Headlines

लाडकी-पिंपळखुटा- बोडना रस्त्यावर चिखल:नागरिक संकटात, शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष‎

ग्रामीण भागातील रस्त्यांचे भाग्य बदलण्यासाठी शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना मात्र प्रशासन आणि कंत्राटदारांच्या मनमानी व ढिसाळ कारभारामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एका खासगी कंपनीने हा रस्ता बांधला आहे. परंतु त्यासाठीचे साहित्य अत्यंत बोगस आणि निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे लाडकी, पिंपळखुटा लहान, बोडना या गावातील नागरिक मोठ्या संकटात सापडले…

Read More

विद्यार्थी दिन साजरा‎:विद्यार्थी नेतृत्व घडवण्यात अभाविपचे योगदान, ॲड. गिरीश गोखले यांचे प्रतिपादन

विद्यार्थी हा समाजाचा व राष्ट्राचा भावी कणा मानला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या संघटनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. देशातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनांपैकी एक असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गत सात दशकांहून अधिक काळ विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी व नेतृत्वगुण विकसित करण्याचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन अभाविपचे कार्यकर्ते तथा नगरसेवक ॲड. गिरीश…

Read More

अल्प दरात शिलाई मशीन; एक महिन्याचे प्रशिक्षण:स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन; तंत्रशुद्ध मार्गदर्शन‎

शहरातील जुने शहर परिसरात ‘वैष्णवी शिवण क्लास’ च्या वतीने स्थानिक महिलांसाठी अल्प दरात शिलाई मशीन वाटप आणि एक महिन्याच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने शीतल गिरी यांनी या उपयुक्त उपक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला जुने शहर परिसरातील शेकडो महिलांनी उपस्थित राहून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात…

Read More

‘हरित अमरावती’साठी वृक्षारोपण, ‘एक वृक्ष-एक जीवन’चा संकल्प:बुद्ध जयंती उत्सव समिती, सुखाय फाउंडेशनचा पुढाकार

पर्यावरण संवर्धन आणि ‘हरित अमरावती’च्या निर्मितीचा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्याच्या उद्देशाने बुद्ध जयंती उत्सव समिती आणि सुखाय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता दुभाजकाच्या कॅरीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. वाढते तापमान, झाडांची होणारी कत्तल, शहरीकरणामुळे कमी होत चाललेली हरित संपदा आणि पर्यावरणाचा बिघडलेला समतोल याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली. उपस्थितांनी…

Read More

वाखरीत 7 लाख भाविकांसाठी पालखी तळ:शौचालय परिसरात 2500 चौ. फुटांचे काँक्रीटीकरण, तर विहिरीभोवती ‎संरक्षण खांब‎

पालखी मार्गावरील अखेरच्या मुक्कामाचे ठिकाण असलेल्या वाखरी येथील पालखी तळावरील भाविकांच्या स्वागताची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. नव्याने रस्त्यांचे काँक्रीटीकरण, आवश्यक तेथे मुरुमीकरण, गवत, झुडुपे काढून सफाई करण्याची कामे सुरू आहेत. येत्या ८ दिवसांत संपूर्ण पालखी तळ सुसज्ज करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. वाखरी पालखी तळावर राज्यभरातून येणाऱ्या अनेक पालखी सोहळ्यांचा मुक्काम असतो….

Read More

पैस खांबाची सावली, माऊलींचे रूप; ‘ज्ञानेश्वरी घाटा’ने पालटले रूपडे:यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा पुढाकार; टाळ-मृदंगाच्या गजरात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा‎

संत परंपरेचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नेवासा-सोनई परिसरातील ज्ञानेश्वरी पायी दिंडी सोहळ्याच्या मुख्य मार्गावरील ‘इमामपूर घाटा’चे आता ‘ज्ञानेश्वरी घाट’ असे नामकरण करण्यात आले आहे. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आणि हजारो वारकऱ्यांच्या अथांग . नेवासा भूमीतून पंढरपूरकडे कूच करणाऱ्या वारकऱ्यांचा थकवा दूर व्हावा आणि भक्तीचा हुरूप वाढावा, यासाठी या घाटाचा कायापालट करण्यात आला आहे. घाटाच्या पायथ्याशी संत…

Read More

15 किलोमीटर लांब वारकऱ्यांची रांग; 60 हजारांहून अधिक वैष्णवांचा मेळा:पिंपळगाव माळवी ते अहिल्यानगर शहरापर्यंत पर्यंत भक्तिमय वातावरण‎

मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच क्षणभर आपण अहिल्यानगरात नसून थेट पंढरपुरात पोहोचलो आहोत, असा भास होत होता. चहुबाजूंनी फडकणाऱ्या भगव्या पताका, ज्ञानोबा-तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलाच्या अखंड गजरात मार्गक्रमण करणारे हजारो वारकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, गळ्यात टाळ आणि चेहऱ्यावर भक्तिभाव… संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीच्या आगमनाने शनिवारी सायंकाळी मार्केट यार्ड परिसर अक्षरशः मिनी पंढरपूर…

Read More

खतांचा अतिरेक टाळा, नैसर्गिक शेतीकडे वळा‎:राहुरी कृषि विद्यापीठाकडून दोन हजार वारकरी-शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेतीचे धडे

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे औचित्य साधून महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे यांच्या वतीने वारकरी-शेतकऱ्यांसाठी विशेष कृषि प्रबोधन व जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियान . कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या संकल्पनेतून आणि अधिष्ठाता डॉ. सात्ताप्पा खरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. कृषि महाविद्यालय, पुणेचे सहयोगी…

Read More

खडक माळेगाव-खानगाव शिवरस्ता मोकळा:अनेक वर्षांची ‘रस्ता कोंडी’ अखेर फोडली; 250 शेतकरी कुटुंबांना दिलासा

निफाड तालुक्यातील खडक माळेगाव-खानगाव परिसरातील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या शिवरस्त्याचा प्रश्न अखेर शुक्रवारी (दि. १० जुलै) मार्गी लागला. निफाड चे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक शेतकरी खातेदार यांच्या समन्वयातून रस्त्यावरील लोखंडी अडथळे हटविण्यात आले. त्यामुळे सुमारे २ ते अडीच किलोमीटरचा शिवरस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाला असून, परिसरातील सुमारे २००…

Read More

60 वर्षांची इमारत:11 उपकेंद्रांचा भार सांभाळणाऱ्या केंद्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, सव्वा लाख नागरिकांच्या आरोग्याचा आधार धोक्यात, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी‎

जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या आमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राची ६० वर्षांपूर्वीची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली असून, तब्बल सव्वा लाख लोकसंख्येचा भार वाहणारे हे आरोग्य केंद्राच्या इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत आहे. या आर . इमारतीतील अनेक भागांतील स्लॅबचे काँक्रीट कोसळून छताच्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. छताला मोठी भगदाडे पडली असून, पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण इमारत…

Read More