Headlines

पक्षप्रवेशापूर्वी ‘तळ्यातमळ्यात’ भूमिकेमुळे अडचण:मंत्रिमंडळ विस्तारात ओमराजे वेटिंगवर, बारणे-शिंदे आघाडीवर!

राजकारणात योग्य वेळी घेतलेला निर्णय जितका महत्त्वाचा असतो, तितकाच मोठा फटका संभ्रमावस्थेमुळे बसू शकतो. ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदे गटात दाखल झालेल्या ६ खासदारांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला. मात्र, या सत्तानाट्यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची बंडखोरीच्या वेळची ‘तळ्यातमळ्यात’ भूमिका आता त्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला ३ मंत्रिपदे…

Read More

पूल दुरुस्तीसाठी मराठवाड्यास हवेत 2,051 कोटी रुपये:केंद्राकडून निधी मिळताच क्षेत्रनिहाय वाटप- ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान सोसावे लागलेल्या मराठवाडा विभागातील पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाने मोठी पावले उचलली आहेत. विभागातील जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील खराब झालेले रस्ते आणि खचलेल्या पुलांच्या दुरुस्तीसाठी तब्बल २,०५१.६४ कोटी रुपयांचा विस्तृत प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. विधान परिषदेत आमदार सतीश चव्हाण आणि विक्रम काळे…

Read More

पाण्याच्या टाकीत 5 दिवस मृत बैल सडत होता,:तेच पाणी 51 गावांना पुरवले- खडसे, मुक्ताईनगरच्या सारोळ्यातील प्रकार विधान परिषदेत

मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा प्रादेशिक जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यंत धक्कादायक प्रकार विधान परिषदेत चर्चेस आला. या केंद्राच्या पाण्याच्या टाकीत पडून एका बैलाचा मृत्यू झाला. मात्र, ५ दिवस हा मृत बैल टाकीतच सडत होता आणि याच टाकीतील पाणी मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील ५१ गावांतील हजारो नागरिकांना पिण्यासाठी पुरवले गेले. या गंभीर हलगर्जीपणावरून एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत सरकारला…

Read More

Ketan Agrawals Grandfather Devichand Agrawal Passes Away

लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्यात आलेले प्रसिद्ध तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. केतनचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे शनिवारी संध्याकाळी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. . मिळालेल्या माहितीनुसार, देवीचंद अग्रवाल यांना कर्करोगाचे निदान झाले होते. नातवाच्या अचानक झालेल्या क्रूर हत्येमुळे अग्रवाल कुटुंब आधीच मानसिकदृष्ट्या खचले होते….

Read More

पुण्यात आरएसएसच्या संघ शिक्षा वर्गाचा समारोप:हिंदू संघटन संहारक नाही, तर संरक्षक; भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी पुण्यात प्रतिपादन केले की, हिंदूंचे संघटन कोणाच्याही विरोधात नाही, तर ते शांतता, सत्य आणि न्यायाच्या मार्गाने चालणारा समाज घडवण्यासाठी आहे. जगाच्या कल्याणासाठी उभी राहिलेली ही संघटित शक्ती संहारक नसून, नेहमीच संरक्षक भूमिका बजावणारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित ‘संघ शिक्षा वर्गाचा’…

Read More

अकरावी प्रवेशाची चौथी विशेष फेरी सुरू:प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना 6 जुलैपर्यंत मुदत

अकरावी प्रवेशाची चौथी म्हणजेच विशेष फेरी सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या तीन नियमित फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळाला नाही किंवा ज्यांचे प्रवेश काही कारणास्तव निश्चित झाले नव्हते, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही फेरी खुली आहे. या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या विशेष फेरीची गुणवत्ता यादी आणि महाविद्यालय वाटप (कॉलेज अलॉटमेंट)…

Read More

पुण्यात पाच वर्षांत हजारो उच्च कौशल्याधारित रोजगार:जपानी कंपनीच्या गुंतवणुकीला महापौरांकडून सहकार्याचे आश्वासन

भारत आणि जपान यांच्यातील आर्थिक तसेच तंत्रज्ञान सहकार्यातून पुण्यात उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या संदर्भात टोकियो येथील आय. एम. कॉर्पोरेशनचे अध्यक्ष रेन्या किकुची आणि वरिष्ठ सल्लागार ताकाशी इतामिया यांनी पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांची सदिच्छा भेट घेतली. टोकियो स्थित फिडेलसॉफ्टचे संस्थापक अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांच्या पुढाकाराने ही भेट झाली. यावेळी जपानी…

Read More

सियाने मित्राला सांगितले होते – लग्न जे होणार नाही:स्नॅप चॅट समोर आले; केतनच्या हत्येच्या 24 दिवसांपूर्वी बोलणे झाले होते

पुणे येथील केतन अग्रवाल खून प्रकरणात आरोपी मंगेतर सियाची स्नॅपचॅटवर एका मैत्रिणीसोबतची चॅटिंग व्हायरल होत आहे, ज्यात लिहिले आहे- हे लग्न होणार नाही. या ओळीमुळे केतन खून प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. दरम्यान, पोलिस या चॅटची चौकशी करत आहेत. २५ मे रोजीच्या चॅटमध्ये सिया आपल्या एका मित्राकडे लग्नाच्या बुकिंगसाठी आधार कार्ड मागते. पण यानंतर…

Read More

सब्र का फल मिठा होता है:ज्या पदासाठी थांबलो ते 8-10 दिवसांत मिळणार, रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत भरत गोगावलेंचे सूचक विधान

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय तिढ्यावर आता लवकरच पडदा पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना शिंदे सेनेचे आमदार भरत गोगावले यांनी “ज्या पदासाठी आम्ही थांबलो होतो, ते येत्या आठ ते दहा दिवसांत मिळणार आहे,” असे सूचक वक्तव्य करत रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठा दावा केला आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाची घोषणा आता अंतिम टप्प्यात असल्याची…

Read More

Shashikant Shinde Denies NCP Merger Rumours; Party Unity Strong

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देत, “काँग्रेसमध्ये जाण्याचा किंवा पक्षाचे विलीनीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले. गेल्या काही दिवस . पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती, विरोधकांची भूमिका, राम मंदिरातील कथित गैरव्यवहार, मुंबईतील पावसाची परिस्थिती, कायदा-सुव्यवस्था आणि…

Read More