शेतकऱ्यांना पसंतीचे बियाणे मिळत नसल्याने आमदारांची प्रश्नांची सरबत्ती:लाेकप्रतिनिधींशी चर्चा करून खरिपाचे पुनर्नियोजन हाेणार
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे विक्रीचा शुभारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सर्वाधिक मागणी असलेले कपाशी बियाणे ‘अजित-५’ हे वाण शेतकऱ्यांना न मिळाल्याचे पडसाद सोमवारच्या जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीत उमटले. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. शिवसेनेचे (उबाठा) आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण व भाजपचे हरिश पिंपळे यांनी बियाण्यांवरून…