Headlines

लामनगावातील काळेआणि मालोदे वस्तीकरांचे आमरण उपोषण मागे:मंगळवारी रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन, 40 वर्षांचा संघर्ष सुटला‎

तालुक्यातील लामनगाव येथील काळे व मालोदे वस्तीवरील नागरिकांचे ४० वर्षांपासून प्रलंबित हक्काच्या रस्त्यासाठीचे आमरण उपोषण मंगळवारी सुटले. आमदार प्रशांत बंब यांच्या हस्तक्षेपानंतर तहसील प्रशासनाने मंगळवारी सकाळी रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. सोमवारी खुलताबाद तहसील कार्यालयासमोर आंदोलन झाले. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले. ४० हून अधिक नागरिक उपस्थित…

Read More

शेततळ्यातील पाणी पाहण्याचा मोह बेतला जिवावर:गावामध्ये हळहळ, खुल्ताबाद तालुक्यातील धामणगाव तांडा येथील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू‎

शेततळ्यात साचलेले पाणी पाहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय शाळकरी मुलाचा पाय घसरला. तो खोल पाण्यात पडला. त्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना खुलताबाद तालुक्यातील धामणगाव तांडा येथे सोमवारी दुपारी घडली. मयुर प्रभू राठोड असे मृत विद् . सोमवारी दुपारी मयूर हा आपल्या चार ते पाच मित्रांसोबत गावालगतच्या डोंगर परिसरात करवंदे खाण्यासाठी गेला होता….

Read More

भोंदू अशोक खरातची 13.92 कोटींची रोकड, फार्महाऊस, मर्सिडीज कार जप्त:26 मेपर्यंत ईडी कोठडीत, राहाता आणि अहिल्यानगर येथील गुन्हेही जोडले

स्वतःला देवाचा अवतार सांगून आणि काळ्या जादूची भीती दाखवून भाविकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा अशोककुमार एकनाथ खरात उर्फ “कॅप्टन” याला अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली असून, सध्या तो २६ मे २०२६ पर्यंत ७ दिवसांच्या ईडी कोठडीत आहे. ईडी . तपासाची व्याप्ती वाढवत शिर्डी, राहता आणि अहिल्यानगर येथील गुन्हेही यात जोडण्यात आले. या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा…

Read More

मध्यरात्रीच्या 2 अपघातांत 14 ठार:एका घटनेत वळणाचा अंदाज चुकल्याने तर दुसऱ्यात चालकाचा राँगसाइड टर्नने मृत्यू ओढवला

शनिवार, रविवारी मध्यरात्री दोन अपघातांत ८ तरुणांसह १४ जणांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील अपघात चालकाचा घाट वळणाचा अंदाज चुकल्याने घडला असावा, तर दुसरा धुळ्याच्या लळिंग घाटात चालकाने राँगसाइड टर्न घेतल्याने झाल्याचे प्राथमिक तपासात दिसले. आंबेनळी घाटात ८०० फूटखोल दरीत कार कोसळली महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर रायगड जिल्ह्यातील धोकादायक आंबेनळी घाटात दाभिळ टोक येथे शनिवारी रात्री बारा वाजेच्या…

Read More

आरटीई प्रवेशासाठी २९ मे अंतिम तारीख:प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २९ मे पर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. शिक्षण विभागाने ही अंतिम तारीख निश्चित केली असून, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतले नाहीत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश या मुदतीत पूर्ण करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील २२७ इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत एकूण २ हजार ५८६…

Read More

बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, 70 लाखांची फसवणूक उघड:पुणे पोलिसांनी गुजरातमध्ये दोघांना केली अटक

पुणे पोलिसांनी एका मोठ्या फसवणूक टोळीचा पर्दाफाश केला आहे. परदेशी कॉल सेंटरसाठी प्रकल्प आणि सेटअप उभारून देण्याचे आमिष दाखवून या टोळीने तब्बल ७० लाख ८५ हजार ४५३ रुपयांची फसवणूक केली होती. पुणे पोलिसांच्या तपास पथकाने गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात छापा टाकून एका बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड केला असून, दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Read More

अकरावी प्रवेशाची पहिली यादी २९ मे रोजी जाहीर:दुपारपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू; नोंदणी व अर्ज प्रक्रिया पूर्ण

अकरावीच्या प्रवेशासाठीची पहिली यादी २९ मे रोजी जाहीर होणार असून, त्याच दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. प्रवेश अर्जाचा भाग एक व दोनमधील तपशील पूर्ण करण्याची अंतिम मुदत २५ मे रोजी संपली आहे. ही यादी शुक्रवार, २९ मे रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन जाहीर केली जाईल आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालये व विद्यार्थ्यांना…

Read More

पुण्यातील खाऊगल्ल्या रात्री 10 वाजता बंद:सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलीस आयुक्तांचा निर्णय

पुण्यातील खाऊगल्ल्या आता रात्री १० वाजता बंद केल्या जाणार आहेत. सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. पदपथ आणि रस्त्यावरील हातगाड्या, स्टॉल तसेच ठेले यांना रात्री १० वाजेपर्यंतच व्यवसाय करण्याची कायदेशीर परवानगी आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या रात्री १२ ते १ वाजेपर्यंत सुरू असतात….

Read More

कोठडीतील आरोपीला घरचे जेवण देणे पडले महागात:कळमनुरीतील पोलीस जमादार निलंबित, एस.पी. डॉ. नीलाभ रोहन यांचे आदेश

कळमनुरी पोलीस ठाणे अंतर्गत खूनाच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला घरचे जेवण देणे पोलीस जमादाराला चांगलेच महागात पडले असून संबंधित जमादाराला सोमवारी ता २५ निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी काढले आहेत. कळमनुरी पोलीस ठाणे अंतर्गत कळमनुरी शहरांमध्ये दिनांक 23 मे रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.या प्रकारात तातडीने आरोपींची…

Read More

अवकाळी पावसाने वेरूळला झोडपले!:अर्धा तास चाललेल्या पावसामुळे लेणी परिसर जलमय, पर्यटकांची तारांबळ; बळीराजा पुन्हा चिंतेत

वेरूळ व परिसरात आज दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या काळ्या ढगांसह विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली आणि पाठोपाठ सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही भागात गारपीटही झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसामुळे संपूर्ण वेरूळ परिसर जलमय झाला. अचानक आलेल्या पावसामुळे…

Read More