Headlines

नोकरीच्या आमिषाने सायबर फसवणूक:पुण्यात बांधकाम कंपनीत नोकरी देण्याचे सांगून 3 लाखांची फसवणूक

पुण्यात एका व्यक्तीची बांधकाम कंपनीत नोकरी देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तीन लाख सात हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार कोथरूड भागात राहतात. त्यांना सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एक संदेश पाठवला होता. या संदेशात बांधकाम कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. चोरट्यांनी…

Read More

'घराबाहेर पडू नका, पर्यटन टाळा!':मुंबईत पावसाचा कहर, परिस्थिती किती भयंकर? पाहा PHOTOS आणि VIDEO

राज्यासह मुंबई आणि पुण्यात पावसाने रौद्ररूप धारण केले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पावसाचा हा हाहाकार पाहता आजचा दिवस राज्यासाठी अत्यंत धोक्याचा असून, दुपारनंतर ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा धडकी भरवणारा अलर्ट प्रशासनाने जारी केला आहे. अतिवृष्टीमुळे…

Read More

पावसाचा रेड अलर्ट अन् मुंबई-पुणे मार्ग ठप्प:दरड कोसळल्याने वाहतूक स्थगित; मंत्री गिरीश महाजन म्हणाले- पर्यटनाचा मोह टाळा

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली असून, मुंबईत पर्यटनासाठी येऊ नका, अन्यथा सक्तीची पावले उचलावी लागतील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. मुंबई-पुणे…

Read More

मुंबई-गोवा महामार्गावर संकट आणखी गडद:कशेडी बोगद्याजवळ पुन्हा दरड कोसळली; 24 तासांपासून वाहतूक ठप्प, हजारो प्रवासी अडकले

राज्यभर मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून कोकणातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रायगड, रत्नागिरी आणि चिपळूणसह अनेक भागांत नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याचदरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा मोठी दुर्घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी बोगद्याजवळ खवटी परिसरात दगड-मातीचा प्रचंड ढिगारा महामार्गावर कोसळल्याने दोन्ही मार्गिका पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी गेल्या तब्बल…

Read More

कर टाळण्यासाठी खासगी जागेमध्ये अनधिकृत पत्राशेड बांधून व्यवसाय:2 हजारांवर विनापरवाना पत्रा शेड, मनपाकडून फक्त सर्वेक्षण, कारवाई नाही

अहिल्यानगर शहरात व विशेषतः उपनगर भागात मोकळ्या खासगी जागांवर पत्र्याचे मोठे शेड उभारून व्यावसायिक दुकाने, हॉटेल, शोरुम थाटण्याचे प्रकार वाढले आहेत. महापालिकेने काही वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात शहरात तब्बल दोन हजारांहून अधिक अशी पत्र्याची शेड असल्याचे व यापैकी बहुतांश बांधकामे ही महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आल्याचे समोर आले होते. महापालिकेचा मालमत्ता कर व…

Read More

सलग 300 रविवार शहरात राबवले स्वच्छता अभियान:धर्मवीर युवा प्रतिष्ठानचा सलग ३०० रविवार स्वच्छतेचा विक्रम

धर्मवीर युवा प्रतिष्ठान, नालेगाव यांच्यावतीने गेल्या सहा वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाने रविवारी ऐतिहासिक टप्पा गाठला. सलग ३०० व्या रविवारी भिंगार येथील बेलेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत मंदिर परिसरातील सुमारे पाच ते सहा टन कचरा, प्लास्टिक, झुडपे आणि गवत हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, धर्मवीर युवा…

Read More

संत्रा, मोसंबी मृग बहार; अधिक ताणाने फुलगळीचा धोका:तीव्र उन्हाळ्यामुळे झाडांना अधिक ताण

अकोला सध्याच्या बदलत्या हवामानात संत्रा व मोसंबी बागांच्या मृग बहाराचे व्यवस्थापन करणे फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. मृग बहार पावसाळ्यातील योग्य हवामान व तापमानावर अवलंबून असतो. या बहारात रोग व किडींचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असल्याने फळगळ कमी होते. मात्र, यावर्षी विदर्भात किमान साडेतीन महिने कडक उन्हाळ्यामुळे बागांना अधिक ताण बसला. यामुळे बागांमध्ये फुलगळ किंवा फळगळ…

Read More

पंढरपुरात जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या मंदिरांत मूर्तींची प्राणप्रतिष्ठा:व्यंकटेश, महालक्ष्मी, हनुमान आदी मंदिरे दर्शनासाठी खुली

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार व संवर्धनाची कामे पूर्ण झालेल्या व्यंकटेश मंदिर, महालक्ष्मी मंदिर, काशी अन्नपूर्णा मंदिर तसेच कचेरीजवळील मारुती मंदिर येथील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा दि.४ व ५ जुलै रोजी संपन्न झाली. त्यानंतर ही सर्व मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली असून, मंदिरांतील नित्योपचार पूर्ववत सुरू करण्यात आल्याची…

Read More

मराठी राजभाषा समृध्द करण्यासाठी मुस्लिम साहित्यिकांचे मोठे योगदान:मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचा उपक्रम चर्चासत्र, कवी संमेलनाचे आयोजन‎

मराठी राजभाषा समृद्ध आहे. अनेक मुस्लिम साहित्यिकांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली असून साहित्यातील कादंबरी, कथा याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. कवितेच्या विविध प्रकारचे लिखाण आहेत, ती प्रकाशात यावीत अशी अपेक्षा प्रा. दस्तगीर जमादार यांनी केली . अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषद आयोजित “पुस्तकावर बोलू या ” या उपक्रमाअंतर्गत मत व्यक्त केले . सोशल…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:अखंड हिंदुस्थानातील पहिला गणेशोत्सव साेलापुरातील आजाेबाचाच; शासनाची मोहोर!

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण? भाऊ रंगारी की टिळक? या प्रश्नावर पुण्यात अजूनही वाद सुरू आहे. अशा स्थितीत राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने एक महत्त्वपूर्ण टिपण्णी केली. ‘अखंड हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव’ असा उल्लेख करून सोलापूरच्या आजोबा गणपती ट्रस्टला १० लाख रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिली. यातून सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचा शासन निर्णय…

Read More