Headlines

गुन्हेगारी थांबवता येईना अन् गरिबांचे धंदे बंद करताय:पुण्यात रात्री 10 नंतर दुकानबंदीच्या निर्णयावर सुप्रिया सुळे संतापल्या

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिस प्रशासनाने लागू केलेल्या रात्रीच्या निर्बंधांवरून सरकार आणि प्रशासनावर कडाडून हल्ला चढवला आहे. पुण्यात चौदा दिवसांचे प्रतिबंधात्मक आदेश लागू करत रात्री 10 नंतर खाऊ गल्ल्या, फेरीवाले आणि छोट्या व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत, 24 तास धावणाऱ्या या शहरात…

Read More

इंधन दरवाढीचा फटका स्कूल बस मालकांना:शाळा आठवड्यातून 3 दिवस भरवून उर्वरित 2 दिवस ऑनलाईन वर्ग घेण्याची मागणी

राज्यातील शाळा आठवड्यातून 3 दिवसच भरवा आणि उर्वरित 2 दिवस ऑनलाईन वर्ग सुरू ठेवा, अशी मागणी राज्यातील स्कूल बस संघटनेने केली आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना कोरोना काळासारखेच ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळण्याची शक्यता आहे. उन्हाळी सुट्ट्यानंतर जून महिन्यात पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजेल. सर्वत्र विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकू येईल. पण राज्यातील इंधन संकट…

Read More

विकास लवांडेंना जामीन देण्यास पोलिसांचा विरोध:तक्रारदार, साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता; वारीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न

वारकरी संप्रदायाविषयी कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन देण्यास पुणे पोलिसांनी न्यायालयात विरोध केला आहे. लवांडे तक्रारदार आणि साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, तसेच आषाढी एकादशीनिमित्त आगामी वारी सोहळ्याच्या काळात अशा वक्तव्याची पुनरावृत्ती झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी कारणे पोलिसांनी दिली…

Read More

सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी:विधान परिषदेसाठी मुलं, नातेवाईकांसाठी लॉबिंग; देवगिरीवर राजकीय खलबतं रंगली

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून मुंबईतील देवगिरी बंगल्यावर नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. विविध मतदारसंघांतील जागा आपल्या पक्षाला किंवा समर्थकांना मिळाव्यात यासाठी महायुती आणि इतर पक्षांतील नेते जोरदार लॉबिंग करत असल्याचे चित्र दिसत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी अनेक इच्छुक नेत्यांनी हजेरी लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषद…

Read More

हिंगोली-औंढा मार्गावर हिवरा जाटू शिवारात दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू:रस्त्यावर कोसळल्याने डोक्याला गंभीर दुखापत

हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर हिवराजाटू शिवारात दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृ्त्यू झाल्याची घटना सोमवारी ता. २५ रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मयत तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळा येथील रहिवासी असलेला इंद्रजीत मारकड (२४) हा औंढा तालुक्यातील कुंडकर पिंपरी शिवारातील सौर…

Read More

काॅर्पोरेट जिहाद:नगरसेवक मतीनची 10 तास कसून चौकशी, नाशिकला पुढील सोमवारी पुन्हा हजर राहण्याचे आदेश

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलची नाशिक पोलिसांनी १० तास कसून चौकशी केली. या प्रकरणात दिलेल्या नोटिसीनुसार मतीन पटेल सोमवारी नाशिक पोलिस आयुक्तालयात चौकशीसाठी हजर झाला. तो सोमवारी पोलिसांना शरण येणार असे वृत्त ‘दिव्य मराठी’ने रविवार,२४ मे रोजीच दिले होते. सोमवारी सकाळी ११:३६ वाजता मतीन पटेल दोन वकिलांसह नाशिक गुन्हे…

Read More

सर्व क्षेत्रांत काम करताना पक्ष संघटना हेच खरे बळ:मंत्री विखे पाटील यांचे प्रतिपादन; बूथ स्तरापर्यंत कामाला गती देण्याचे आवाहन‎

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेला अंत्योदयाचा मंत्र हा प्रत्येक भाजप कार्यकर्त्यासाठी आत्मा आहे. पक्षाचा विचार घेऊनच समाजातील सर्व क्षेत्रांत काम करताना पक्ष संघटना हेच आपल्या सर्वांसाठी खरे बळ आहे. देशाच्या विकास प्रक्रियेलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच अंत्योदयाच्या विचारांची जोड दिली आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. भाजपच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि…

Read More

ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमाला:देशाला पोखरणाऱ्या डाव्या विचाराच्या वाळवीचा धोका ओळखा, लेखक अभिजित जोग यांचे आवाहन

जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षांमुळे कुठल्याही क्षणी तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडू शकतो अशी परिस्थिती आहे. अशा काळात जगात काही विध्वंसक शक्ती संस्कृती नष्ट करण्याचे काम करत आहेत. भारतासह विविध देशांमध्ये मार्क्सवादी डाव्या विचाराच्या वाळवीने शिक्षण संस्था, प्रसारमाध्यमे, चित्रपट, साहित्य, राजकीय पक्ष आणि न्यायव्यवस्थेला पोखरून मोठे संकट निर्माण केले आहे. आपली कुटुंबव्यवस्था, धर्म आणि देशप्रेम संपवण्याचा…

Read More

गावाच्या सर्वंकष विकासासाठी मोरणा नदी स्वच्छता अभियानाचा श्रीगणेशा:ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन; पर्यावरण संवर्धनाचा केला निर्धार‎

“स्वच्छ नदी, हरित भविष्य व समृद्ध गाव’ या संकल्पनेवर आधारित चांदूर येथे प्रथमच गावकऱ्यांच्या श्रमदानावर आधारित मोरणा नदी स्वच्छता अभियानाचा रविवारी श्रीगणेशा झाला. या अभियानात संपूर्ण गाव, स्वयंसेवी संस्था, संघटना सहभागी होऊन नदी परिसर स्वच्छ करणार अ . जिल्ह्यात मोर्णा नदी ही एक प्रमुख नदी मानली जाते. चांदूर परिसरातून ती पुढे जाते. मात्र अलीकडे या…

Read More

जनगणनेच्या कार्यातील शिक्षकाचा मृत्यू:विमाकवच लागू करण्यात यावे, शिक्षक संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; कुटुंबाला अर्थसाहाय्य आवश्यक‎

जनगणनेचे राष्ट्रीय कार्य करताना शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. हे कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांना विमा कवच लागू करण्यात यावे. अशी मागणी जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी तथा जनगणना अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. अ . जनगणना राष्ट्रीय कार्य आहे. नागरिकांनी दिलेल्या अचूक माहितीवर पुढील १० वर्षांसाठी जिल्ह्याच्या शाळा, दवाखाने, रस्ते, पाणीपुरवठा योजना, रेशन…

Read More