Headlines

वेरूळ येथे शिक्षकाच्या संशयास्पद मृत्यूनंतर गावात तणाव:दुपारी 3 पासून रास्ता रोको, अंबादास दानवेंच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळच्या कौशिकी गल्ली येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर वेरूळ गावात बुधवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुपारी 3 वाजल्यापासून संतप्त गावकऱ्यांनी भोसले चौक ते घृष्णेश्वर मंदिर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने परिसरात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मृत सुरेश बोरसे यांच्या पत्नी अनिता बोरसे यांनी खुलताबाद पोलिस…

Read More

पुणे-मुंबई महामार्गावर मोठी कारवाई:1.35 कोटींचा बनावट मद्यसाठा जप्त, कंटेनर चालकाला अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे-मुंबई महामार्गावर मोठी कारवाई केली आहे. हवेली तालुक्यातील सुतारवाडी पाषाण येथे एका कंटेनरमधून १ कोटी ३५ लाख ९९ हजार रुपये किमतीचा बनावट मद्यसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईत मद्यासह वाहन आणि इतर साहित्यही ताब्यात घेण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मद्याची किंमत अंदाजे…

Read More

छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक प्रकार:पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण, VIDEO

छत्रपती संभाजीनगरमधील भारत करिअर अकॅडमीमध्ये पोलिस भरतीची पूर्वतयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अकॅडमीचे पी.टी. प्रशिक्षक आणि व्यवस्थापक विवेक डाकणे याने क्षुल्लक कारणावरून या विद्यार्थ्याला बेल्ट आणि काठीने अमानुषपणे मारहाण केली. या घटनेत विद्यार्थ्याचा केवळ शारीरिकच नव्हे, तर रॅगिंगसारखा प्रकार करत मोठा मानसिक छळही करण्यात आला…

Read More

आरपीआय ख्रिश्‍चन आघाडीची स्थापना:समाजाला पक्षाची ताकद मिळावी; बाळासाहेब जानराव यांची माहिती

रिपब्लिकन पक्षाची (आरपीआय) विचारधारा आणि सामाजिक न्यायाची चळवळ ख्रिश्‍चन समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, यासाठी आरपीआयने ख्रिश्‍चन आघाडीची स्थापना केली आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे हा या आघाडीचा मुख्य उद्देश असून, आरपीआयचे नेते बाळासाहेब जानराव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला आरपीआयचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, सरचिटणीस महिपाल वाघमारे,…

Read More

ठाण्यात वृद्धाला परप्रांतीयाकडून मारहाणीचे प्रकरण:राज ठाकरेंसह श्रीकांत शिंदेंनीही फोनवरून साधला संवाद, प्रकृतीची केली विचारपूस

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. किरकोळ कारणावरून एका परप्रांतीय ओला चालकाने ज्येष्ठ नागरिकाला भररस्त्यात बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकरणाने पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या दादागिरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज ठाकरे यांनी वृद्धाशी साधला संवाद या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

Read More

विटभट्टी, मातीच्या व्यवसायासाठी आता रॉयल्टी नाही:वर्षाला 700 ब्रास माती मोफत, 'महाखनिज' पोर्टलवर करा अर्ज

नागपूर प्रतिनिधी: पारंपरिक मातीकाम आणि विटभट्टी व्यवसाय करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता या व्यवसायांसाठी माती काढण्यावर कोणतीही रॉयल्टी लागणार नाही. वर्षाला 700 ब्रासपर्यंत माती मोफत काढण्याची परवानगी देण्यात आली असून, सर्व परवानग्या ‘एक खिडकी’ योजनेद्वारे दिल्या जातील. यासाठी आता सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याची गरज नाही. ‘महाखनिज’ या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करावा लागेल. अर्ज…

Read More

Youth Fired For Obscene Remark On Biryani

मुंबई6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक विनोदवीर (Comedian) प्रणीत मोरे याच्या स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये ३७० रुपयांच्या चिकन बिर्याणीवरून महिलांबद्दल अश्लील आणि अक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तरुणाला मोठा फटका बसला आहे. सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर, या तरुणाला त्याच्या कंपनीने नोकरीवरून काढून टाकले (Fired) आहे. सोशल मीडियावरील ‘हक्क गाजवण्याची’ (Entitlement) आणि व्यावहारिक मानसिकतेची ही चर्चा आता केवळ एका…

Read More

Sons Plow Field After Selling Bulls

महाराष्ट्रात एकीकडे आधुनिक शेती, ड्रोन, स्मार्ट अॅग्रीकल्चर आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील वास्तव मात्र अंगावर काटा आणणारं आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून . आर्थिक संकटामुळे उरला नाही पर्याय पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द गावातील अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर रतन शहाणे हे आर्थिक संकटाशी झुंज देत आहेत….

Read More

सुनेत्रा पवारांच्या विमानात तांत्रिक बिघाड:सुप्रिया सुळेंकडून चिंता व्यक्त, म्हणाल्या – असे झाले असेल तर हा चिंताजनक विषय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिजीत दिपके यांच्यातील कथित भेट तसेच सुनेत्रा पवार यांच्या विमान प्रवासादरम्यान झालेला तांत्रिक बिघाड, या दोन्ही चर्चिलेल्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. “सुनेत्रा वहिनींनी प्रवास केलेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती जर खरी असेल, तर मला नक्कीच वहिनींची, पार्थची आणि तटकरेंची काळजी वाटते,”…

Read More

..तर मग राऊत 'चोरलेल्या' निवडणुकीचे भागीदार का?:काँग्रेस मजबूत करण्यासाठी 'उबाठा'चे विलीनीकरण करणार का?- नवनाथ बन

संजय राऊत यांना काही गोष्टी लक्षात राहत नाहीत. 2019 ची लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांनी कोणासोबत लढल्या? राऊतांनी कोणासोबत प्रचार केला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तोंड फाटेपर्यंत राऊतांनी कौतुक केले होते. उद्धव ठाकरे 2019 ला भाजपसोबतच होते मग चोरलेल्या निवडणुकीचे तुम्ही भागीदार आहात का? असा खोचक सवाल भाजपच्या नवनाथ बन यांनी…

Read More