Headlines

खतांचा अतिरेक टाळा, नैसर्गिक शेतीकडे वळा‎:राहुरी कृषि विद्यापीठाकडून दोन हजार वारकरी-शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेतीचे धडे

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे औचित्य साधून महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे यांच्या वतीने वारकरी-शेतकऱ्यांसाठी विशेष कृषि प्रबोधन व जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियान . कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या संकल्पनेतून आणि अधिष्ठाता डॉ. सात्ताप्पा खरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. कृषि महाविद्यालय, पुणेचे सहयोगी…

Read More

खडक माळेगाव-खानगाव शिवरस्ता मोकळा:अनेक वर्षांची ‘रस्ता कोंडी’ अखेर फोडली; 250 शेतकरी कुटुंबांना दिलासा

निफाड तालुक्यातील खडक माळेगाव-खानगाव परिसरातील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या शिवरस्त्याचा प्रश्न अखेर शुक्रवारी (दि. १० जुलै) मार्गी लागला. निफाड चे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक शेतकरी खातेदार यांच्या समन्वयातून रस्त्यावरील लोखंडी अडथळे हटविण्यात आले. त्यामुळे सुमारे २ ते अडीच किलोमीटरचा शिवरस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाला असून, परिसरातील सुमारे २००…

Read More

60 वर्षांची इमारत:11 उपकेंद्रांचा भार सांभाळणाऱ्या केंद्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, सव्वा लाख नागरिकांच्या आरोग्याचा आधार धोक्यात, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी‎

जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या आमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राची ६० वर्षांपूर्वीची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली असून, तब्बल सव्वा लाख लोकसंख्येचा भार वाहणारे हे आरोग्य केंद्राच्या इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत आहे. या आर . इमारतीतील अनेक भागांतील स्लॅबचे काँक्रीट कोसळून छताच्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. छताला मोठी भगदाडे पडली असून, पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण इमारत…

Read More

दिल्लीत जाण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री म्हणाले, ‘परवाच तर जाऊन आलो:केंद्रात मंत्रिपदाच्या राऊत यांच्या दाव्यावर फडणवीसांची मिश्किल टिप्पणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीत जाऊन केंद्रीय अर्थमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारणार, या राजकीय चर्चेला खुद्द फडणवीस आणि त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्णविराम दिला. मुख्यमंत्र्यांनी मी परवाच दिल्लीला जाऊन, आलो, मिश्कील टि . फडणवीस यांना लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळेल आणि त्यांच्या जागी बावनकुळे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील, असा दावा ठाकरे गटाचे…

Read More

"समृद्धी’वर भरधाव ट्रकने जीवरक्षकालाच चिरडले:अपघात करून पळालेला ट्रक 12 तासांत जप्त

समृद्धी महामार्गावर शनिवारी (दि. ११) रात्री साडेबाराच्या सुमारास अपघात घडला. महामार्गावर नादुरुस्त झालेल्या एका कारमधील प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी बॅरिकेडिंग करणाऱ्या महामार्ग आपत्कालीन मदत वाहनाचे (आरपीओ) चालक मुन्नालाल प्रजापती (३४) यांना मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकची चाके प्रजापती यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने पायांच्या अक्षरशः चिंध्या उडाल्या, तर डोके…

Read More

रेल्वेत कामाच्या ताणामुळे होटगीस्टेशन मास्तर टाॅवरवर चढला:आत्महत्या करण्याचा प्रयत्न, तीन तास आंदोलनानंतर खाली उतरले

कामाची जबाबदारी नसताना काम लावणे, रेल्वे डीआरएम कार्यालयात बोलावून दिवसभर बसवून ठेवणे, कर्तव्याचा भाग नसताना सुरक्षा कवच टॉवरवर चढवून काम करायला लावल्याने होटगी स्टेशन येथील स्टेशन मास्तर यांनी शनिवारी सकाळी स्टेशन येथील सुरक्षा कवचच्या टॉवरवर १०० फूट वर चढून आंदोलन सुरू केले. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार दोन ते तीन तास सुरू होतो. शेवटी…

Read More

मत्स्यविज्ञान महाविद्यालयाने महिलांना दिले व्यावसायिक प्रशिक्षण:गोड्या पाण्यातील माशांपासून मूल्यवर्धित पदार्थ बनवण्याचे धडे

मोर्शी येथे मत्स्यविज्ञान महाविद्यालय आणि उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण महिलांसाठी तीन दिवसीय व्यावसायिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिलांना गोड्या पाण्यातील माशांपासून ‘मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि समारोपीय कार्यक्रमात त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. मोर्शी तालुक्यातील स्वयंसाहाय्यता महिला बचतगटांच्या महिलांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. त्यांना…

Read More

लाडकी-पिंपळखुटा-बोडना रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य:निकृष्ट कामामुळे नागरिक त्रस्त, अपघातांची भीती

मोर्शी प्रतिनिधी: लाडकी, पिंपळखुटा आणि बोडना गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शासनाकडून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असतानाही, एका खासगी कंपनीने बांधलेल्या या रस्त्यावर माती आणि मुरमाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे या तिन्ही गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या या…

Read More

अयोध्या राम मंदिर देणगी अपहार:युवक काँग्रेसचा 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह, डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात अमरावतीत आंदोलन

अमरावती येथे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसने आज, शनिवारी ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह केला. अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्यांमध्ये कथित अपहार झाल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. कठोरा रोडवरील सौरभ कॉलनी परिसरातील श्रीराम मंदिरात हे प्रतीकात्मक आंदोलन झाले. यावेळी उपस्थितांनी प्रभू श्रीरामांची आरती करून भाविकांच्या श्रद्धेचा अपमान झाल्याचा निषेध केला. डॉ. देशमुख…

Read More

शहर स्वच्छतेसाठी आयुक्त अमोल येडगे स्वतः मैदानात:दोन दिवसांत 1 लाखांचा दंड वसूल, 'संभाजीनगर पॅटर्न'ची चर्चा

छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छतेसाठी मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून ‘विशेष संयुक्त पाहणी पथके’ स्थापन करण्यात आली आहेत. आयुक्त स्वतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर उतरून या मोहिमेची पाहणी करत आहेत. हा अभिनव ‘छत्रपती संभाजीनगर पॅटर्न’ यशस्वी झाल्यास तो देशासाठी कचरा व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त होत आहे. शहराच्या विविध भागांवर लक्ष ठेवण्यासाठी २९…

Read More