Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:अखंड हिंदुस्थानातील पहिला गणेशोत्सव साेलापुरातील आजाेबाचाच; शासनाची मोहोर!

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण? भाऊ रंगारी की टिळक? या प्रश्नावर पुण्यात अजूनही वाद सुरू आहे. अशा स्थितीत राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने एक महत्त्वपूर्ण टिपण्णी केली. ‘अखंड हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव’ असा उल्लेख करून सोलापूरच्या आजोबा गणपती ट्रस्टला १० लाख रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिली. यातून सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचा शासन निर्णय…

Read More

संगमनेर:जन्म-मृत्यू दाखल्यांचे अडथळे दूर करावेत – आमदार अमोल खताळ

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात नागरी नोंदणी प्रणालीद्वारे जन्म व मृत्यू नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, या प्रणालीतील तांत्रिक व प्रशासकीय त्रुटींमुळे संगमनेर तालुक्यासह ग्रामीण भागातील नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले मिळविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या प्रणालीतील सर्व अडथळे तातडीने दूर करावेत, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेमध्ये औचित्याच्या…

Read More

धबधब्यावर गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू:मित्रांच्या जबाबातून उलगडणार सत्य, दौलताबादजवळील नंदीबेड धबधबा परिसरातील प्रकार

दौलताबाद येथील नंदीबेड धबधबा परिसरात मृतदेह आढळला. पोलिसांच्या पथकाने स्ट्रेचरवरून मृतदेह आणला. “मित्रांसोबत धबधब्यावर जाऊ नकोस,’ असा वडिलांनी काळजीपोटी दिलेला हा सल्ला न ऐकणे शहरातील रमानगर येथील एका १८ वर्षांच्या तरुणाच्या जिवावर बेतले. रविवारी (५ जुलै) सुटीच्या दिवशी मित्रांसोबत दौलताबाद परिसरातील केसापुरी तांडा येथील नंदीबेड धबधबा पाहण्यासा . प्रथमेश हा बारावीत शिकत होता. त्याचे वडील…

Read More

न्यायालय परिसरात वकिलांवर हल्ले:हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस, एसआयटी स्थापन करण्याची मागणी

महाराष्ट्रातील न्यायालयीन परिसरांमध्ये वकिलांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांमुळे न्यायव्यवस्थेच्या सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या विषयाची गंभीर दखल घेतली असून राज्य शासनाला नोटीस बजावली आहे. राज्यात वकिलांवरील हिंसक हल्ले आणि न्यायालयीन परिसरातील ढासळती सुरक्षा व्यवस्था याविरोधात विधिज्ञ ॲड. शोमितकुमार साळुंके यांनी ‘पार्टी इन पर्सन’ म्हणून फौजदारी जनहित याचिका दाखल…

Read More

पिळकोसच्या उपसरपंचपदी शोभा वाघ यांची अविरोध निवड:संभाव्य तणावाची शक्यता टळली; गावात जल्लोष‎

तालुक्यातील पिळकोस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शोभा वाघ यांची अविरोध निवड करण्यात आली. आवर्तन पद्धतीनुसार उपसरपंच मधुकर जाधव यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली. उपसरपंचपदासाठी दोन सदस्य इच्छुक असल्याने दोघांनीही उमेदवारी अर्ज घेतले होते. त्यामुळे काही काळ गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र, भाऊसाहेब जाधव, मधुकर जाधव, मोहन वाघ आणि…

Read More

जनआरोग्य योजनेतील गैरप्रकार त्वरित थांबवा:भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीची मागणी‎

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत काही रुग्णालयांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत पात्र लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार पूर्णपणे मोफत उपचार मिळावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बागलाण तालुका महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन व यशवंत मोफत रुग्णसेवा समितीने दिला आहे. सटाणा दौऱ्यावर आलेले जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांना तालुका सचिव श्याम बागडणे यांनी निवेदन देऊन…

Read More

ऑनलाइन गेमिंगचा नाद भोवला:ठाण्यात तरुणास दीड कोटीचा गंडा; 3 संकेतस्थळे, विविध बँक खातेदारांसह 7 जणांविरुद्ध गुन्हा

ऑनलाइन गेमिंग आणि गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवण्याच्या नादात ठाण्यातील एका २६ वर्षीय तरुणाने तब्बल १.३६ कोटी रुपये गमावले आहेत. सायबर भामट्यांनी अत्यंत शिताफीने जाळे विणून या तरुणाची फसवणूक केली असून याप्रकरणी रविवारी ठाणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ऑक्टोबर २०२४ ते ३० जून २०२६ या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला. पोलिसांनी ३ वेबसाइट्स…

Read More

जिल्ह्यात गतवर्षी 5.95 लाख हेक्टर‎पेरणी तर यंदा 2.22 लाख हेक्टरवर:समाधानकारक पावसाअभावी 67 टक्के जमीन अद्याप पेरणीविना‎

जिल्ह्यात पावसाच्या लहरीपणामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतीचे गणित बिघडले आहे. गतवर्षी मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व दमदार पावसामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यापासून पेरण्यांना वेग आला होता. गेल्या वर्षी जूनअखेर जिल्ह्यात ५ लाख ९५ हजार ६२० हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती. मात्र, यंदा जून महिना संपून जुलैचा पहिला आठवडा सुरू झाला तरी अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत….

Read More

पब, बार रात्री 1.30 वाजता सक्तीने बंद:नियमांचे उल्लंघन केल्यास आता थेट गुन्हा, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तांची नियमावली

शहरातील बिअर बार रात्री दीड वाजता बंद होण्याचा नियम असला तरी अनेक बार शटर डाऊन करून पहाटेपर्यंत सुरू असायचे. रात्रभर चालणाऱ्या या धिंगाण्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली होती. अलीकडेच जालना रोडवरील एका व्यावसायिकाची हत्या आणि सिडको एन-७ मधील सुरभी बार बाहेर पहाटे ४ वाजता दोन गटांत झालेला राड्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या…

Read More

सायबरमाफियांच्या जाळ्यात अडकलेल्या नाशिकच्या तरुणाची आपबिती:आम्ही इथून जिवंत बाहेर पडू अशी आशा आता मावळली आहे

नोकरीच्या आमिषाने थायलंडला गेलेल्या महाराष्ट्रातील, विशेषतः नाशिकमधील ८ आणि बीडमधील १७ तरुणांना म्यानमार सीमेवरील ‘गोल्डन ट्रँगल’ भागात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणांना तिथे १६ ते १८ तास ऑनलाइन फसवणुकीचे काम करण्यास भाग पाडले जात आहे.अडकलेल्या एका तरुणाने ‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना सांगितले की, आम्हाला इथे सायबर फ्रॉड करण्याचा प्रचंड दबाव आहे,…

Read More