Headlines

करमाळा तालुक्यात जांभळाचा हंगाम जोमात:बाजारात आवक वाढली, हवामान बदलामुळे यंदा मोठी फळधारणा, झाडे फळांनी भरली‎

करमाळा तालुक्यात यंदा जांभूळ झाडांना मोठ्या प्रमाणात फळधारणा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतशिवार, ओढे-नाले परिसर तसेच गावांच्या हद्दीतील अनेक जुनी जांभूळ झाडे फळांनी लगडली असून जांभूळ हंगाम यंदा विशेष गाजताना दिसत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांम . कृषी जाणकारांच्या मते, गतवर्षी झालेला चांगला पाऊस, जमिनीत टिकून राहिलेला ओलावा, हवामानातील बदल आणि त्यानंतर वाढलेले तापमान यामुळे…

Read More

सीताराम शुगर समोरील आंदोलन मागे:राजलक्ष्मी गायकवाड यांनी मागण्या मान्य केल्याचे दिले लेखी निवेदन‎

खर्डी येथील सिताराम साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तरुण शेतकऱ्यांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले. सोमवारपासून विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची मोठी चर्चा झाली होती. कारखान्यामुळे होणारे हवा, पाणी आणि भूमी प्रदूषण यांसह विविध समस्यांविरोधात तरुण शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारले होते. अखेर आज (गुरुवार) सायंकाळी पाच वाजता हे आंदोलन मागे…

Read More

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार:24 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी, रखडलेल्या खरीप पेरण्यांना मिळणार वेग

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून भारतीय हवामान विभागाने १ जुलैपर्यंत राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह राज्यातील जवळपास २४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून काही भागांत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामानातील या बदलामुळे संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण आहे. नद्यांना पूर, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ…

Read More

जिल्ह्यात 30% औषधी दुकानांची 3 ते 6 वर्षांपासून तपासणीच नाही:चुकीच्या मार्गाने माल खरेदीने डुप्लिकेट औषधी येत असल्याची चर्चा‎

नागरिकांना खात्रीची व किफायतशीर दरात औषधे मिळावी, यासाठी औषधाच्या दुकानांची अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी व ऑडिट करणे गरजेचे आहे. परंतु मनुष्यबळाची कमतरता आणि इतर तांत्रिक कारणांमुळे जिल्ह्यातील सुमारे दोन हजार औषधी दुकान . यामुळे या काही मेडिकल्समधून विक्री होणारी औषधे, त्यांची गुणवत्ता आणि दराबाबत रुग्णांच्या मनात साशंकता निर्माण होत आहे. तसेच…

Read More

वरुणराजा बरसला:दोन दिवसांतच 25 हजार हेक्टरवर विक्रमी पेरणी; कपाशीलाच पसंती

अमरावती यंदा मान्सून सुमारे पंधरा दिवस उशिराने दाखल झाला असला, तरी जिल्ह्यात झालेल्या पहिल्याच दमदार आणि सार्वत्रिक पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. त्यामुळेच मागील दोन दिवसांत जिल्ह्यात विक्रमी २५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २८ हजार हेक्टरवर पेरणी झाल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. पेरण्यांना उशीर झाल्याने यंदा अधिकाधिक शेतकरी कपाशीला…

Read More

आषाढी तयारी:मागील वारीत वॉटरप्रूफ मंडपाला गळती; तरीही, मक्तेदारावर मेहरबानी का?- ढाणे

गेल्या आषाढी यात्रेत वारकऱ्यांच्या सुविधेसाठी उभारलेले काही वॉटरप्रूफ मंडप गळत होते, अरणमध्ये हाच वॉटरप्रूफ मंडप कोसळून ग्रामपंचायत कर्मचारी जखमी झाला. कुर्डुमध्येही तीच निकृष्ट कथा घडली…मग असं असतानाही यंदाही ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांची कामे देण्यासाठी पायघड्या का अंथरल्या जात आहेत? संबंधित ठेकेदारासोबत साटंलोटं आहे का? असा ’बॉम्ब’ कुर्डुचे जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब ढाणे यांनी ऐन जिल्हा परिषदेच्या…

Read More

मान्सूनची दिशा अन् दशा:शहरावर दाटले ढग, दमटपणा वाढला पण पाऊस काही बरसेना

शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून हवेत कमालीचा दमटपणा जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविला असला, तरी गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत शहरासह जिल्ह्यात केवळ १.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, सकाळी सापेक्ष आर्द्रता ८४ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. किमान तापमान २४.३ अंश…

Read More

नागरिकांना दिलासा:लासूर स्टेशन परिसरातील 4,500 कुटुंबांना घरपोच रेशनकार्डचे वाटप

परिसरातील साडेचार हजार कुटुंबांना रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यांसारख्या विविध शासकीय योजनांच्या मंजुरीपत्रांचे थेट घरात जाऊन वाटप करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल रमेश पाटील जाधव यांच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, परिसरातील घराघरांमधील लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे….

Read More

लोणी खुर्द परिसरात पेरणीची लगबग:100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका‎

वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागातील लोणी खुर्द परिसरातील तलवाडा, वाकला, पाराळा, भादली, टुनकी, अंचलगाव, नायगव्हाण, चिकटगाव, खरज, निमगाव या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने तुरळक हजेरी लावली आहे. मोठा पाऊस नसला तरी सुरुवातीच्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शेतीकामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनी मका, कपाशी, अद्रक, मूग, भुईमूग आणि सोयाबीनच्या लागवडीला सुरुवात केली आहे. काही शेतकरी…

Read More

वेरूळ घाटामध्ये झाड कोसळल्याने 30 मिनिटे वाहतूक झाली विस्कळीत:वाहनधारक ताटकळले, प्रशासनाकडून तातडीने झाड हटवून मार्ग मोकळा‎

तालुक्यातील वेरूळ घाटात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे रस्त्यालगतचे एक मोठे झाड उन्मळून पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. झाड थेट रस्त्यावर कोसळल्यामुळे ३० मिनिटे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. . बुधवारी रात्री अचानक हवामानात बदल होऊन परिसरात जोरदार वारे व पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्याचा फटका घाट परिसरातील अनेक झाडांना…

Read More