RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या:मंडळ अधिकाऱ्याच्या डोळ्यांदेखत घडला थरार, विरारमधील घटनेने खळबळ
पालघर जिल्ह्यातील विरार पूर्व येथील शिरगाव परिसरात एका खदानीत आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, हे भीषण हत्याकांड मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या डोळ्यांदेखत घडले असून, हल्लेखोरांनी त्यांनाही जखमी करत त्यांच्या शासकीय वाहनाची मोठी तोडफोड केली आहे. याप्रकरणी खदान मालक महेश भोईर याचे…