Headlines

जैन मुनी नीलेशचंद्र यांची मनोज जरांगे अन् मुस्लिमांवर टीका:म्हणाले – RSS नसती तर हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपीही राहिली नसती

वारंवार वादग्रस्त विधाने करून चर्चेत येणाऱ्या जैन मुनी नीलेशचंद्र यांनी यावेळी थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आहे. भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नसता तर हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी राहिली नसती. तुमच्या हातातील काठी ही गांधींची नव्हे तर संघाची आहे. ही काठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना मारणारी आहे, असे ते म्हणालेत. ठाण्याच्या भिवंडी…

Read More

शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार:२२ जिल्ह्यांसाठी सर्वात मोठा गेम प्लॅन अ‍ॅक्टिव्ह; १२ मंत्र्यांवर २२ जिल्ह्यांची जबाबदारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने आता थेट रणशिंग फुंकले आहे. यासाठी पक्षाने खास “संपर्क मंत्री अभियान” राबवले आहे. हे अभियान सत्तेच्या दिशेने झेप घेणारी आक्रमक ब्लूप्रिंट ठरणार असल्याचा दावा केला जात आहे. या अभियानांतर्गत शिवसेनेने राज्यातील २२ जिल्ह्यांतील संघटना मजबूत करत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर ताबा मिळवण्याचा निर्धार केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा…

Read More

बालविवाह रोखण्यासाठी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये:हिंगोलीत तरुणाने दिली चुकीची माहिती; खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा दाखल

गावात अल्पवयीन मुलीचा विवाह होत असून तातडीने यावे असा संदेश मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने हातचे काम सोडून जामठी बुद्रूक (ता.हिंगोली) गाव गाठले. मात्र त्या ठिकाणी सर्वत्र शांतता दिसून आली अन कुठलाही विवाह नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. या प्रकरणात डायल 112 वर चुकीची माहिती देणाऱ्या तरुणावर पोलिसांनी मंगळवारी ता. 21 रात्री उशिरा…

Read More

आयत्या बिळावरील नागोबांनी बुद्धीवर बोलू नये!:रोहिणी खडसेंचा चित्रा वाघ यांना 'संतवाणी'तून प्रत्युत्तर, वडिलांवरील टीकेचा घेतला समाचार

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दांत टीका केली आहे. तुतारीच्या वाजंत्रीच्या बुद्धीचा खडखडाट झालेला दिसतोय. तुमचे पिताश्री पक्ष रोडून राष्ट्रवादीत गेले, तेव्हा कुणी कसला तुकडा टाकला होता का? असा खोचक सवाल वाघ यांनी केला होता. त्यानंतर रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्यात चांगलीच…

Read More

मालेगाव स्फोट प्रकरणात मोठा ट्विस्ट:चार आरोपींना दिलासा, उच्च न्यायालयाचा निर्णय; तपास आणि पुराव्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा घडामोडींचा टप्पा गाठत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 2006 साली झालेल्या स्फोट प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून, सत्र न्यायालयाने यांच्याविरोधात निश्चित केलेले आरोप रद्द केले आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेला खटला आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर आरोपींना दिलासा मिळाला असून, प्रकरणातील…

Read More

गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात वॉचमनला अटक, मालकांना क्लीन चीट?:योगी आदित्यनाथांनी इतर राज्यात प्रचाराऐवजी युपीमध्ये रोजगार निर्मितीवर लक्ष द्यावे- संदीप देशपांडे

गोरेगाव नेस्कोमधील वॉचमनला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने लाच घेऊन ड्रग्ज विकणाऱ्याला मध्ये सोडले असा बनाव करण्याचा प्रयत्न पोलिस करत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे.एका वॉचमनला पकडून हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, नेस्कोचे मालकांना चौकशीला बोलवत नाही, हा काय प्रकार आहे, त्यांना क्लीन चीट द्यायचे ठरवले आहे का? श्रीमंत लोकांना सोडण्याचे तुम्ही…

Read More

इतिहासात प्रथमच महिलेने मंत्र्याला एवढ्या शिव्या दिल्या:भाजपला लोक कंटाळलेत, काँग्रेसचे मंत्री महाजनांच्या व्हायरल व्हिडिओवर भाष्य

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मंत्री गिरीश महाजन यांना महिलेने केलेल्या कथित शिविगाळीवरून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला सत्तेचा माज आला आहे. सत्तेचा उपयोग जनतेला त्रास देण्यासाठी होत असल्यामुळे एका महिलेने काल एका मंत्र्याला भररस्त्यात शिविगाळ केली. इतिहासात प्रथमच एखाद्या मंत्र्याला महिलेच्या एवढ्या शिव्या खाव्या लागल्या, असे ते म्हणालेत. लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर…

Read More

सत्ताधाऱ्यांना अभ्यासापेक्षा केवळ श्रेयाचे राजकारण करण्यात रस:मी पाणी सोडायला विरोध करताय हा सत्ताधाऱ्यांचा प्रचार अत्यंत बालिशपणाचा- शशिकांत शिंदे

सातारा जिल्ह्यातील धरणांची घटती पाणी साठवण क्षमता, कालव्यांची दुरवस्था आणि जिहे-कटापूर योजनेतील विस्कळीत नियोजनावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधारी आमदारांवर आणि सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. सत्ताधाऱ्यांना अभ्यासापेक्षा केवळ श्रेयाचे राजकारण करण्यात रस आहे, असा गंभीर आरोप त्यांनी बुधवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. शशिकांत शिंदे म्हणाले की, जिल्ह्यातील धरणांमध्ये…

Read More

PMPML Bus Crashes Into Shop in Shanivar Peth

पुण्यातील गजबजलेल्या शनिवार पेठ परिसरात सायंकाळी एक धक्कादायक अपघात घडला. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ची एक बस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन आप्पा बळवंत चौकातील एका दुकानात घुसल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी . मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक ते पुणे स्टेशन या मार्गावर धावणारी PMPML बस सायंकाळी साडेचारच्या सुमारास आप्पा बळवंत…

Read More

विरोधी पक्षाविरोधात मोर्चा? 'जगातला पहिला' निर्लज्जपणा, काढणाऱ्यांचा सत्कारच करा!:महाराष्ट्रात राहायचं तर मराठी आलीच पाहिजे- संजय राऊत

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा आलीच पाहिजे. तामिळमध्ये राहणाऱ्या माणसाला तामिळ भाषा आलीच पाहिजे, आपण कामधंद्यासाठी जिथे जातो तिथली भाषा आलीच पाहिजे यात काहीच गैर नाही, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले पाहिजे की मराठी भाषा आलीच पाहिजे, असे उबाठा खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काही बोलले…

Read More