Headlines

विधानपरिषद निवडणूक 2026:अनेक ठिकाणी बंड शमवण्यात महायुतीला यश; मतदानापूर्वीच एकनाथ शिंदेंना मोठे यश, ठाण्यातील निवडणूक बिनविरोध

विधानपरिषद निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर, रायगड, पुणे आणि परभणीतील बंडखोरी शमविण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले. अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी चक्रे फिरवत अनेकांचे बंड थंड केले. तर दुसरीकडे शिंदेंच्या सेनेने ठाण्यातील निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे मतदानापूर्वीच एकनाथ शिंदेंच्या सनेने गुलाल उधाळला आहे. या संदर्भातील लाईव्ह अपडेट्स…

Read More

लाखांदूर तालुक्यात मेणबत्तीच्या उजेडात रुग्णांवर उपचार:रुग्णांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ प्रशासनाच्या अनास्थेचे धिंडवडे काढणारा!

डिजिटल इंडिया आणि प्रगत आरोग्य सेवेचे मोठमोठे दावे केले जात असताना, लाखांदूर तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील पिंपळगाव/को. येथील आरोग्य उपकेंद्रात गेल्या तब्बल चार महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना मेणबत्ती किंवा मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात रुग्णांवर उपचार करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. ग्रामीण भागातील गरीब रुग्णांच्या आरोग्याशी चाललेला…

Read More

दिलीप वळसे-पाटील थेट शरद पवारांच्या भेटीला:'सिल्व्हर ओक'वरुन नवे राजकीय संकेत? राष्ट्रवादीत नेमकं शिजतंय तरी काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांभोवती चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे…

Read More

सन्मान मिळवण्यासाठी लोकाभिमुख कार्य महत्त्वाचे:तहसीलदार रतनव यांचे प्रतिपादन, उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्यासह तिघांना निरोप‎

“प्रशासकीय खुर्चीत काम करताना जनताभिमुख निर्णय घेतल्यास त्याचे समाधान वेगळे असते. कर्तव्य बजावताना पदापेक्षा सेवेने आनंद मिळायला हवा. अशा सन्मानाची सेवापूर्ती खूप कमी लोकांच्या आयुष्यात येते आणि हा सन्मान मिळवण्यासाठी लोकाभिमुख कार्य पार पाडणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कर्जतचे तहसीलदार रवी सतवन यांनी केले. कर्जत पोलीस विभागातर्फे आयोजित सेवापूर्ती सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कर्जतचे…

Read More

जोर्वेत 411 नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा:प्रवराकाठच्या जोर्वे संस्कृतीचा जागतिक पातळीवर मोठा गौरव- माजी मंत्री थोरात‎

एक जून हा अनेकांचा अधिकृत वाढदिवस असतो; परंतु संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक जोर्वे गावाने एकत्र येत तब्बल ४११ महिला व नागरिकांचा फेटे बांधून, पारंपारिक पद्धतीने सामूहिक वाढदिवस साजरा करण्याचा एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. “हा उपक्रम आपली समृद्ध परंपरा जपणारा असून जोर्वे संस्कृतीचा जागतिक पातळीवर मोठा गौरव आहे,” असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी…

Read More

देशात एकच पक्ष रहावा हा भाजपचा विचार:एकपक्षीय राजकारणाची ही मुहूर्तमेढ, तुम्ही संविधान अन् राष्ट्रप्रेमी नाही हेच यातून सिद्ध होतंय- संजय राऊत

देशात एकच पक्ष रहावा हा भाजपचा विचार आहे, त्या अनुषंगाने ते काम करत आहेत. एकपक्षीय राजकारणाची ही मुहूर्तमेढ आहे, या देशात फक्त आमचाच पक्ष राहील, आमचाच पक्ष राज्य करेल. इतर कोणताच प्रादेशिक पक्ष राहणार नाही, या दृष्टीने शिवसेना फोडली, त्यासाठी यंत्रणेचा वापर केला, पासवान यांचा पक्ष तसाच फोडला, शरद पवारांचा पक्ष फोडला, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा…

Read More

कुर्डुवाडीत अधिक मास, भागवत कथेला प्रतिसाद:नृसिंह अवताराच्या दर्शनाने भाविक मंत्रमुग्ध‎

येथील हिंदू देवालय संस्थेच्या वतीने श्री राम मंदिर रेल्वे कॉलनी येथे अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. पंढरपूर येथील ख्यातनाम कथाकार विनया संकेत कुलकर्णी (उत्पात) यांच्या ओजस्वी आणि अभ्यासपूर्ण वाणीतून या कथेचे रसपान कुर्डुवाडीकरांना घडत आहे. कथेच्या दुसऱ्या दिवशी विविध धार्मिक प्रसंगांचे सुंदर वर्णन करत प्रत्यक्ष नृसिंह…

Read More

संख्याबळ नसताना काँग्रेस पराभवासाठी का लढतेय?:राहुल गांधी सोन्याचा चमचा घेऊन मोठे झाले, त्यांना आर्थिक टंचाई काय कळणार? चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला

राहुल गांधी हे सोन्याचा चमच्याने बदमाचा ज्यूस पीत मोठे झाले आहेत. त्यांना आर्थिक टंचाई काय हे माहिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणाचा विचार केला आहे. देशाची स्थिती भक्कम राहील यासाठी त्यांना मेहनत घेतली आहे, त्यामुळे राहुल गांधींनी यावर बोलणं हास्यास्पद आहे, असे भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,…

Read More

शिवकालीन युद्धकला, सांकेतिक भाषेचे कंवर नगरात तरुणांना धडे:शंभू शौर्य मर्दानी आखाड्याद्वारे आयोजित मर्दानी खेळ शिबिराचा उत्साहात समारोप‎

शंभू शौर्य मर्दानी आखाड्याद्वारे १५ मे ते ३१ मे या कालावधीत आयोजित मर्दानी खेळ व स्व-संरक्षण शिबिराचा समारोप ३१ मे रोजी स्थानिक मनपा शाळा क्र. १६, अंबिका नगर मैदान, कंवर नगर, येथे उत्साहात झाला. . या शिबिराच्या समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आ. प्रताप अडसड उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी…

Read More

कच्चे बांधकामाची परवानगी; कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करा- आ.पठाण:तार फैलमधील अतिक्रमणप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक‎

रेल्वे प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे बेघर झालेल्या तार फैल आणि गडंकी परिसरातील २१५ कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या मुद्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीत आमदार साजीद खान पठाणे, जिल्हाधिकारी वर्षा मिना यांच्याह अन्य अधिकारी प्रामुख्याने होते. बेघर झालेल्या कुटुंबांना कच्चे बांधकाम उभारण्याची परवानगी देण्यात यावी, त्या कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे, अशी सूचना आ. पठाण यांनी केली. यावर…

Read More