तापमान वाढीने राज्यात 900 मे.वॅ. वीज तुटवडा:वीजचोरी व थकबाकी असणाऱ्या भागांतच भारनियमन
राज्यात वाढलेल्या तापमानामुळे कूलर आणि एसीचा वापर वाढला असून विजेच्या मागणीने ३१ हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला आहे. महानिर्मिती, खासगी वीज कंपन्या आणि केंद्रीय वीज केंद्रांकडून वीज खरेदी करूनही ऐन सर्वाधिक मागणीच्या काळात (सायंकाळी) ९०० ते १ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, महावितरणला गेल्या तीन दिवसांपासून (१६ ते १८ एप्रिल) सायंकाळी ७ ते…