Headlines

नागपूर पोलिसांना ड्रग टेस्टिंग किट्स, ब्रेथ ॲनालायझर्स प्रदान:समृद्धी महामार्गावर सुरक्षित ड्रायव्हिंगला मिळणार बळकटी

समृद्धी महामार्गावर रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. सेव्ह लाईफ फाऊंडेशन आणि मर्सिडीज बेंझ इंडिया यांच्या सहकार्याने नागपूर शहर पोलिसांना अत्याधुनिक ड्रग टेस्टिंग किट्स आणि ब्रेथ ॲनालायझर्स प्रदान करण्यात आले आहेत. नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल आणि सेव्ह लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक व सीईओ पियुष तिवारी यांच्या उपस्थितीत ही उपकरणे औपचारिकरित्या सुपूर्द…

Read More

वेरूळ लेणीत मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला:50 ते 100 जण किरकोळ जखमी, पर्यटकांना बाहेर काढताना मोठी तारांबळ; दोन तास लेणी बंद

जागतिक वारसा स्थळ असलेल्या व जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात दिनांक 3 मे रोजी रविवारी सकाळी मधमाशांनी पर्यटकांवर अचानक हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेत 50 ते 100 पर्यटकांना किरकोळ डंख लागले असून सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. रविवार असल्याने वेरूळ लेणी पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. सकाळी 10 ते 11 च्या सुमारास लेणी…

Read More

नवले पुलावरील आंदोलनात पोलिसांचा बळाचा वापर:आयुक्तांचा मात्र लाठीमाराचा इन्कार, चिमुकलीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार

नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी शनिवारी रात्री पुण्याच्या नवले पुलावर जनआक्रोशाचा उद्रेक झाला. संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी पीडितेचा मृतदेह रस्त्यावर ठेवून महामार्ग रोखून धरल्याने सुमारे चार तास वाहतूक ठप्प होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवले आणि रस्ता मोकळा केला. मात्र, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशाप्रकारचा कोणताही…

Read More

Jarange Patils Strong Statement; Let What Happens Happen

बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे घडलेल्या तणावपूर्ण घटनेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंनी ठाम भूमिका घेत, जे . नेकनूर येथे हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमादरम्यान किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. एका वाहनाचा धक्का लागल्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद काही…

Read More

जिल्ह्याच्या कृषी, औद्योगिक क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज:सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे महाराष्ट्रदिनी प्रतिपादन, मान्यवरांचा गाैरव‎

प्रतिनिधी | अमरावती ‘शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी, यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि उद्योग क्षेत्राचा विकास करून जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याने या दोन्ही क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर भर द्यावा ,’ असे प्रतिपादन सहकार मंत्री…

Read More

अर्जुननगरमध्ये डिपी पेटल्यामुळे नागरिकांनी रात्र काढली अंधारात:शहरातील पूर्वा टाऊनशिप, पटवारी कॉलनीतील वीजपुरवठा ११ तास ठप्प‎

प्रतिनिधी । अमरावती शहरातील अर्जुननगर परिसरात महावितरणच्या निष्काळजीपणाचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. पुर्वा टाऊनशिप आणि पटवारी कॉलनीला वीजपुरवठा करणारी डिपी शुक्रवारी १ मे रोजी मध्यरात्री सुमारास अक्षरशः पेटल्याने परिसरात खळबळ उडाली. या भीषण घटनेत चार मुख्य केबल जळून खाक झाले असून, शेकडो नागरिकांना असह्य उकाड्यात रात्र काढावी लागली. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता म्हणजेच…

Read More

स्व. सोमेश्वर पुसतकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आझाद हिंद मंडळातर्फे रक्तदान शिबिर:शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

प्रतिनिधी । अमरावती स्थानिक आझाद हिंद मंडळ, अमरावतीच्या वतीने मंडळाचे दिवंगत सदस्य, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी दात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्व. सोमेश्वर पुसतकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मंडळाचे कार्याध्यक्ष व मनपातील विरोधी पक्षनेते विलास…

Read More

गृहमंत्रीच नसरापूर प्रकरणात आरोपी असायला हवेत:1500 रुपये देताय म्हणून बहिणींनी तोंड बंद ठेवावे का? संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल

“राज्यात चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार होतो, कारण गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आपली कर्तव्ये पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. या प्रकरणात खरं तर सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले पाहिजे. किंबहुना, या सरकारचेच ‘एन्काउंटर’ केले पाहिजे,” अशा अत्यंत आक्रमक शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर तोफ डागली….

Read More

तीन बंधाऱ्यांची कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत:पालकमंत्री ॲड. फुंडकर

प्रतिनिधी |अकोला जलयुक्त शिवार अभियान २.० द्वारे महाराष्ट्र राज्य टंचाईमुक्त करण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. चांगेफळ येथे मोर्णा नदीवर प्रस्तावित कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे गावासाठी सिंचनाची सोय निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी येथे केले. बंधाऱ्यांची कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत, असेही ते म्हणाले. अकोला तालुक्यातील चांगेफळ येथे कोल्हापुरी पद्धत बंधाऱ्याचे भूमिपूजन, ग्रामपंचायत कार्यालय, पाणीपुरवठा…

Read More

"अहिल्यानगर महिला प्रीमियर‎ लीग''चे शिवराज वॉरियर्सचे विजेते‎:क्रीडा केडगावमध्ये ७ एकरात उभारणार क्रिकेट स्टेडियम : आ. जगताप‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व एस. के. क्रिकेट अकॅडमीच्या वतीने आयोजित ‘अहिल्यानगर महिला प्रीमियर लीग’चा थरार शिवराज वॉरियर्सच्या विजयाने संपुष्टात आला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात शिवराज वॉरियर्सने जी एन एस नाईट रायडर्सचा पराभव करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अंतिम लढतीत जी एन एस नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद…

Read More