Headlines

अकरावी प्रवेशाची पहिली यादी २९ मे रोजी जाहीर:दुपारपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू; नोंदणी व अर्ज प्रक्रिया पूर्ण

अकरावीच्या प्रवेशासाठीची पहिली यादी २९ मे रोजी जाहीर होणार असून, त्याच दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. प्रवेश अर्जाचा भाग एक व दोनमधील तपशील पूर्ण करण्याची अंतिम मुदत २५ मे रोजी संपली आहे. ही यादी शुक्रवार, २९ मे रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन जाहीर केली जाईल आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालये व विद्यार्थ्यांना…

Read More

पुण्यातील खाऊगल्ल्या रात्री 10 वाजता बंद:सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलीस आयुक्तांचा निर्णय

पुण्यातील खाऊगल्ल्या आता रात्री १० वाजता बंद केल्या जाणार आहेत. सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. पदपथ आणि रस्त्यावरील हातगाड्या, स्टॉल तसेच ठेले यांना रात्री १० वाजेपर्यंतच व्यवसाय करण्याची कायदेशीर परवानगी आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या रात्री १२ ते १ वाजेपर्यंत सुरू असतात….

Read More

कोठडीतील आरोपीला घरचे जेवण देणे पडले महागात:कळमनुरीतील पोलीस जमादार निलंबित, एस.पी. डॉ. नीलाभ रोहन यांचे आदेश

कळमनुरी पोलीस ठाणे अंतर्गत खूनाच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला घरचे जेवण देणे पोलीस जमादाराला चांगलेच महागात पडले असून संबंधित जमादाराला सोमवारी ता २५ निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी काढले आहेत. कळमनुरी पोलीस ठाणे अंतर्गत कळमनुरी शहरांमध्ये दिनांक 23 मे रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.या प्रकारात तातडीने आरोपींची…

Read More

अवकाळी पावसाने वेरूळला झोडपले!:अर्धा तास चाललेल्या पावसामुळे लेणी परिसर जलमय, पर्यटकांची तारांबळ; बळीराजा पुन्हा चिंतेत

वेरूळ व परिसरात आज दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या काळ्या ढगांसह विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली आणि पाठोपाठ सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही भागात गारपीटही झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसामुळे संपूर्ण वेरूळ परिसर जलमय झाला. अचानक आलेल्या पावसामुळे…

Read More

रमाई साहित्य संमेलन 30 मे रोजी:रमणी सोनवणे अध्यक्ष; पुणे येथे एकदिवसीय आयोजन

महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने शनिवार, ३० मे २०२६ रोजी पुणे येथे एकदिवसीय ‘रमाई साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी विद्रोही कवयित्री, लेखिका, व्याख्याती आणि अभिनेत्री रमणी सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या ९१…

Read More

'शांत मन – द सीक्रेट ऑफ लाईफ' पुस्तकाचे प्रकाशन:मनाची शांती समजण्यासाठी नैसर्गिक नाते गरजेचे – डॉ. संप्रसाद विनोद

आत्मयोगगुरू डॉ. संप्रसाद विनोद यांनी ‘मनाची शांती समजून घेण्यासाठी त्याच्याबरोबर नैसर्गिक नाते निर्माण करण्याची गरज’ असल्याचे मत व्यक्त केले. लेखक कौस्तुभ साबळे यांच्या ‘शांत मन – द सिक्रेट ऑफ लाईफ’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. आयुष प्रकाशनातर्फे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे, प्रसिद्ध नाटककार डॉ….

Read More

गडचिरोलीत कडक उन्हाचा फटका पक्ष्यांनाही!:एकाच झाडावरच्या 500 वटवाघळांचा मृत्यू; जंगलात दुर्गंधी पसरल्याने प्रकार उघडकीस

महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात उकाडा चांगलाच वाढला आहे. तीव्र उष्णता तसेच जवळपास 46 डिग्री पर्यंतचे तापमान, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात उष्माघातामुळे देखील अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या उन्हाचा फटका केवळ मनुष्यांनाच बसत आहे असे नाही. गडचिरोलीमध्ये उष्णतेमुळे तब्बल 500 वटवाघळांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या…

Read More

अमृता खानविलकरला नटरंग कलागौरव पुरस्कार:गिरीश बापट स्मृती कृतज्ञता पुरस्कार शिरीष मोहिते यांना जाहीर

नटरंग ॲकॅडमीतर्फे दिल्या जाणाऱ्या ३२व्या स्व. शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्काराने लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना अमृता खानविलकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, चौथ्या स्वर्गीय गिरीश बापट स्मृती नटरंग प्रतिष्ठान सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गणेशभक्त व सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते यांचा गौरव केला जाईल. पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार, २९ मे २०२६ रोजी सायंकाळी…

Read More

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात 'आप'चा मोर्चा:महागाईविरोधात आंदोलन; पुणे मनपाला दिले ७ 'प्रति-आव्हाने'

पुण्यात आम आदमी पार्टीने (आप) पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या वाढत्या किमती तसेच महागाई व बेरोजगारीविरोधात सोमवारी अनोखे ‘बैलगाडी आंदोलन’ केले. ‘आप’च्या शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयापासून पुणे महानगरपालिका इमारतीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. ‘पेट्रोलचे भाव कधी कमी होणार? मेलोडी खावो, खुद जान जाओ’ आणि ‘महागाई…

Read More

हनकदरी शिवारात उष्माघाताने एका व्यक्तीचा मृत्यू:सेनगाव पोलिस ठाण्यात नोंद, जिल्ह्यातील चौथा बळी

सेनगाव तालुक्यातील हनकदरी शिवारात उष्माघाताने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात रविवारी ता. २४ रात्री उशीरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उष्णतेमुळे जिल्ह्यातील चौथा बळी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील हनकदरी येथील उकंडी उर्फ संतोष गोपाल धाबे (४८) हे शनिवारी ता. २३ कामा निमित्त घरातून बाहेर पडले होते….

Read More