Headlines

पुणे ग्रामीण पोलिसांकडून 2.39 कोटींचा गांजा जप्त:आंतरराज्यीय तस्कर अटकेत, 634 किलो गांजा हस्तगत

पुणे ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 कोटी 39 लाख रुपये किमतीचा 634 किलो गांजा जप्त केला असून, एकूण 3 कोटी 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात…

Read More

कारभार गतिमान करा; नागरी क्षेत्रांत सिटी सर्वे लागू करा:राज्याचे जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांचे निर्देश; प्रलंबित मोजणी प्रकरणांचा घेतला आढावा‎

जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाच्या कामात पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. राज्याचे जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांनी अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यादरम्यान भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. “जिल्ह्यातील सर्व नागरिक क् . जिल्ह्यातील वाढत्या मोजणी प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि प्रशासकीय नियोजनाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आयुक्त नवाल यांनी पारनेर आणि अहिल्यानगर येथील…

Read More

सोलापूर अतिक्रमण हटाव मोहिम:तिसऱ्या दिवशी एका इमारतमधील एकच अनधिकृत गाळा पाडला, नव्याने 120 इमारतींची यादी तयार;आयुक्तांची मंजुरी मिळताच पाडकाम

शहरातील 35 इमारतींमधील अनधिकृत बांधकामाच्या पाडकाम मोहिमेला 26 मेपर्यंत ब्रेक लागला आहे. त्यानंतर कुठल्या इमारतीवर हातोडा पडेल हे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत महापालिकेकडून नव्याने 120 इमारतींमधील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्याचे काम होती घेण्यात आले. पुढील दोन दिवसांत यादी तयार करून आयुक्तांना मेलवर पाठवण्यात येईल. मंजुरी येताच सर्वांना नोटीस बजावून पाडकाम करण्याची मोठी मोहीम हाती…

Read More

आंदोलनाचा धसका:नियमित वीज पुरवठा करण्याचे आश्वासन, आमदार जानकरांची पदयात्रा अखेर स्थगित

गेली २ महिन्यांपासून माळशिरस तालुक्यात सुरू असलेला अनियमित आणि कमी दाबाचा वीजपुरवठा, तसेच ग्रामीण भागात रात्री ६ ते १० या वेळेत होणाऱ्या भारनियमनाच्या त्रासाविरोधात आमदार उत्तमराव जानकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. वेळापूर ते माळशिरस अशी २० किलोमीटर लांबीची भर उन्हातील पायी पदयात्रा गुरुवार दि. २१ मे रोजी काढण्यात येणार होती. मात्र, आंदोलनाची तीव्रता पाहून…

Read More

वैदिक वेलनेस संकल्पनेवर चर्चा; 104 योगपटूंचा लक्षणीय सहभाग:योग-निसर्गोपचार शिबिराच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त कार्यक्रम‎

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन (डीसीपीई), अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलदरा येथे आयोजित योग-निसर्गोपचार उन्हाळी शिबिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय परिषद व खुल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. सर्वांचे प्रेरणास्थान, प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या आशीर्वादाने ११ ते २१ मे या कालावधीत सुरू असलेल्या विशेष शिबिराअंतर्गत १५ व…

Read More

हिंगोली-कळमनुरी मार्गावर भीषण अपघात:उभ्या ट्रेलरला कारची पाठीमागून धडक; दोघांचा जागीच मृत्यू

हिंगोली ते कळमनुरी मार्गावर खानापूरचित्ता गावाजवळ भरधाव कार उभ्या ट्रेलरवर धडकल्याने झालेल्या अपघातात कारमधील दोघे जण ठार झाल्याची घटना गुरुवारी ता. 21 मध्यरात्री्च्या सुमारास घडली आहे. हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथील साईनगर भागातील रहिवासी असलेले सुरज संजय साळवे…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:पातोंड्यात महिन्यापासून नळ कोरडे; शेवाळयुक्त पाणी पिण्याचा धोका

अकोट तालुक्यातील पातोंडा गावात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. ग्रामस्थांना आता जीव धोक्यात घालून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. सुमारे ६०० लोकवस्ती असलेल्या या गावात गेल्या अनेक दिवसांपासून नळ कोरडे पडले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गावकऱ्यांचा संताप टोकाला पोहोचला आहे. खारपान पट्ट्यातील पातोंडा गावात आधीच क्षारयुक्त पाण्याचा गंभीर प्रश्न आहे….

Read More

ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या मशागत खर्चामध्ये मोठी वाढ; डिझेल दरवाढीचा फटका:नांगरणीसाठी 800 रु., वखरणीसाठी 700 रु. प्रतितास खर्च‎

परिसरात खरीप हंगामाची चाहूल लागताच शेतीच्या मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. परंतु, डिझेल दरवाढ, सुट्या भागांचे दर तसेच मजुरीतील वाढ यामुळे ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या तयारीचा खर्च ग्रामीण भागात प्रचंड वाढलेला दिसत आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्य शेतकरी नांगरणी, वखरणी, रोटाव्हेटर आणि इतर मशागत कामांसाठी ट्रॅक्टरवर…

Read More

वाळू माफियांनी विष्णुपद बंधाऱ्याचे दरवाजे काढून थेट पाणी सोडले:महर्षी वाल्मीक संघाने आंदोलनाचा दिला इशारा‎

पंढरपूरमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफिया मुजोर झाले असून, त्यांनी चक्क चंद्रभागा नदीचे पाणी वाहून जावे आणि उघड्या पडलेल्या पात्रातून वाळू चोरी करता यावी यासाठी विष्णुपद बंधाऱ्याचे दरवाजे काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी विष्णुपद बंधाऱ्याचे दरवाजे काढून टाकल्या प्रकरणी वाळू माफियांवर कारवाई करावी, अन्यथा…

Read More

दत्तात्रयांच्या जयघोषाने देवगडनगरी दुमदुमली:जगात कसे जगावे हे भगवद्गीता, तर कसे मरावे हे भागवत शिकवते, भास्करगिरीजी महाराज यांचे प्रतिपादन‎

भागवत कथा ही पूर्वपुण्याईशिवाय ऐकायला मिळत नाही. जगात कसे जगावे हे आपल्याला ‘भगवद्गीता’ शिकवते, तर कसे मरावे हे ‘भागवत’ शिकवते. या कथेमुळे जन्म-मरणाचे साकडे सुटते. त्यामुळे सर्व भाविकांनी या पर्वकाळात कथेचे श्रवण करून आंतरिक आनंद मिळवावा, असे श्रीक्षेत्र देवगड दत्त पीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले. त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासाच्या पवित्र…

Read More