Headlines

पैठण शहरामध्ये शनी अमावास्येनिमित्त महामस्तक अभिषेक महोत्सव उत्साहात:हजारो भाविकांनी घेतले भगवान मुनिसुव्रतनाथांचे दर्शन‎

प्रतिनिधी | पैठण येथील श्री शनिग्रह अरिष्ट निवारक मुनिसुव्रतनाथ भगवान क्षेत्र येथे शनिअमावस्येनिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य महामस्तक अभिषेक महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. भारतातील जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या मूलनायक भगवान मुनिसुव्रतनाथ यांच्या महामस्तक अभिषेकासाठी राज्यासह देशभरातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. हा सोहळा बुंदेलखंड केसरी आचार्य श्री…

Read More

शासकीय आदेश निघूनही वाळू वाहतूक ठप्प; प्रशासनाचा सावळा गोंधळ कायम:डागपिंपळगाव आणि बाभुळगावगंगा डेपोचे लाखो रुपये भरूनही गाड्या बंदच‎

प्रतिनिधी | वैजापूर तालुक्यात सध्या टेंडर शिल्लक वाळूचे, पण नजर मात्र गोदावरीच्या नव्या वाळूवर. अशी एकच चर्चा रंगू लागली आहे. तालुक्यातील डागपिंपळगाव आणि बाभुळगावगंगा येथील वाळू डेपोचे टेंडर पूर्ण झाले. ठेकेदारांनी लाखोंची चलने भरली. शासनाचे आदेशही निघाले. वाहतुकीची तारीखही निश्चित झाली. मात्र, एवढी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्ष वाळू वाहतूक अजूनही सुरू झालेली नाही….

Read More

पैठणचे उद्यान ४९ वर्षांसाठी देणार भाडेतत्त्वावर:२३२ हेक्टरवर होणार जागतिक पर्यटन प्रकल्प

जायकवाडी धरण परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतला आहे. प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यान, ॲडव्हेंचर पार्क, डाउनस्ट्रीम भागाचा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकास केला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत २३२ हेक्टर क्षेत्र ४९ वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या कराराद्वारे खासगी विकासकाकडे सोपवण्यात येणार आहे. जागतिक दर्जाचे जलपर्यटन व पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे….

Read More

शिवसेना उबाठाच्या खुलताबाद शहर प्रमुखपदी मुकेश मालोदे यांची नियुक्ती:पक्ष संघटना अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याची भावना

खुलताबाद | शिवसेना (उबाठा) शहर प्रमुखपदी मुकेश मालोदे यांची नियुक्ती करण्यात आली असून माजी विरोेधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीमुळे खुलताबाद शहरातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पक्ष संघटना अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी शिवसेना (उबाठा)चे मराठवाडा संपर्कप्रमुख सुभाष पाटील,…

Read More

बेगमपुऱ्याच्या इतिहासाची हेरिटेज वॉकमध्ये उलगडली पाने:थत्ते हौद ते कुंभारगल्ली : बेगमपुरा हेरिटेज वॉकमध्ये 250 हून अधिक नागरिकांची ऐतिहासिक सफर

ऐतिहासिक वारसा जपणे आणि नागरिकांमध्ये शहराच्या संस्कृतीबद्दल जनजागृती निर्माण करणे, या उद्देशाने रविवारी (१७ मे) सकाळी ‘बेगमपुरा हेरिटेज वॉक’चे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका आणि ‘इन्टॅक’ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या शहराच्या वेशीबाहेर वसलेल्या बेगमपुरा भागातील जिवंत इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी तब्बल २५० हून अधिक सजग नागरिक या सफरीमध्ये…

Read More

कबड्डीने बदलले अकोल्यातील गावाचे नशीब:3,500 लोकसंख्येच्यागावात 35,000 क्षमतेचे स्टेडियम; 25 तरुणांना सरकारी नोकरी मिळाली

अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील केळीवेळी गावाची ओळख आता ‘कबड्डीचे गाव’ म्हणून बनली आहे. अवघ्या ३,५०० लोकसंख्या असलेल्या या गावात ३५ हजार क्षमतेचे स्टेडियम आहे, जिथे कबड्डीचे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सामने होतात.आता गावच्या महिलाही दिवाळीला माहेरी जाण्याऐवजी गावात होणाऱ्या कबड्डी सामन्यांचा आनंद घेणे पसंत करतात. गावातील जवळपास प्रत्येक घरात एक कबड्डी खेळाडू आहे. कबड्डीने येथील तरुणांच्या…

Read More

पाणी साठवण्याच्या खड्ड्यात दोघे बुडाले‎:शेवाळामुळे लक्षात आला नाही प्रकार, खेळताना दोघे घराजवळील खड्ड्यात पडले‎

अंथरलेल्या ताडपत्रीवर पाय घसरल्यामुळे दोघे ‎खड्ड्यात पडल्याचा अंदाज‎ खेळताना पाणी साठवण्याच्या खड्ड्यात‎पडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.‎लातूर शहरातील बोधेनगर परिसरात‎ रविवारी दुपारी ही घटना घडली.‎ मिळालेल्या माहितीनुसार, बोधे नगर‎येथील रामला इंडस्ट्रीजच्या पाठीमागील‎भागात ही घटना घडली. दिव्या नवनाथ‎उबाळे (६) व कार्तिक भरत कांबळे‎(७) अशी दोघा मृतांची नावे अाहेत.‎दुपारी ते दोघे घराशेजारी खेळत होते.‎ अशी उघड झाली…

Read More

संभाजीनगरात ४०० आठवड्यांपासून अधिकारी, डाॅक्टर, वकिलांचे श्रमदान:दर रविवारी 2 तासांच्या स्वच्छता मोहिमेतून बदलला शहराचा चेहरामाेहरा

‘केवळ कर भरणे म्हणजे नागरिकांचे कर्तव्य संपत नाही, तर शहराप्रति आपलेही काही देणे लागते,’ या जाणिवेतून शहरात सुरू झालेली स्वच्छता मोहीम आता एक आदर्श लोकचळवळ बनली आहे. २७ ऑक्टोबर २०१६ रोजी उद्योजक सुनील किर्दक, विंग कमांडर टी. आर. जाधव आणि मानसिंग पवार यांच्या संकल्पनेतून ही चळवळ उभी राहिली. मराठा समाज प्रतिष्ठानच्या वसतिगृहातील अवघ्या १५० ग्रामीण…

Read More

गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कटिबद्ध रहावे:शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे आवाहन

अमरावती ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी पोलिसांना गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले आहे. खोलापूर येथील शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. पोलीस अधीक्षक कदम यांनी नुकतीच खोलापूर पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील एकंदरित परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक पोलीस कर्मचारी आणि पोलीस पाटलांची कार्यशाळा…

Read More

सरकार-देवाने काम केले असते तर देश बदलला असता:व्यक्ती-समाज जागृत झाल्यास देश बदलता येईल, नितीन गडकरींचे विधान

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे एका कार्यक्रमात रोखठोक भूमिका मांडली. “सरकार आणि देवाने काम केले असते तर देश कधीचा बदलला असता,” असे ते म्हणाले. लोकांचा सरकार आणि देव या दोघांवर खूप विश्वास असतो, पण या दोघांनाही बाजूला ठेवून व्यक्ती आणि समाजाने जागृत होऊन काम केल्यास देशाला बदलता येईल, असे आवाहन त्यांनी…

Read More