Headlines

आळेफाटा परिसरातून गावरान जांभळाची झाडे झाली गायब:झाडांचा मोहर मोठ्या प्रमाणावर गळून पडला

आळेफाटा | उन्हाळा सुरू झाला की गावोगावी रस्त्यांच्या कडेला आणि शिवारात काळ्याभोर गावरान जांभळांनी लगडलेली झाडे अन् त्याखाली शाळकरी मुलांची होणारी गर्दी… हे सुखावणारं चित्र आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. नागरीकरण, शेतीचा विस्तार आणि रस्ते रुंदीकरणात झालेली बेसुमार वृक्षतोड यांमुळे आळेफाटा परिसरातून जांभळाची जुनी झाडे झपाट्याने नष्ट झाली आहेत. नव्या लागवडीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आता गावरान…

Read More

मोदी जनतेला 'स्लो पॉईजन' देत आहेत:इंधन दरवाढीवर विरोधकांचा घणाघात; देश ठप्प, पण सरकार मेलोडी खाऊन गप्प बसल्याचा आरोप

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे केंद्राने सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे 2.72 व 2.81 रुपयांची वाढ केली. गत 10 दिवसांतील ही चौथी दरवाढ आहे. त्यामुळे महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना जबर झटका बसला आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत पंतप्रधान नरेंद्र मोदी या दरवाढीच्या माध्यमातून जनतेला स्लो पॉईजन देत…

Read More

कोकणवाडीतील गणेश मंदिरातील मूर्तीचे चांदीचे डोळे अन् रोख केले लंपास:खिडकीचे गज तोडून मंदिरात केला प्रवेश अन् रात्रीला केली चोरी

शहरातील बंद घरे फोडून चोरीचे प्रकार वाढलेले असतानाच आता दुसरीकडे चोरट्यांनी चक्क देवाचेच डोळे पळवल्याची घटना समोर आली आहे. कोकणवाडीतील सिद्धिविनायक गणेश मंदिरात चोरट्याने खिडकीचे गज तोडून आत प्रवेश केला. यामध्ये गणपतीचे चांदीचे डोळे, बाळकृष्णाच्या २ पितळी मूर्ती आणि दानपेटीतील चिल्लर असा ऐवज लंपास केला. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मंदिर…

Read More

उद्योगमंत्री उदय सामंत यांची अनाथालयाला भेट:संस्थेचे सामाजिक, शैक्षणिक, संस्कारक्षम कामकाज जाणून घेतले

प्रतिनिधी | टाकळी जिवरग उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निल्लोड फाटा येथील श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रम अनाथालय तथा संत ज्ञानेश्वर विद्यालयाला सदिच्छा भेट दिली. संस्थेचे सामाजिक, शैक्षणिक, संस्कारक्षम कामकाज त्यांनी जाणून घेतले. वारकरी संप्रदायाच्या संस्कारातून अनाथ, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याचे काम संस्था करत आहे. या उपक्रमाबद्दल सामंत यांनी समाधान व्यक्त केले. संस्थापक अध्यक्ष रामेश्वर…

Read More

घाटनांद्र्याचा सुपुत्र भारतीय सैन्यात:नितीन कापसेचा जल्लोषात सत्कार

प्रतिनिधी | घाटनांद्रा गावचा सुपुत्र नितीन दगडूबा कापसे याची इंडियन आर्मीमध्ये क्लर्क या पदासाठी निवड झाली आहे. त्याच्या निवडिमुळे गावात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आह. त्याच्या या यशाबद्दल शुक्रवारी सायंकाळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत नितीन कापसेचे जल्लोषात स्वागत केले. मिरवणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून झाली. नितीन कापसे, वडील…

Read More

अचलपूरमध्ये तीव्र पाणीटंचाई, काही भागांना टँकरने पाणीपुरवठा:चंद्रभागा धरणातून कमी दाबामुळे मेळघाटच्या पायथ्याशी समस्या

अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चंद्रभागा धरणातून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे ही समस्या उद्भवली असून, खबरदारीचा उपाय म्हणून नगरपालिकेतर्फे टंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या चंद्रभागा धरणातून येणाऱ्या पाण्याचा दाब प्रचंड कमी झाला आहे. यामुळे अचलपूर शहरातील अनेक भागांचा नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जलवाहिनीत कमी…

Read More

बाभळीत पाणी समस्या: स्वतंत्र जलकुंभाची मागणी:राकाँ. शहराध्यक्ष अमोल गहरवार यांच्या नेतृत्वात जीवन प्राधिकरणाला निवेदन

दर्यापूर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ८ मधील बाभळी परिसरात अनेक महिन्यांपासून, तर काही भागांमध्ये दोन वर्षांपासून पाणीपुरवठा अनियमित आहे. या गंभीर पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अमोल अशोकसिंह गहरवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (मजीप्रा) उपकार्यकारी अभियंता विजय शेंडे यांना नुकतेच निवेदन सादर करण्यात आले. नागरिकांना उन्हाळ्यात मोठ्या त्रासाला सामोरे जावे…

Read More

एमआयडीसीत भूखंडधारकांना वर्षभरात 40% बांधकाम बंधनकारक:अट न पाळल्यास भूखंड परत घेण्याचा प्रशासनाचा निर्णय

एमआयडीसीमध्ये भूखंड घेणाऱ्या उद्योजकांना आता एका वर्षाच्या आत किमान ४० टक्के बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक असेल. तसे न केल्यास त्यांना भूखंड परत करण्याची तयारी ठेवावी लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय एमआयडीसी प्रशासनाने घेतला आहे. राज्याचे प्रधान सचिव (उद्योग) आणि राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत…

Read More

पसंतीच्या दुचाकी क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जाणार:आज दुपारी 2.30 पर्यंत खिडकी क्र. 25 वर संधी

अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (RTO) दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मालिकेतील पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी इच्छुक वाहनधारकांकडून आज, सोमवार, २५ मे रोजी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. हे अर्ज सकाळी १० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत खिडकी क्रमांक २५ वर जमा करता येतील. अर्ज करताना वाहन मालकाच्या नावाचा अर्ज, पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे विधान परिषद जागेवर स्वाभाविक दावा:सुनील टिंगरे म्हणाले, महायुतीतील मित्रपक्षांनी सहकार्य करावे

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) स्वाभाविक दावा असल्याचे पक्षाचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय वातावरण तापले आहे. टिंगरे यांनी पक्षाच्या शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी शहराचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, विरोधी पक्षनेते निलेश निकम…

Read More