Headlines

शांतता, ज्ञानाचा प्रकाश अन् बंधुभावाचा संदेश; ईद-उल-मिलादुन्नबीचा जल्लोष:मोहम्मद पैगंबर यांनी सन्मानाचा मार्ग दाखवला- आ. खोडके‎

हजरत मोहम्मद पैगंबर यांनी मानवजातीला सत्य, न्याय, करुणा आणि परस्पर सन्मानाचा मार्ग दाखविला. त्यांच्या शिकवणुकीतून समाजात शांतता, सद्भावना आणि एकोपा निर्माण करण्याची प्रेरणा मिळते. त्यांचा जन्म हा संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी सुखकर ठरला, म्हणूनच जीवनात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे झालेल्या चुकांची क्षमायाचना करून सदाचाराचा मार्ग अवलंबित सर्वानी विकासाच्या ध्येयाने प्रेरीत होऊन समृद्धीकडे वाटचाल करण्याचे आवाहन आमदार सुलभा…

Read More

पंढरपूर तालुक्यामधील 31,167 लाभार्थींच्या घरकुल यादीचे ग्रामसभेत झाले ’सोशल ऑडिट’:पक्क्या घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना; पडताळणीनंतरच यादी होणार अपलोड‎

पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना आशेचा किरण ठरणार आहे. योजनेच्या लाभासाठी वर्षभरापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात तालुक्यातील ९५ गावांमधून तब्बल ३१ हजार १६७ कुटुंबांची नोंद झाली आहे. गावोगावी विशेष ग् . यादीत नाव नोंदवले नसेलतर नव्याने नोंदवण्याची संधी ग्रामसभेत हरकत नोंदवण्याचे आवाहन ^घरकुल यादी बाबत ज्यांना आक्षेप आहेत, तसेच सर्वेक्षणावेळी ज्यांची नावे…

Read More

आजच्या काळात विद्यार्थ्यांसाठी खेळ आणि व्यायाम अत्यंत आवश्यक- गोरे:पाथर्डीमध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎

सध्याच्या धावपळीच्या आणि वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या शरीरासोबतच मनाची मजबुतीही महत्त्वाची असून त्यासाठी खेळ आणि व्यायाम आवश्यक आहेत, असे प्रतिपादन बेस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा भाऊसाहेब गोरे यांनी केले. पाथर्डी येथील चॅम्पियन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास व आनंददायी शिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी तालुका तायक्वांदो अकादमीचे सचिव अंबादास साठे…

Read More

शाळेतील 834 विद्यार्थ्यांनी साकारल्या हजारो कल्पक राख्या:जवानांच्या मनगटासाठी देशभक्तीचा धागा, टपाल विभाग समर्थ शाळेचा अनोखा उपक्रम‎

भारतीय सैनिकांच्या मनगटावर रक्षाबंधनाच्या दिवशी प्रेम, कृतज्ञता आणि देशभक्तीचा धागा बांधण्यासाठी सावेडी येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेतील ८३४ विद्यार्थ्यांनी अनोखा संकल्प साकारला. भारतीय टपाल विभागाच्या उत्तर उपविभाग, सहाय्यक अधीक्षक कार्यालय, . प्राचार्या वसुधा जोशी यांच्या पर्यावरणपूरक ‘समर्थ राखी’ संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी कागद, पुठ्ठा, लाकूड, लोकर, दोरा यांसह विविध पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला. आरसे, मणी, टिकल्या,…

Read More

अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांना आता मराठीशिकण्यासाठी एक वर्ष मुदतवाढ- फडणवीस:उत्तर प्रदेश निवडणुका,बिहारच्या राजकारणामुळे फडणवीसांचे ‘डॅमेज कंट्रोल’

अमराठी रिक्षा, टॅक्सीचालकांना दैनंदिन संवादापुरती जुजबी मराठी शिकण्यासाठी राज्य सरकारने आता १ वर्षाची मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत भाषेच्या कारणावरून चालकांवर कोणतीही दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. महायुती समर्थक हाजी अराफत यांच्या नेतृत्वाखालील चालक संघटनांच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर हा दिलासा देण्यात आला. प्रमाणपत्र वाटपात भोजपुरी गाण्यांमुळे…

Read More

श्रावणामध्ये मटण मागितल्याने वडिलांनी मुलाला संपवले:पुण्यात आई-वडील अटकेत, मृताची पत्नी आणि 2 मुले माहेरी

श्रावण महिन्यात मटणाचे जेवण बनवण्याची मागणी केल्यामुळे वडील आणि मुलामध्ये झालेल्या वादाला हिंसक वळण मिळाले. वडिलांनी केलेल्या मारहाणीत ३० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात घडली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी मृत तरुणाच्या आई-वडिलांना अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव महेश भागवत गायकवाड असे आहे. पोलिसांनी त्याचे वडील भागवत सूर्यभान गायकवाड (६४)…

Read More

अडकलेल्या ठेवींसाठी आमदार सत्तार यांना साकडे:ठेवी परत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही‎

आदर्श महिला नागरी पतसंस्थेत अडकलेल्या ठेवी तातडीने परत मिळाव्यात, या मागणीसाठी त्रस्त ठेवीदारांनी सिल्लोड येथील शिवसेना कार्यालयात आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. वैद्यकीय उपचार, आजारपण आणि विविध कौटुंबिक गरजांसाठी पैशांची अत्यंत निकड असल्याने ठेवींची रक्कम तात्काळ उपलब्ध करून देण्याची विनवणी ठेवीदारांनी केली. यावर आमदार सत्तार यांनी सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील…

Read More

जिममध्ये व्यायाम करतानाच तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू:कन्नड शहरातील घटना, मृत अंकुश रावते बहिरगावचे रहिवासी‎

जिममध्ये दैनंदिन व्यायाम करत असताना बहिरगाव (ता. कन्नड) येथील रहिवासी अंकुश कडुबा रावते (३०) या तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे कन्नड शहर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश रावते हे नेहमीप्रमाणे गुरुवारी (२७ ऑगस्ट) सकाळी आपल्या पुतणीला शाळेत सोडल्यानंतर कन्नड शहरातील एका खाजगी जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेले होते….

Read More

पैठण तालुक्यात 46 हजार नागरिकांची तहान टँकरवर‎:14 गावांना 25 खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी; आडूळ तांडा येथे टंचाईची स्थिती बिकट‎

ऑगस्ट महिना संपत आला तरी पावसाने तब्बल एक महिन्यापासून ओढ दिल्याने पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्यासारखी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाळ्यातही तालुक्यातील १४ गावे आणि वाड्या-वस्त्यांमधील तब्बल ४६ हजार ८४२ नागरिकांची तहान टँकरच्या पाण् . विशेष म्हणजे, केवळ पैठणच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर आणि गंगापूर तालुक्यातूनही नवीन टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव आले आहेत. त्यामुळे…

Read More

तुपकर यांना दिली नोटीस:शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मुंबईत "वर्षा’ बंगल्याचा प्रतीकात्मक लिलाव, आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, प्रलंबित पीक विमा आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान या मागण्यांवरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या संघटनेने गुरुवारी मुंबईतील विधानभवन परिसरात सरकारविरोधात थेट एल्गार पुकारला. आंदोलकांनी थेट मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याचा प्रतीकात्मक लिलाव पुकारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या अकल्पित आंदोलनामुळे विधानभवन परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे…

Read More