Headlines

दत्तात्रयांच्या जयघोषाने देवगडनगरी दुमदुमली:जगात कसे जगावे हे भगवद्गीता, तर कसे मरावे हे भागवत शिकवते, भास्करगिरीजी महाराज यांचे प्रतिपादन‎

भागवत कथा ही पूर्वपुण्याईशिवाय ऐकायला मिळत नाही. जगात कसे जगावे हे आपल्याला ‘भगवद्गीता’ शिकवते, तर कसे मरावे हे ‘भागवत’ शिकवते. या कथेमुळे जन्म-मरणाचे साकडे सुटते. त्यामुळे सर्व भाविकांनी या पर्वकाळात कथेचे श्रवण करून आंतरिक आनंद मिळवावा, असे श्रीक्षेत्र देवगड दत्त पीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले. त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासाच्या पवित्र…

Read More

‘सिबिल’ची अट न लावता शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप:‘एल निनो’च्या संकटात बळीराजाला सरकारचा दिलासा

यंदा महाराष्ट्रातील १५२ लाख हेक्टर खरीप हंगामावर ‘एल निनो’चे मोठे संकट घोंगावत आहे. हवामान खात्याने यंदा सरासरीच्या अवघा ८८% पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज असताना, पीक कर्ज देण्यात बँकांकडून होणाऱ्या दिरंगाईवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यस्तरीय बँकिंग समितीच्या (एसएलबीसी) बैठकीत तीव्र…

Read More

पूर्ण बहुमत मिळविण्यासाठी शिवसैनिकांनी तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचावे:खासदार शिंदे यांच्या नांदगाव, येवला येथील पदाधिकाऱ्यांना सूचना‎

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांत शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळवून देण्यासाठी प्रत्येक बूथनिहाय कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभे करावे, पक्षाचा विस्तार करण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावात मतदार संपर्क अभियान राबवा. अशा सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसंवाद दौऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांना केल्या. शिवसंवाद दौऱ्यात खासदार शिंदे यांनी नांदगाव व येवला विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले…

Read More

अजिंठा-बुलढाणा राज्य मार्गावरील शिवना येथील वाहतूक कोंडी सुटेना:बाजारपेठेत वारंवार खोळंबा; शेगाव, नागपूरकडे जाणारे पर्यटक हैराण‎

अजिंठा लेणी आणि लोणार सरोवराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग म्हणून अजिंठा-बुलढाणा राज्य मार्गाकडे पाहिले जाते. मात्र, सद्यस्थितीत हा मार्ग शिवना गाव परिसरात वाहतूक कोंडीचा मुख्य केंद्र बनले आहे. बसस्थानक आणि मुख्य बाजारपेठ परिसरात वाहनधारक अस्ताव्यस्त पार्किंग करीत असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी, दररोज या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, बुधवारी बाजाराच्या दिवशी…

Read More

सिल्लोड शहरामध्ये 2 दुकानांना आग; 7 लाख रुपयांचे नुकसान:कारण अस्पष्ट, दोन्ही दुकानदारांचे 6 लाखांचे नुकसान‎

सिल्लोड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील दोन वेगवेगळ्या दुकानांना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या दोन्ही घटनांमध्ये ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पहिली घटना अण्णा भाऊ साठे चौकात रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. येथील सत्यम चौबे यांच्या मालकीच्या श्री मेडिकल दुकानाला अचानक आग लागली. या आगीत…

Read More

ज्येष्ठ समाजसेवक जनार्दनपंत बोथे यांना पद्मश्री पुरस्कार:राष्ट्रपतींच्या हस्ते ‌नवी दिल्लीत सोमवारी सन्मान

श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ जनार्दनपंत बापूराव बोथे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला असून सोमवार, २५ मे रोजी नवी दिल्लीत एका विशेष सन्मान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान शिक्षण संस्थेची स्थापना : १९७२ मध्ये ‘राष्ट्रसंत श्री…

Read More

दिव्य मराठी एक्स्पोज:प्रा. लोंढेंच्या मारेकऱ्यांना संरक्षण देणाऱ्या पीआय ताटेंच्या निलंबनाची शिफारस, डीसीपींचा चौकशी अहवाल ‘दिव्य मराठी’च्या हाती

सेवानिवृत्त प्रा. राजाभाऊ लोंढे यांचा फेब्रुवारीमध्ये दृश्यम स्टाइलने खून झाला होता. यातील आरोपींना पाठीशी घालत उस्मानपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे, हे आरोपी असल्याचे माहिती होऊनही गुन्हा दाखल केला नाही. आरोपी विशाल राठोड व त्याचे साथीदार ६ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत तब्बल ३६ दिवस पोलिस ठाण्यात येऊन…

Read More

अमरावतीत राजीव गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन:राजीव गांधींनी देशात संगणक, दूरसंचार क्रांती घडवली – काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देशमुख

माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अमरावती येथे ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी राजीव गांधी हे देशातील तंत्रज्ञान क्रांतीचे खरे जनक असल्याचे प्रतिपादन केले. देशमुख म्हणाले की, राजीव गांधींनी देशात संगणक, दूरसंचार आणि टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने तंत्रज्ञान…

Read More

शेषराव खाडे यांच्या 'कृत्रिम प्रज्ञा' कादंबरीचे प्रकाशन:मान्यवरांकडून सकारात्मकता आणि मानवतेचे उत्कृष्ट प्रदर्शन म्हणून कौतुक

अमरावती येथे प्रसिद्ध लेखक शेषराव खाडे यांच्या ‘कृत्रिम प्रज्ञा’ या कादंबरीचे प्रकाशन झाले. या सोहळ्यात मान्यवर वक्त्यांनी कादंबरीचे कौतुक केले. ही कादंबरी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) सकारात्मक आणि नकारात्मक पैलूंवर प्रकाश टाकते, तसेच सकारात्मकता व मानवतेचे उत्कृष्ट प्रदर्शन करते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. हा प्रकाशन सोहळा येथील मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात पार पडला. या…

Read More

पुण्याचा भिडेवाडा चित्ररथ अमरावतीत दाखल:खासदार वानखडेंसह अनेकांनी जाणून घेतले फुले दाम्पत्याचे कार्य

अमरावती येथे महात्मा जोतीराव फुले यांनी पुण्यात सुरू केलेली मुलींची पहिली शाळा ‘भिडेवाडा’ चित्ररथाच्या माध्यमातून पोहोचली आहे. हा चित्ररथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इर्विन चौकातील पुतळ्याजवळ थांबला आहे. गुरुवारी खासदार बळवंतराव वानखडे यांच्यासह अनेक नागरिकांनी या चित्ररथाला भेट देऊन फुले दाम्पत्याच्या कार्याची माहिती घेतली. महात्मा फुले यांच्या २०२६ मधील द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने हा उपक्रम…

Read More