Headlines

भूमी अभिलेखच्या कारभाराविरुद्ध तीन महिलांचे उपोषण:न्यायालयीन प्रकरण सुरू असताना कर्मचाऱ्यांनी परस्पर केली मोजणी‎

येथील उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालयातील कथित भ्रष्ट व वादग्रस्त कारभाराला कंटाळून अखेर तीन महिलांनी सोमवारपासून (दि.६) कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. शुभांगी प्रवीण ठाकरे, राजकन्या साहेबराव ठाकरे व शोभाबाई भुजंगराव बरडे अशी उपोषणास बसलेल्या महिलांची नावे आहेत. भूमी अभिलेखच्या इतिहासात तीन महिलांनी एकत्र येत आमरण उपोषणाचे पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ असल्याने परिसरात खळबळ…

Read More

शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी खंबीरपणे शिक्षकांच्या पाठीशी राहीन:आदर्श शिक्षक, शाळा पुरस्कार वितरणप्रसंगी माजी आ. सावंत यांचे प्रतिपादन‎

“शिक्षण हे सर्व विकासाचे मूळ आहे. समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यामुळे त्यांच्या रास्त मागण्यांसाठी आणि हक्कासाठी लढणे ही आपली जबाबदारी आहे. जुनी पेन्शन योजना, टीईटी सक्ती आणि टप्पा अनुदान यासारख्या प्रलंबित प्रश्नांवर मार्ग काढण्यासा . ​या वेळी माजी आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले, मी आमदार असताना शिक्षण क्षेत्रातील असंख्य जटील प्रश्न लोकशाही व…

Read More

गौडगाव मंडळात खरिपाची 70 टक्के पेरणी:अद्रा नक्षत्राने शेतकऱ्यांना तारले, दमदार पावसाची प्रतीक्षा,दोन दिवस संततधारमुळे बळीराजा सुखावला

. बार्शी तालुक्यात आर्द्रा नक्षत्रातील पावसाने ने हजेरी लावली असून शेतकऱ्यांना खरीप पेरणीची सुरुवात करून दिली आहे. गौडगाव मंडळामध्ये पेरणीयोग्य, पाऊस झाला आहे. मागील चार दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने खरीप पेरणीला सुरुवात झाली आहे. जूनअखेरपर्यंत पावसाची गौडगाव मंडळात ९८ मिलिमीटर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची लगबग सुरू केली आहे. यावर्षी मृग नक्षत्र जवळपास कोरडेच गेले….

Read More

भंडारदरा 35टक्के भरले, मुळा धरणात यंदा प्रथमच नवीन पाण्याची आवक:भंडारदऱ्यात 24 तासांत 400 दलघफू नवे पाणी, हरिश्चंद्रगड परिसर जलमय

जून महिना कोरडा गेल्याने चिंताग्रस्त झालेल्या बळीराजाची आणि अकोलेकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह संपूर्ण अकोले तालुक्यात शनिवारपासून पावसाने धुवाधार ‘बॅटिंग’ सुरू केली आहे. सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत घाटघर आणि रतनवाड . पाऊस असाच कोसळत राहिल्यास मंगळवारपर्यंत धरणाचा साठा ५ हजार दलघफूटांचा टप्पा ओलांडेल. दरम्यान, भंडारदऱ्याच्या जलविद्युत प्रकल्पातून २६९७ क्युसेक्स वेगाने निळवंडे धरणात…

Read More

मंगळवार पॅटर्नच्या माध्यमातून राष्ट्रवादी जनतेचे प्रश्न सोडविणार:सटाण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष खैरे यांची माहिती‎

बागलाण तालुक्यात नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दर महिन्याच्या एका मंगळवारी विशेष आढावा बैठक घेऊन ‘मंगळवार पॅटर्न’ राबविण्यात येणार असल्याची घोषणा पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी केली. शहरातील राधाई मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. खैरे म्हणाले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री…

Read More

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे भक्तिमय प्रस्थान:24 जुलैला पंढरपुरात होणार आगमन; अठरा दिवस संतविचारांचा महोत्सव‎

संत ज्ञानेश्वर माउलींचे जन्मस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र आपेगावातून सोमवारी (६ जुलै) सायंकाळी श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या माता-पिता पालखी, दिंडी व रथ सोहळ्याचे अत्यंत भक्तिमय वातावरणात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान पालखी प्रमुख ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, आमदार विलास भुमरे यांच्या पत्नी वर्षा भुमरे, नगराध्यक्ष विद्या कावसानकर, भूषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, पोपट औटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. “ज्ञानोबा-तुकाराम” ,…

Read More

आडूळ जि. प. शाळेत ग्रंथालयाचे उद्घाटन:विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहावे- आमदार भुमरे‎

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, ज्ञानाची आवड निर्माण व्हावी तसेच स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक प्रगतीस चालना मिळावी या उद्देशाने पैठण तालुक्यातील आडूळ येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्रशालेत रविवारी सुसज्ज ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. या नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार विलास भुमरे यांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावण्याचे आवाहन…

Read More

टीईटी अट सक्तीविरोधात नऊ जुलैला ‘शाळा बंद’ आंदोलन:शिक्षक संघटनांनी दिला राज्य शासनाला इशारा

राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी गुरुवार, ९ जुलै रोजी राज्यव्यापी ‘शाळाबंद’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यरत शिक्षकांसाठी टीईटीची सक्ती, पदोन्नती प्रक्रियेतील नवीन अटी तसेच विशेष मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी शिक्षकांवर सोपविण्यात आलेल्या अशैक्षणिक कामांचा निषेध करत हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या आंदोलनात राज्यातील शिक्षक…

Read More

केमिकल दुधाच्या आंतरजिल्हा रॅकेटवर ‘एफडीए’चा प्रहार:पाच जिल्ह्यांत छापे, 1.48 कोटींचा मुद्देमाल जप्त; पुणे, अहिल्यानगर, सोलापूर जालन्यात कारवाई

अन्न व औषध प्रशासनाने आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून राज्यातील लहान मुले आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कृत्रिम दूध भेसळीच्या आंतरजिल्हा संघटित जाळ्याचा पर्दाफाश केल्याचे सांगण्यात आले. . अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार, पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या पाच जिल्ह्यांत एकाच वेळी ही धडक…

Read More

हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा:विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई, ठाणे, पालघरसह पुण्यातील घाटमाथ्यावरील शाळाही राहणार बंद

राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि लगतच्या भागातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, विविध पावसाळी दुर्घटनांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. उद्याही राज्याच्या अनेक भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला योग्य ते आदेश जारी केले असून, या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी देण्यात…

Read More