भादवन परिसरात सहा तासांत बिबट्या जेरबंद:आणखी बिबट्या असल्याने दुसऱ्या पिंजऱ्याची मागणी
तालुक्यातील भादवन येथे गिरणा नदीकाठावरील शेत परिसरात गेल्या चार महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अवघ्या सहा तासांत जेरबंद झाला. शेतकरी कैलास पांडुरंग जाधव यांच्या शेतातील घराजवळ रविवारी रात्री पिंजरा लावण्यात आला होता. मात्र परिसरात अजून एक बिबट्या असल्याने तत्काळ दुसरा पिंजरा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. भादवन येथील गट…