कन्नडमधील तलाव कोरडेठाक:पाऊस लांबल्याने मत्स्य व्यावसायिक संकटात, पाऊस पडेल या आशेवर जलसाठ्यात बीज सोडण्याचा निर्णय
तालुक्यामध्ये चालू वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ खरिपाची पेरणी होईल एवढाच मर्यादित पाऊस झाला असून, बहुतांश पाझर तलाव आणि मुख्य जलसिंचन प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत. नदी-नाल्यांना अद्याप मोठा पूर आलेला नाही. या भीषण जलसंकटामुळे तालुक्यातील १० ते ११ हजार लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून असलेला मत्स्य व्यवसाय अडचणीत सापडला आहे. पावसाळा सुरू…