Headlines

सीओईपी विद्यार्थिनीवर माफीसाठी दबाव, वडेट्टीवार यांची भाजपवर टीका:काँग्रेस कार्यकर्त्यांवर चुकीचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील विद्यार्थिनीवर दबाव टाकून माफी मागण्यास लावल्याबद्दल आणि तिला कोंडून ठेवल्याबद्दल भाजपवर टीका केली आहे. विद्यार्थिनींनी प्रसारमाध्यमांसमोर आपल्या अडचणी मांडल्यानंतर सुधारणा करण्याऐवजी हा प्रकार घडल्याचे वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार यांनी विद्यार्थिनीला अभाविप आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्रास झाल्याचा आरोप करत तिची माफी मागितली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली नसतानाही…

Read More

मुंबईतील 15 पोलिस ठाण्यांच्या हद्दींची नव्याने आखणी:हद्दीचे वाद मिटणार, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण होणार अधिक सुलभ

मुंबईत गुन्हा घडल्यानंतर अनेकदा “घटना आमच्या हद्दीत घडली नाही” या कारणावरून पोलिसांमध्ये होणारा हद्दीचा वाद आणि नागरिकांची होणारी ससेहोलपट आता कायमची थांबणार आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने मुंबईतील १५ महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रांची नव्याने पुनर्रचना केली असून यासंदर्भातील अधिकृत राजपत्र जारी केले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ (बीएनएसएस) मधील तरतुदींनुसार हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय…

Read More

उदगीरमध्ये 2,143 कोटींच्या परदेशी निधी प्रकरणी मोठी कारवाई:कथित बनावट प्रमाणपत्राद्वारे निधी पाठवल्याचा आरोप, 17 जणांविरुद्ध गुन्हा

परदेशी निधी पाठविण्याच्या व्यवहाराचे कथित खोटे प्रमाणपत्र देऊन तब्बल ₹2,143 कोटी 79 लाख 43 हजार 760 रुपयांचा निधी चुकीच्या पद्धतीने परदेशात पाठविण्यास सहाय्य केल्याप्रकरणी शुक्रवारी उदगीर शहर पोलिस ठाण्यात 17 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमके प्रकरण काय 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2026 या कालावधीत न्यू मोंढा रोड, उदगीर येथे आरोपींनी संगनमत…

Read More

राहुल गांधींच्या सभेपूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा:एबीव्हीपीच्या तक्रारीवरून 50-60 जणांवर शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांच्यासह एनएसयूआय आणि युवक काँग्रेसच्या सुमारे ५० ते ६० कार्यकर्त्यांना आरोपी करण्यात आले आहे. हा गुन्हा शुक्रवारी रात्री…

Read More

विशाखा राऊतांचे जात प्रमाणपत्र रद्द:समाधान सरवणकरांचा सवाल, ओबीसी समाजावर अन्याय? व्यवसाय मजुरी आणि घरकाम कसे?

ठाकरे गटाच्या नगरसेविका आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे. जात पडताळणी समितीने त्यांना पालघरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले कुणबी जात प्रमाणपत्र रद्द केले आहे. संबंधित प्रमाणपत्र देण्यासाठी पालघरचे उपविभागीय अधिकारी सक्षम प्राधिकारी नसल्याचे समितीच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर विशाखा राऊत यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरून…

Read More

राहुल गांधींचा कार्यक्रम उधळण्याची भाषा म्हणजे दहशतवाद:संजय राऊतांचा भाजप-ABVP वर हल्लाबोल, फडणवीस-शहांवरही केले गंभीर आरोप

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याला पोलिसांनी घातलेल्या अटी आणि COEP परिसरातील काँग्रेस-NSUI आणि ABVP कार्यकर्त्यांमधील वादावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. “भाजप हा डरपोक लोकांचा पक्ष असून, सत्तेच्या कवचकुंडलांमुळेच त्यांची ही दादागिरी सुरू आहे. मात्र, सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या पडझडीला…

Read More

प्रेमाचा सल्ला देत भामट्याची हातचलाखी:सेवानिवृत्त शिक्षकाची 60 हजार रुपये किंमतीची अंगठी पळवली

काका, समोर चोरी झाले आहे. आम्ही पोलिस आहोत, तुम्ही तुमच्या अंगठ्या काढून ठेवा असा प्रेमाचा सल्ला देत एका भामट्याने सेवानिवृत्त शिक्षकाच्या हातातील अंगठी पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. २१ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. नेमके प्रकरण काय आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील पंचशिल नगर येथील रहिवासी…

Read More

राम माधव यांच्या कथित भेटीवर प्रकाश आंबेडकरांचा दावा:ISIच्या निवृत्त अधिकाऱ्यांशी श्रीलंकेत चर्चा, चार मुद्दे कोणते?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) माजी प्रवक्ते राम माधव यांनी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’च्या (ISI) निवृत्त अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचा अत्यंत खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या भेटीत चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगत, आंबेडकरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनाच जाब विचारला आहे. आंबेडकरांच्या या गंभीर आरोपामुळे…

Read More

अपघात:अरणजवळ भरधाव कार चारीत उलटून मोडनिंबचे तिघे जखमी

भरधाव स्विफ्ट कार रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत कोसळून झालेल्या अपघातात कार चालकासह तिघे जण जखमी झाले. हा अपघात पुणे महामार्गावर अरण (ता.माढा) नजीक शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडला. गंभीर जखमीस पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोडनिंब येथून टेंभुर्णीकडे जाणारी कार (एमएच १२ आरएफ ३५१६) भरधाव वेगाने जात असताना कार चालकाचे वाहनावरील…

Read More

आषाढी यात्रेनंतर वाळवंट वाऱ्यावर:भाविकांची सुरक्षा विठ्ठल भरवशावर

आषाढी यात्रेनंतर पंढरपूर येथील चंद्रभागेच्या वाळवंटात प्रशासकीय यंत्रणा बेजबाबदार झाली आहे. लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सुरक्षा आता प्रशासकीय टोलवाटोलवीमुळे विठ्ठलाच्याच भरवशावर सोडून दिली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी यात्रेनंतर नगरपालिका, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सुरक्षेची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याची परंपरा सुरू आहे. भाविकांच्या जिवाशी खेळणारी ही वागणूक…

Read More