दत्तात्रयांच्या जयघोषाने देवगडनगरी दुमदुमली:जगात कसे जगावे हे भगवद्गीता, तर कसे मरावे हे भागवत शिकवते, भास्करगिरीजी महाराज यांचे प्रतिपादन
भागवत कथा ही पूर्वपुण्याईशिवाय ऐकायला मिळत नाही. जगात कसे जगावे हे आपल्याला ‘भगवद्गीता’ शिकवते, तर कसे मरावे हे ‘भागवत’ शिकवते. या कथेमुळे जन्म-मरणाचे साकडे सुटते. त्यामुळे सर्व भाविकांनी या पर्वकाळात कथेचे श्रवण करून आंतरिक आनंद मिळवावा, असे श्रीक्षेत्र देवगड दत्त पीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले. त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासाच्या पवित्र…