दिवसांत अर्ज करावेत:तात्काळ दाखले देऊ, विखे पाटलांचे आवाहन; मनोज जरांगेंना केली उपोषण मागे घेण्याची विनंती

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे येत्या २९ ऑगस्टपासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या या उपोषणाच्या इशाऱ्यामुळे राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्याचे विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी…

Read More

पुणे वाहतूक नियोजनासाठी आता 'रिअल टाइम' डेटा वापरणार:विविध यंत्रणांकडून उपलब्ध डेटा एकत्र करून निर्णय

पुणे शहरात वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पुणे महानगरपालिका आता ‘रिअल टाइम ट्रॅफिक डेटा’चा वापर करणार आहे. विविध यंत्रणांकडून मिळणारा वाहतूक आणि प्रवासविषयक डेटा एकत्र करून, त्या आधारे वाहतूक नियोजन, रस्ते विकास आणि पायाभूत सुविधांबाबत निर्णय घेण्याचा प्रस्ताव पथ विभागाने तयार केला आहे. या प्रकल्पासाठी ‘पुणे अर्बन मोबिलिटी सेल’ स्थापन…

Read More

7 कोटी खर्चून बांधलेल्या बंधाऱ्यांना गेट का बसवले नाही?:लोकप्रतिनिधींच्या सवालाने अधिकारी निरुत्तर; दिशा समितीच्या बैठकीत अपूर्ण कामांवरून झाडाझडती

जलसंपदा विभागाकडून सात कोटी रुपये खर्चुन बंधारे बांधले मात्र त्यावर गेट न बसवताच कामे पूर्ण झाल्याचे कसे दाखविले, वाहून गेलेल्या पाण्यासाठी कोण जबाबदार असा सवाल लोकप्रतिधिंनी उपस्थित करताच अधिकारी निरुत्तर झाले. या कामांची चौकशी करण्याचे निर्देश गुरुवारी ता. २७ झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत दिले आहेत. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीची बैठक झाली. यावेळी समितीचे अध्यक्ष…

Read More

शिरूरमध्ये 56 ग्रॅम एमडी जप्त, दोघांना अटक:11.90 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; आठवड्यातील तिसरी मोठी कारवाई

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ५६ ग्रॅम एमडी हा प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त केला आहे. शिरूर परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण ११ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईत प्रदीप विठ्ठल कोरेकर आणि साईनाथ…

Read More

ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी मोदींना राखी पाठवली:पुण्यातून 350 हून अधिक ओबीसी जातींच्या हक्कांच्या रक्षणाची मागणी

महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी कार्यकर्ते आणि नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी पाठवून आंदोलन केले आहे. रक्षाबंधनाचे औचित्य साधत पुण्यातून ही मागणी करण्यात आली. महाराष्ट्रातील सुमारे ३५० हून अधिक ओबीसी जातींच्या आरक्षणावर गदा येत असल्याने, पंतप्रधानांनी रक्षणकर्त्याच्या भूमिकेतून तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ओबीसी प्रतिनिधींनी…

Read More

बुद्धिबळामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक स्थैर्य वाढते:डॉ. वेलणकर यांच्या संशोधनातून निष्कर्ष; व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी माध्यम

डॉ. मकरंद वेलणकर यांच्या पीएचडी संशोधनातून महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. बुद्धिबळ हा केवळ एक स्पर्धात्मक खेळ नसून किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी एक प्रभावी माध्यम ठरू शकतो, असे या संशोधनाने अधोरेखित केले आहे. त्यांचे हे संशोधन ‘किशोरवयीन मुलांचा आत्मविश्वास आणि सारासार विचार करण्याची क्षमता यावर बुद्धिबळ प्रशिक्षणाचा होणारा परिणाम – एक वर्णनात्मक अभ्यास’ या…

Read More