सरकार-देवाने काम केले असते तर देश बदलला असता:व्यक्ती-समाज जागृत झाल्यास देश बदलता येईल, नितीन गडकरींचे विधान
केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे एका कार्यक्रमात रोखठोक भूमिका मांडली. “सरकार आणि देवाने काम केले असते तर देश कधीचा बदलला असता,” असे ते म्हणाले. लोकांचा सरकार आणि देव या दोघांवर खूप विश्वास असतो, पण या दोघांनाही बाजूला ठेवून व्यक्ती आणि समाजाने जागृत होऊन काम केल्यास देशाला बदलता येईल, असे आवाहन त्यांनी…